शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ग्रंथप्रदर्शनात दीड कोटीची ‘साहित्य संपदा’ खरेदी; उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 03:03 IST

आर्थिकदृष्ट्या पिछाडलेल्या जिल्ह्यातील साहित्य रसिकांनी दाखविली वैचारिक सुबत्ता, अनेक ग्रंथांचा तुटवडा

सूरज पाचपिंडे उस्मानाबाद : मागास व दुष्काळी जिल्हा म्हणून भाळी शिक्का असलेल्या उस्मानाबादेत ११ ते १३ जानेवारी या कालावधीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. या संमेनात एकाच छताखाली सुमारे दोनशेच्या आजपास ग्रंथ विक्रीसाठीचे स्टॉल उभारण्यात आले होते. या सर्व स्टॉलवर मिळून सुमारे दीड कोटींची पुस्तके साहित्य रसिकांनी खरेदी केली.

उस्मानाबादेत संमेलन घेण्याचा मान मिळावा, यासाठी साधारणपणे मागील दहा ते बारा वर्षांपासून साहित्य परिषद व सामाजिक संस्था, संघटना पाठपुरावा करीत होत्या. परंतु, एक-दोन वर्षाआड पडणारा दुष्काळ आणि मागासलेपणावर बोट ठेवले जात होते. त्यामुळे स्पर्धेतील अन्य जिल्ह्यास संधी मिळत गेली. परंतु, यंदा तो मान उस्मानाबादला मिळाला. संयोजन समितीसोबतच सर्व क्षेत्रातील घटकांनी एकत्र येत तगडे नियोजन केले आणि संमेलन नेटके झाले.

दरम्यान, संमेलनस्थळी एकाच छताखाली सुमारे १९७ ग्रंथस्टॉल उभारण्यात आले होते. परंतु, दुष्काळी जिल्हा असल्याने पुस्तकांची अपेक्षित विक्री होईल का नाही, याची चिंता विक्रेत्यांना होती. परंतु, त्यांची ही चिंता वाचकप्रेमींनी फोल ठरवित, पहिल्याच दिवसापासून पुस्तक खरेदीचा सपाटा लावला. बाल साहित्यासह, महापुरुषांचे जीवन चरित्र आदी पुस्तकांना अधिक पसंती होती, असे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. ग्रंथप्रदर्शनात छोट्या स्टॉलची संख्या सुमारे ४० ते ५० च्या घरात होती. या स्टॉलवर प्रत्येकी सरासरी २५ ते ६० हजारापर्यंत विक्री झाली. तर उर्वरित मोठ्या स्टॉलवर प्रत्येकी साधारपणे ४ ते ७ लाखांची पुस्तक विक्री झाली. सर्व स्टॉलवर मिळून जवळपास दीड कोटींची पुस्तके विक्री झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. वाचकांकडून ययाती, मृत्यूंजय, श्रीमान योगी, संभाजी, तुकाराम गाथा, बिहार ते तिहार कन्हैया कुमार, गांधीनंतरचा भारत, पानिपत, सर्वोत्तम भुमीपूत्र गौतम बुध्द आदी पुस्तकांना वाचकांनी अधिक पसंती दिल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. या पुस्तकांसोबतच ‘भारतीय संविधान’लाही अधिक मागणी होती.‘श्यामची आई’, ‘शेतकऱ्यांचा आसूड’ हातोहात संपले़़़साने गुरुजी यांचे आत्मचरित्र श्यामची आई पुस्तकास विद्यार्थ्यांकडून मोठी मागणी होती़ बहुतांश पुस्तक विक्रेत्यांकडील श्यामची आई या पुस्तकाच्या प्रती दुसºया दिवशीच संपल्या. संमेलनाच्या तिसºया दिवशी अनेकांना हे पुस्तक मिळाले नाही़ तर महात्मा फुले यांचे शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकाची विक्रीही हातोहात झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले़४८ विक्रेत्यांशी केली चर्चा...संमेलनस्थळी सुमारे १९७ विक्रेत्यांनी स्टॉल उभारले होते. यापैैकी जवळपास ४८ विक्रेत्यांशी चर्चा केली. त्यांच्याशी केलेल्या चर्चेनुसार सुमारे दीड कोटी रूपयांची पुस्तके विक्री झाल्याचे सांगण्यात आले.उस्मानाबाद शहरात साहित्य संमेलन होत असल्याने पुस्तकांची विक्री होईल की नाही, या चिंतेत आम्ही होतो. मात्र, या ठिकाणी स्टॉलवर अपेक्षेपेक्षा अधिक विक्री झाली़ यात तरुणांसह विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग असल्याचे पुस्तक विक्रेते धनंजय माने म्हणाले़