शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
4
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
5
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
6
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
7
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
8
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
9
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
10
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
11
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
12
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
13
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
14
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
15
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
16
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
17
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
18
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
19
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
20
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

नियम माेडणार्या १६५ जणांविरूद्ध दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:32 IST

मुरुम -शहरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालिका आणि पोलीस प्रशासनाकडून नियम माेडणार्यांविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार शहरात विनामास्क ...

मुरुम -शहरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालिका आणि पोलीस प्रशासनाकडून नियम माेडणार्यांविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार शहरात विनामास्क फिरणार्या १४८ जणांकडून २६ हजार ६०० तर नियमांचे उल्लंघन करणार्या १७ दुकानदारांकडून ९ हजार ५०० रूपयांच दंड वसूल करण्यात आला. तसे आठ दुकाने सील करण्यात आली आहेत.

शहरात कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढत असल्याने प्रशासनाकडून कडक निर्बंधांची अमंलबजावणी केली जात आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरात आतापर्यंत २०४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १४९ जणांनी कोरोनावर मात केली असून सध्या ५५ रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. तर या आजाराने शहरात आतापर्यंत चार जणांचा बळी घेतला आहे. शहरात आठ प्रभाग असून प्रत्येक प्रभागात कोरोनाने शिरकाव केला आहे. शहरातील बाजारपेठेशी परिसरातील २५ ते ३० गावांचा व्यवहार निघडीत आहे.त्यामुळे शहराबाहेरील लोकांची खरेदीसाठी नेहमी वर्दळ होत असते. या शिवाय बँका, कृषी उत्पन्न बाजार समिती, दवाखाने असल्याने अत्यावश्यक कामासाठीही परिसरातील लोक शहरात येत असतात. त्यामुळे शहरात कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालिका आणि पोलीस प्रशासनाकडून लॉकडाऊनऊनचे नियम माेडणार्यांविरूद्ध दंडात्मक कारवाई केली जात आहे. यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, कार्यालयीन अधिकक्षक यु. जे. देशपांडे, सहायक नगर रचनाकार विक्रम देवकर, सपोनि यशवंत बारवकर, सपोनि रंगनाथ जगताप, फौजदार शिवदर्शन बिरादार यांच्यासह पालिका आणि पोलीस कर्मचारी नियम ताेडणार्यांवर कारवाईचा बडगा उगारत आहेत. शहरात विनामास्क फिरणार्या १४८ जणांवर कारवाई करीत त्यांच्याकडून २६ हजार ६०० रुपयांचा तर लॉकडाऊनऊनचे नियम तोडून दुकाने चालू ठेवणार्या १७ दुकानदारांकडून ९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच आठ दुकाने सील करण्यात आली आहेत.

चाैकट...

मुरूम शहरातील नागरीक व व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनऊनचे नियम पाळूनच दैनंदिन व्यवहार करावेत. मास्क, शारीरिक अंतर, सॅनिटायझरचा वापर नियमित करावा. कोरोनापासून स्वतःचे व कुटूंबासोबतच शहराचे ही संरक्षण करावे. नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, सपोनि यशवंत बारवकर यांनी केले आहे.