शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

मानधनवाढीचे आश्वासन दोन महिन्यानंतरही हवेतच; पुन्हा संप, राज्यात ७२ हजार आशा, ३९०० गटप्रवर्तकांची परवड

By आशपाक पठाण | Updated: January 13, 2024 18:58 IST

गावस्तरावर राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याचे काम आशांकडून केले जात आहे.

धाराशिव: राज्यातील आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना काम जास्त अन् मोबदला कमी अशी अवस्था झाल्याने दोन महिन्यांपूर्वी पुकारण्यात आलेल्या संपात राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मानवाढीचे आश्वासन दिले. तद्नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गटप्रवर्तकांच्या मानधनवाढीसह अन्य प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. मात्र, दोन महिने लोटले तरी अद्याप त्यावर शासन निर्णय होत नसल्याने ७२ हजार आशा व ३ हजार ९०० गटप्रवर्तकांमध्ये नाराजी वाढली असून शुक्रवारपासून पुन्हा संप सुरू केला आहे.

गावस्तरावर राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याचे काम आशांकडून केले जात आहे. क्षयरोग, कुष्ठरोग रूग्ण शोध मोहिम, गरोदर माता, लसीकरण, कुपोषण, प्रसुती, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या लाभासाठी आयुष्मान कार्ड ऑनलाईन काढणे, गावात आरोग्यविषयक काही शासनाचे उपक्रम आले की सर्वप्रथम लाभार्थ्यांचा दारात जाण्याचे काम आशा करीत आहेत. कोरोना काळात तर आरोग्य विभागाच्या यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून जिवाची पर्वा न करता राष्ट्रीय आरोग्य अभियानातील आशा, गटप्रवर्तक यांनी गावस्तरावर खंबीरपणे काम केले. आरोग्य विभागाचा कणा म्हणून आशा, गटप्रवर्तकांची ओळख निर्माण झाली आहे. गावच्या आरोग्याची २४ तास काळजी घेणाऱ्या आशा, गटप्रवर्तकांना मानधनवाढीचे राज्य शासनाने दिलेले आश्वासन हवेत विरल्याने पुन्हा आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

काम वाढले, मानधनवाढीची नुसतीच चर्चा...आशा, गटप्रवर्तकांना मासिक मानधन वाढीची घोषणा करण्यात आली. आशा स्वयंसेविकांना मासिक ७ हजार रूपये व गटप्रवर्तकांना १० हजार रूपये, दिवाळीत २ हजारांची भाऊबीज देण्याचे आश्वासन संघटनेच्या बैठकीत देण्यात आले होते. त्यामुळे शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तुम्हाला पगार वाढली आता कोणतेही काम करावेच लागेल, असा तगादा लावला. अपेक्षेपोटी ऑनलाईन कामातही आशांनी जोर वाढविला. हिवाळी अधिवेशनात शासन अध्यादेश निघेल या अपेक्षेने बसलेल्या आशांची निराशा झाली आहे.

मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांनी दिले होते आश्वासन...१ नोव्हेंबर रोजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मुंबईत कृती समितीची बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी आशांना दिवाळी भेट २ हजार, वाढीव ७ हजार, गटप्रवर्तकांना ६ हजार २०० देण्याचे आश्वासन दिले. गटप्रवर्तकांना मानधन कमी झाल्याने पुन्हा दहा दिवस संप केला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटप्रवर्तकांना १० हजार वाढ देण्याचे मान्य केले. दोन महिने झाले अजून आदेश निघाला नसल्याने शुक्रवारपासून बेमुदत संप सुरू करण्यात आल्याची माहिती कृती समितीचे अध्यक्ष भगवानराव देशमुख यांनी दिली.

टॅग्स :Strikeसंप