शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई गोवा महामार्गांवर LPG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
2
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
3
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
4
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
5
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
6
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
7
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
8
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
9
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
10
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
11
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
13
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
14
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
15
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
16
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
17
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
18
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
19
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
20
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा

लाॅकडाऊनमुळे खासगी ट्रॅव्हल्सलाही प्रवासी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:33 IST

उस्मानाबाद : राज्य परिवहन महामंडळाची बस प्रवाशांअभावी थांबली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या ये-जा होत नसल्याने प्रवाशांची संख्या रोडावली आहे. ...

उस्मानाबाद : राज्य परिवहन महामंडळाची बस प्रवाशांअभावी थांबली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या ये-जा होत नसल्याने प्रवाशांची संख्या रोडावली आहे. सध्या जिल्ह्यातून लांब पल्ल्याच्या ट्रॅव्हल्स सुरू आहेत. मात्र, नागरिक कोरोनाच्या भीतीने घराबाहेर पडायला तयार नाहीत. त्यामुळे एसटीप्रमाणेच ट्रॅव्हल्सलाही मोठा आर्थिक फटका बसत आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या बसेस बंद आहेत. मात्र, प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी शहरातून नागपूर, मुंबई, औरंगाबाद, पुणे या ठिकाणी ये-जा करण्यासाठी ट्रॅव्हल्सने उपलब्धता करून दिली आहे. असे असतानाही कोरोनाचा प्रकोप पाहता नागरिकांची वर्दळ कमी आहे. अत्यावश्यक कामासाठी नागरिक घराबाहेर पडत आहे. विशेष करून लांब पल्ल्याचा प्रवास करताना स्वत:सह खबरदारी घेत आहेत. यामुळे उस्मानाबादेतून बाहेर जाणाऱ्या व बाहेरून उस्मानाबादेत येणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या मोजकीच आहे. जिल्ह्यात अशा एकूण १२ ते १५ ट्रॅव्हल्स आहेत. सध्या उस्मानाबाद शहरातील ट्रॅव्हल्स बंद आहेत. ट्रॅव्हल्सला पुरेसे प्रवासी मिळत नाहीत. यामुळे टॅव्हल्स मालकही चिंतेत सापडले आहेत. आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी प्रवाशांची संख्या वाढावी, अशी अपेक्षा चालकांना आहे. उस्मानाबाद शहरातील ट्रॅव्हल्स धावत नसल्या तरी निलंगा-पुणे, नागपूर-सोलापूर, सोलापूर-औरंगाबाद, मुंबई -उस्मानाबाद अशा ट्रॅव्हल्स धावत आहेत. प्रवाशांची संख्या कमी आहे. मोठ्या मुश्किलीने उस्मानाबादेत ५० ते ६० प्रवासी येत असल्याची नोंद ट्रॅव्हल्सकडे झाली आहे. दरम्यान, ट्रॅव्हल्स चालकांकडून कोरोना नियमांचे काटेकोर पालन केले जात असल्याचे आढळून आले.

मास्कशिवाय प्रवेश नाही

कोरोना नियमावलीचे पालन करीत वाहतूक व्यवस्था सुरू ठेवण्यात आली आहे. दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात बाधितांची संख्या वाढत आहे. यामुळे नागरिक स्वत:हून मास्क लावल्याशिवाय आतमध्ये प्रवेश करीत नाहीत. याशिवाय जाणाऱ्यांची संख्या कमी असल्याने फिजिकल डिस्टन्स आपोआपच पाळले जाते.

कुणावरही कारवाई नाही

नियमांचे पालन न केल्यास अशा वाहनचालकांवर कारवाई करण्याच्या सूचना आहे. त्यासाठी विविध ठिकाणी वाहनांची तपासणी होत आहे. आतापर्यंत खासगी ट्रॅव्हल्स अनेकवेळा तपासल्या आहेत. मात्र, कुणावरही कारवाई झाली नाही. मास्क आणि फिजिकल डिस्टन्स पाळले गेल्याने ही कारवाई थांबली आहे.

ई-पास कोणाकडेच नाही

बाहेर जाण्यासाठी ई-पासची आवश्यकता आहे. वाहनांना मात्र त्यामधून सूट असल्याचे बोलले जात आहे. कुणाकडेही सध्या ई-पास नाही. वाहतुकीसाठी मोकळीक देण्यात आल्याने ट्रॅव्हल्स दररोज ये-जा करीत आहेत. मात्र, त्यांचे प्रमाण नगण्य आहे.