शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

लाॅकडाऊनमुळे खासगी ट्रॅव्हल्सलाही प्रवासी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:33 IST

उस्मानाबाद : राज्य परिवहन महामंडळाची बस प्रवाशांअभावी थांबली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या ये-जा होत नसल्याने प्रवाशांची संख्या रोडावली आहे. ...

उस्मानाबाद : राज्य परिवहन महामंडळाची बस प्रवाशांअभावी थांबली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या ये-जा होत नसल्याने प्रवाशांची संख्या रोडावली आहे. सध्या जिल्ह्यातून लांब पल्ल्याच्या ट्रॅव्हल्स सुरू आहेत. मात्र, नागरिक कोरोनाच्या भीतीने घराबाहेर पडायला तयार नाहीत. त्यामुळे एसटीप्रमाणेच ट्रॅव्हल्सलाही मोठा आर्थिक फटका बसत आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या बसेस बंद आहेत. मात्र, प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी शहरातून नागपूर, मुंबई, औरंगाबाद, पुणे या ठिकाणी ये-जा करण्यासाठी ट्रॅव्हल्सने उपलब्धता करून दिली आहे. असे असतानाही कोरोनाचा प्रकोप पाहता नागरिकांची वर्दळ कमी आहे. अत्यावश्यक कामासाठी नागरिक घराबाहेर पडत आहे. विशेष करून लांब पल्ल्याचा प्रवास करताना स्वत:सह खबरदारी घेत आहेत. यामुळे उस्मानाबादेतून बाहेर जाणाऱ्या व बाहेरून उस्मानाबादेत येणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या मोजकीच आहे. जिल्ह्यात अशा एकूण १२ ते १५ ट्रॅव्हल्स आहेत. सध्या उस्मानाबाद शहरातील ट्रॅव्हल्स बंद आहेत. ट्रॅव्हल्सला पुरेसे प्रवासी मिळत नाहीत. यामुळे टॅव्हल्स मालकही चिंतेत सापडले आहेत. आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी प्रवाशांची संख्या वाढावी, अशी अपेक्षा चालकांना आहे. उस्मानाबाद शहरातील ट्रॅव्हल्स धावत नसल्या तरी निलंगा-पुणे, नागपूर-सोलापूर, सोलापूर-औरंगाबाद, मुंबई -उस्मानाबाद अशा ट्रॅव्हल्स धावत आहेत. प्रवाशांची संख्या कमी आहे. मोठ्या मुश्किलीने उस्मानाबादेत ५० ते ६० प्रवासी येत असल्याची नोंद ट्रॅव्हल्सकडे झाली आहे. दरम्यान, ट्रॅव्हल्स चालकांकडून कोरोना नियमांचे काटेकोर पालन केले जात असल्याचे आढळून आले.

मास्कशिवाय प्रवेश नाही

कोरोना नियमावलीचे पालन करीत वाहतूक व्यवस्था सुरू ठेवण्यात आली आहे. दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात बाधितांची संख्या वाढत आहे. यामुळे नागरिक स्वत:हून मास्क लावल्याशिवाय आतमध्ये प्रवेश करीत नाहीत. याशिवाय जाणाऱ्यांची संख्या कमी असल्याने फिजिकल डिस्टन्स आपोआपच पाळले जाते.

कुणावरही कारवाई नाही

नियमांचे पालन न केल्यास अशा वाहनचालकांवर कारवाई करण्याच्या सूचना आहे. त्यासाठी विविध ठिकाणी वाहनांची तपासणी होत आहे. आतापर्यंत खासगी ट्रॅव्हल्स अनेकवेळा तपासल्या आहेत. मात्र, कुणावरही कारवाई झाली नाही. मास्क आणि फिजिकल डिस्टन्स पाळले गेल्याने ही कारवाई थांबली आहे.

ई-पास कोणाकडेच नाही

बाहेर जाण्यासाठी ई-पासची आवश्यकता आहे. वाहनांना मात्र त्यामधून सूट असल्याचे बोलले जात आहे. कुणाकडेही सध्या ई-पास नाही. वाहतुकीसाठी मोकळीक देण्यात आल्याने ट्रॅव्हल्स दररोज ये-जा करीत आहेत. मात्र, त्यांचे प्रमाण नगण्य आहे.