शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
3
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
4
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
5
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
6
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
7
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
8
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
9
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
10
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
11
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
12
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
13
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
14
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
15
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
16
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
17
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
18
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
19
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
20
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या

फळभाज्यांचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर, वांगी, शेवग्याचे दर चढेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:20 IST

उस्मानाबाद : सततच्या पावसामुळे फळभाज्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे बाजारात मागणीच्या तुलनेत भाज्यांची आवक कमी आहे. परिणामी वांगी, भेंडी, ...

उस्मानाबाद : सततच्या पावसामुळे फळभाज्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे बाजारात मागणीच्या तुलनेत भाज्यांची आवक कमी आहे. परिणामी वांगी, भेंडी, फ्लॉवरचे दर वाढले आहेत. शेवग्याचा तुटवडा कायम असल्याने शेवगा महागलेलाच आहे. वाढत्या दरामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

सध्या बाजारात गवार ४० ते ५० रुपये, पत्ताकोबी ३० रुपये, फ्लॉवर ३० ते ४० रुपये, भेंडी ३० ते ४० रुपये, वांगी ६० ते ८० रुपये, शेवगा ६० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. पावसामुळे पालेभाज्यांना मागणी कमी आहे. त्यामुळे मेथी, पालक, शेपू, चुका या भाज्यांची जुडी १० रुपयास विक्री होत आहे. हरभरा डाळ, मूग डाळ, तूर डाळ, उडीद डाळ, मसूर डाळीचे दर स्थिर आहेत.

म्हणून भाजीपाला कडाडला

खरीप हंगामात शेतकऱ्यांचा पालेभाज्यांऐवजी सोयाबीन, मूग, उडीद ही पिके घेण्याकडे कल अधिक असतो. ज्या शेतकऱ्यांनी फळभाज्या पालेभाज्यांची लागवड केली आहे. त्या भाजीपाल्याचे पावसाने नुकसान होते. परिणामी, बाजारात मागणीच्या तुलनेत काही फळभाज्यांचा तुडवडा निर्माण होतो. त्यामुळे दर वाढतात.

डाळीचे दर स्थिरच

गतवर्षी कोरोनाच्या लॉकडाऊमुळे फळभाज्या व पालेभाज्यांची लागवड शेतकऱ्यांनी कमी प्रमाणात केली होती

पालेभाज्या व फळभाज्यांचे क्षेत्र घटल्याने मागणीच्या तुलनेत बाजारात भाज्यांची आवक कमी होते. त्यामुळे भाज्यांचे दर वाढले. परिणामी अनेकांनी डाळींना पसंती दिली. डाळींना मागणी वाढल्याने डाळींच्या दरातही मागील सहा महिन्यांपूर्वी ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली हाेती. मागील काही महिन्यांपासून पालेभाज्यांचा स्वत होत्या. त्यामुळे डाळींचे दर स्थिर राहिले आहेत.

डाळींचे दर प्रतिकिलो

हरभरा ६० ते ७०

तूर ९० ते ९५

मूग ९२ ते ९७

उडीद ८८ ते ९५

मसूर ८० ते ८२

भाजीपाल्याचे भाव प्रतिकिलो

बटाटा २५

कांदा ३०

टोमॅटो १०

गवार ४०

भेंडी ४०

शेवगा ८०

वांगी ६०

फ्लॉवर ४०

पत्ताकोबी ३०

दोडका ३०

सर्वसामान्यांचे हाल

कोरोना संसर्गामुळे रोजगार नसल्याने आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यातच भाज्यांचे दर वाढत आहेत. त्यामुळे डाळी खरेदी करण्यावर भर दिला आहे.

अरुणा शिंदे, गृहिणी

पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्याचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यातच दोन तीन महिन्यांच्या कालावधीत खाद्यतेलाचे व डाळींच्या दरातही वाढ होत असते. वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

कोमल वाघमारे, गृहिणी