शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

फळभाज्यांचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर, वांगी, शेवग्याचे दर चढेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:20 IST

उस्मानाबाद : सततच्या पावसामुळे फळभाज्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे बाजारात मागणीच्या तुलनेत भाज्यांची आवक कमी आहे. परिणामी वांगी, भेंडी, ...

उस्मानाबाद : सततच्या पावसामुळे फळभाज्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे बाजारात मागणीच्या तुलनेत भाज्यांची आवक कमी आहे. परिणामी वांगी, भेंडी, फ्लॉवरचे दर वाढले आहेत. शेवग्याचा तुटवडा कायम असल्याने शेवगा महागलेलाच आहे. वाढत्या दरामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

सध्या बाजारात गवार ४० ते ५० रुपये, पत्ताकोबी ३० रुपये, फ्लॉवर ३० ते ४० रुपये, भेंडी ३० ते ४० रुपये, वांगी ६० ते ८० रुपये, शेवगा ६० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. पावसामुळे पालेभाज्यांना मागणी कमी आहे. त्यामुळे मेथी, पालक, शेपू, चुका या भाज्यांची जुडी १० रुपयास विक्री होत आहे. हरभरा डाळ, मूग डाळ, तूर डाळ, उडीद डाळ, मसूर डाळीचे दर स्थिर आहेत.

म्हणून भाजीपाला कडाडला

खरीप हंगामात शेतकऱ्यांचा पालेभाज्यांऐवजी सोयाबीन, मूग, उडीद ही पिके घेण्याकडे कल अधिक असतो. ज्या शेतकऱ्यांनी फळभाज्या पालेभाज्यांची लागवड केली आहे. त्या भाजीपाल्याचे पावसाने नुकसान होते. परिणामी, बाजारात मागणीच्या तुलनेत काही फळभाज्यांचा तुडवडा निर्माण होतो. त्यामुळे दर वाढतात.

डाळीचे दर स्थिरच

गतवर्षी कोरोनाच्या लॉकडाऊमुळे फळभाज्या व पालेभाज्यांची लागवड शेतकऱ्यांनी कमी प्रमाणात केली होती

पालेभाज्या व फळभाज्यांचे क्षेत्र घटल्याने मागणीच्या तुलनेत बाजारात भाज्यांची आवक कमी होते. त्यामुळे भाज्यांचे दर वाढले. परिणामी अनेकांनी डाळींना पसंती दिली. डाळींना मागणी वाढल्याने डाळींच्या दरातही मागील सहा महिन्यांपूर्वी ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली हाेती. मागील काही महिन्यांपासून पालेभाज्यांचा स्वत होत्या. त्यामुळे डाळींचे दर स्थिर राहिले आहेत.

डाळींचे दर प्रतिकिलो

हरभरा ६० ते ७०

तूर ९० ते ९५

मूग ९२ ते ९७

उडीद ८८ ते ९५

मसूर ८० ते ८२

भाजीपाल्याचे भाव प्रतिकिलो

बटाटा २५

कांदा ३०

टोमॅटो १०

गवार ४०

भेंडी ४०

शेवगा ८०

वांगी ६०

फ्लॉवर ४०

पत्ताकोबी ३०

दोडका ३०

सर्वसामान्यांचे हाल

कोरोना संसर्गामुळे रोजगार नसल्याने आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यातच भाज्यांचे दर वाढत आहेत. त्यामुळे डाळी खरेदी करण्यावर भर दिला आहे.

अरुणा शिंदे, गृहिणी

पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्याचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यातच दोन तीन महिन्यांच्या कालावधीत खाद्यतेलाचे व डाळींच्या दरातही वाढ होत असते. वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

कोमल वाघमारे, गृहिणी