शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

मिरचीचा हाती पडलेला ‘दाम’ शेतकऱ्यास फुटला घाम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:33 IST

कळंब : मोठ्या कष्टाने पिकविलेली हिरवी मिरची त्यांनी भल्या पहाटे कळंबला पोहोचविली. दुपारी पट्टी घेण्यासाठी व्यापाऱ्याचे दार गाठले. यावेळी ...

कळंब : मोठ्या कष्टाने पिकविलेली हिरवी मिरची त्यांनी भल्या पहाटे कळंबला पोहोचविली. दुपारी पट्टी घेण्यासाठी व्यापाऱ्याचे दार गाठले. यावेळी हाती आलेला ‘दाम’ पाहून मात्र ‘घाम’ फुटला. कारण शंभर किलोवर मिरचीचे केवळ २३४ रुपये हातात पडले होते. बाजारात मात्र मिरची तीस ते चाळीस रुपयांनी विकली जात होती.

वाशी तालुक्यातील पारा येथील सूर्यकांत पांचाळ या तरुणाने एक एकर मिरचीचे पीक घेतले आहे. यापैकी दुसऱ्या तोडणीचे पीक त्यांनी एका खाजगी वाहनात बुधवारी भल्या पहाटे कळंब येथील ‘त्या’ तथाकथित ‘बीट’ मार्केटला पाठविले.

यानंतर दुपारच्या सुमारास त्या मालाची पट्टी घेण्यासाठी पांचाळ यांनी कळंब गाठले. त्याठिकाणी माल काढला आहे, असे पांचाळ यांना सांगण्यात आले. तद्नंतर पट्टी पाहिली असता मात्र पांचाळ यांना घामच आला.

कारण कष्टाने पिकविलेल्या जवळपास १२० किलो मिरचीची एकूण पट्टी ३४६ रुपये होती. यात ५६ रुपये खर्च कपात करून देय रक्कम २९० रुपये होती. यानंतर बाजारात तीस ते चाळीस रुपयाला आजच्या भावात जात असलेली मिरची तीन रुपयाने घेतल्याने पांचाळ हताश झाले. संताप व्यक्त करूनही समोरून दाद मिळत नसल्याने आपल्यावर झालेल्या अन्यायाची कैफियत मांडण्यासाठी मग बाजार समिती गाठली.

त्यांनी याठिकाणी ‘नरोवा कुंजरोवा’ची भूमिका घेतली. मग गाठले उपविभागीय अधिकारी कार्यालय. तेथे आपल्यावरील आपबिती कथन केली. त्यांना लेखी निवेदन दिले.

लोकप्रतिनिधी, नेत्यांशी संवाद साधला; परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही.

चाैकट...

एकूणच बीटला मिळालेल्या दराच्या दहापट दर बाजारात असताना आपल्या मालाला मिळालेले अल्पमोल पांचाळ सगळ्यांना सांगत होते. मात्र, कोठेही ठोस आधार मिळाला नाही.

शेवटी इतर शेतकऱ्यांप्रमाणेच सूर्यकांत पांचाळ यांच्याही पदरी आलेला कृषी पणन व्यवस्थेचा हा प्रकार पुन्हा एकदा ‘दाद न फिर्याद’ ठरल्याने हताश होत घरचा रस्ता धरावा लागला. अशा प्रकरणाचा दाखला घेत तरी जिल्ह्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या मार्केट कमिटीने तरकारी, फळपिकांची खरेदी करावी असा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.