शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
3
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
4
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
5
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
6
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
7
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
8
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
9
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
10
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
11
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
12
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
13
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
14
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
15
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
16
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
17
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
18
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
19
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
20
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

पाणी टंचाईने उस्मानाबाद जिल्ह्यातील ७० टक्के आरोग्य केंद्रात प्रसूती ठप्प होण्याच्या मार्गावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 20:32 IST

जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांना मात्र, या गंभीर समस्येकडे लक्ष देण्यास वेळ नाही

ठळक मुद्देपाण्याच्या ठणठणाट कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांवरही परिणाम

उस्मानाबाद : ग्रामीण भागातील रूग्णांना वेळेवर आणि नाममात्र दरात आरोग्यसेवा मिळावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आरोग्य केंद्र चालविली जातात. सदरील केंद्रांना डॉक्टरांच्या प्रश्नांसोबतच आता पाणीटंचाईचे चटकेही बसू लागले आहेत. तब्बल ७० टक्के केंद्रात सध्या पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रसूतींसोबतच कुटुंबकल्याण शस्त्रक्रियाही ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. असे असतानाही जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांना मात्र, या गंभीर समस्येकडे लक्ष देण्यास वेळ नाही, हे विशेष.

दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप तसेच रबी हंगामही हाती लागलेला नाही. त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांसह अन्य नागरिकांचे अर्थकारण पूर्णत: कोलमडून पडले आहे. अशा परिस्थित खाजगी दवाखान्या उपचार घेणे ग्रामीण रूग्णांच्या अवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे सर्वसामान्य रूग्णांचा ओढा वाढला आहे. योसाबतच प्रसूती तसेच कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांचे प्रमाणही जानेवारीपर्यंत उत्तम होते. जानेवारीअखेर २ हजार ९६३ कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया तजर ३ हजार २६९ प्रसूती झाल्या आहेत. दरम्यान, जानेवारीनंतर टंचाईची तीव्रता झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे विहीर, बोअरसारखे जलस्त्रोत झपाट्याने कोरडे पडत आहे. याचा फटका आता प्राथमिक आरोग्य केंद्रांना बसू लागला आहे.

आजघडीला जिल्हाभरातील ४२ पैैकी ७० टक्क्यांवर आरोग्य केंद्रात पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला आहे. याचा थेट परिणाम कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया तसेच प्रसूतींच्या संख्येवर होऊ लागाला आहे. आरोग्य केंद्रात वास्तव्यास असलेल्या कर्मचाऱ्यांनाही पाण्यासाठी भकंती करावी लागत आहे. सध्या भूम, परंडा, वाशी, कळंबसह उस्मानाबाद तालुक्यातील अनेक आरोग्य केंद्र पाणी समस्येने हैैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत जि.प. पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतु, तुर्तास तरी तसे होताना दिसत नाही.

दरम्यान, पाच-सहा वर्षांपूर्वीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. प्रसूतींसह कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया ठप्प झाल्या होता. तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी हा प्रश्न जिल्हा परिषद  पदाधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडला होता. प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्रांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे निर्देश दिले होते. ज्या गावात टँकर सुरू आहे, त्याच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असे. तर जेथे टँकर सुरू नव्हते, अशा ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. अशा पद्धतीने आता टँकरद्वारे आरोग्य केंद्रांना पाणीपुरवठा करण्याची गरज निर्माण झाली आहे.

तीन हजारावर शस्त्रक्रिया...एकीकडे शासन कुटुंबकल्याण कार्यक्रमावर भर देत असतानाच दुसरीकडे आरोग्य केंद्रांमध्ये पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला आहे. त्यामुळे याही शस्त्रक्रिया ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. एप्रिल २०१८ ते जानेवारी २०१९ या नऊ महिन्यांच्या कालावधीत भूम तालुक्यातील केंद्रांमध्ये ४४०, कळंब ५२८, लोहारा ५७, उमरगा ३२२, उस्मानाबाद ७२१, परंडा ३०३, तुळजापूर ३५३ आणि वाशी तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रांतर्गत मिळून २३९ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. सदरील शस्त्रक्रियांसाठी पाणी मोठ्या प्रमाणात लागते. परंतु, सध्या टंचाई निर्माण झाल्याने शस्त्रक्रियांच्या संख्येवरही परिणाम होवू लागला आहे.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादPregnancyप्रेग्नंसीUsmanabad z pउस्मानाबाद जिल्हा परिषदUsmanabad civil hospitalजिल्हा रुग्णालय उस्मानाबाद