शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

कळंबमध्ये ‘राजमा’ची दमदार एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:31 IST

कळंब : उत्तर भारतामधील ‘रसोई’ घरात मानाचे स्थान असलेल्या, तितक्याच लज्जतदार व ‘हेल्दी’ राजमाचे उत्पादन आता कळंब तालुक्यातही घेतले ...

कळंब : उत्तर भारतामधील ‘रसोई’ घरात मानाचे स्थान असलेल्या, तितक्याच लज्जतदार व ‘हेल्दी’ राजमाचे उत्पादन आता कळंब तालुक्यातही घेतले जात असून, विविध गावांच्या शिवारात या नव्या पिकाची दमदार ‘एन्ट्री’ झाली आहे.

काळाच्या ओघात पीक पद्धतीत अमूलाग्र बदल होत असतात. बदलते हवामान, प्रचलित पिकांची उत्पादकता, आहारातील स्थान व बाजारातील मागणी अशा काही घटकांमुळे लागवडीखालील पिकांच्या क्षेत्रात बदल नोंदविले गेले आहेत. हे सारे नकळत घडत जाते. खरीप व रब्बी हे दोन्ही प्रमुख पीक हंगाम असलेल्या कळंब तालुक्यातील पीक पद्धतीने काळानुरूप वारंवार अशी ‘कात’ टाकली आहे. मागच्या दोन दशकात तर अशा बदलाची व्याप्ती एवढी जास्त होती की, तालुक्यातील सारे शेती क्षेत्र नव्या वळणावर जाऊन ठेपले आहे. यातूनच अन्नधान्य, कडधान्याचे क्षेत्र घटत तालुक्याची नकळत ‘सोयाबीनचे कोठार’ अशी ओळख निर्माण झाली. यातच सूक्ष्म सिंचन साधनांचा अधिकाधिक वापर करत ‘कमी पाण्यात जास्त क्षेत्र’ सिंचनाखाली आणण्याचाही स्तुत्य प्रयत्न होताना दिसून येत आहे. तालुक्यातील शेती क्षेत्रात असे बदल दृष्टिपथात दिसत असतानाच, लहान कारळे, करडी अशी काही पिके केवळ नावालाच उरल्याचे दिसत आहे.

एकीकडे उत्पादकता, न मानवणारे हवामान यामुळे काही पिके पूर्वेतिहासाचा भाग बनत असताना, मागच्या खरीप हंगामापासून तालुक्यात ‘राजमा’ या नव्या पिकाने दमदार ‘एन्ट्री’ केली आहे. तालुक्यातील ईटकूर, कोठाळवाडी, भोगजी, आडसूळवाडी, आथर्डी आदी अनेक गावांत जवळपास एक हजार एकरच्या आसपास या नव्या पिकांची लागवड होत यशस्वी उत्पादन घेण्यात शेतकऱ्यांना यश आले आहे.

चौकट...

राजमा, घेवडा अन्‌ पावटा

राजमा हे एक बदामाच्या आकाराचा दाणा असलेले शेंगवर्गीय पीक आहे. यास उत्तर भारतात ‘राजमा’, तर पश्चिम महाराष्ट्रात ‘घेवडा’ या नावानेही ओळखतात. यातच कळंब व वाशी तालुक्यातील नवउत्पादक शेतकऱ्यांनी त्यास स्वतःचे असे ‘पावटा’ हे आणखी एक नाव दिले आहे. याची पेरणी करताना एकरी पंचवीस किलो बियाणे लागते; तर आठ ते दहा क्विंटल सरासरी उत्पादन मिळते. यास सध्या नऊ हजारांचा दर असला, तरी आजवर सरासरी सहा हजारांचा दर मिळाला असल्याने चाळीसेक हजारांचे नगदी उत्पन्न देणारे हे कमी जोखमीचे पीक आहे, असे काका मोरे यांनी सांगितले.

बारमाही पीक

राजमा हे वर्षातील तीनही हंगामात घेतले जाणारे पीक आहे. साधारणतः ७५ दिवसांत हाती पडणारे हे पीक खरिपात जून, रब्बीत ऑक्टोबर, तर उन्हाळी पीक जानेवारी, फेब्रुवारीत पेरले जाते. पेरणी ते काढणीदरम्यान केवळ दोन फवारण्या कराव्या लागत असल्याने कमी खर्चिक आहे. चाळीसेक शेंगांना सहा-सात दाणे लागणाऱ्या पिकावर सध्या फक्त माव्याचा प्रादुर्भाव होतो. पाण्याचे योग्य नियोजन केल्यास वर्षातून तीन हंगामात हाती येणारे हे पीक सध्या अनेकांना लळा लावत असल्याने बियाण्याचा दर शिखरावर पोहोचला आहे.

काय होते या शेतमालाचे

उत्तर भारत, पंजाब आदी भागात आहारात ‘राजमा’चे मोठे स्थान आहे. लज्जतदार रस्सा भाजी ते राजमा राईस असे विविध ‘मेनू’ अनेकांना भावतात. शिवाय आरोग्यदायी घटक असल्याने ‘शुगर ते बिपी’ अशा गंभीर आजारांनाही हे पीक हलकं करणारं आहे. उत्तर भारतातील विविध राज्यांच्या आहारात समाविष्ट असल्याने व काही देशात याची मागणी वृद्धिंगत होत असल्याने या ‘हेल्दी’ राजम्याची मागणी वाढत आहे. मागणी, पुरवठा व उत्पादन यांच्या तुलनेत याचे ‘अर्थशास्त्र’ समतोल राहिले तर हे पीक नक्कीच पुढील काळात मुख्य पिकांच्या यादीत दिसून येईल, अन् हा समतोल बिघडला तर बियाण्याचे पैसे निघणेही मुश्किल होईल.