शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

कळंबमध्ये ‘राजमा’ची दमदार एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:31 IST

कळंब : उत्तर भारतामधील ‘रसोई’ घरात मानाचे स्थान असलेल्या, तितक्याच लज्जतदार व ‘हेल्दी’ राजमाचे उत्पादन आता कळंब तालुक्यातही घेतले ...

कळंब : उत्तर भारतामधील ‘रसोई’ घरात मानाचे स्थान असलेल्या, तितक्याच लज्जतदार व ‘हेल्दी’ राजमाचे उत्पादन आता कळंब तालुक्यातही घेतले जात असून, विविध गावांच्या शिवारात या नव्या पिकाची दमदार ‘एन्ट्री’ झाली आहे.

काळाच्या ओघात पीक पद्धतीत अमूलाग्र बदल होत असतात. बदलते हवामान, प्रचलित पिकांची उत्पादकता, आहारातील स्थान व बाजारातील मागणी अशा काही घटकांमुळे लागवडीखालील पिकांच्या क्षेत्रात बदल नोंदविले गेले आहेत. हे सारे नकळत घडत जाते. खरीप व रब्बी हे दोन्ही प्रमुख पीक हंगाम असलेल्या कळंब तालुक्यातील पीक पद्धतीने काळानुरूप वारंवार अशी ‘कात’ टाकली आहे. मागच्या दोन दशकात तर अशा बदलाची व्याप्ती एवढी जास्त होती की, तालुक्यातील सारे शेती क्षेत्र नव्या वळणावर जाऊन ठेपले आहे. यातूनच अन्नधान्य, कडधान्याचे क्षेत्र घटत तालुक्याची नकळत ‘सोयाबीनचे कोठार’ अशी ओळख निर्माण झाली. यातच सूक्ष्म सिंचन साधनांचा अधिकाधिक वापर करत ‘कमी पाण्यात जास्त क्षेत्र’ सिंचनाखाली आणण्याचाही स्तुत्य प्रयत्न होताना दिसून येत आहे. तालुक्यातील शेती क्षेत्रात असे बदल दृष्टिपथात दिसत असतानाच, लहान कारळे, करडी अशी काही पिके केवळ नावालाच उरल्याचे दिसत आहे.

एकीकडे उत्पादकता, न मानवणारे हवामान यामुळे काही पिके पूर्वेतिहासाचा भाग बनत असताना, मागच्या खरीप हंगामापासून तालुक्यात ‘राजमा’ या नव्या पिकाने दमदार ‘एन्ट्री’ केली आहे. तालुक्यातील ईटकूर, कोठाळवाडी, भोगजी, आडसूळवाडी, आथर्डी आदी अनेक गावांत जवळपास एक हजार एकरच्या आसपास या नव्या पिकांची लागवड होत यशस्वी उत्पादन घेण्यात शेतकऱ्यांना यश आले आहे.

चौकट...

राजमा, घेवडा अन्‌ पावटा

राजमा हे एक बदामाच्या आकाराचा दाणा असलेले शेंगवर्गीय पीक आहे. यास उत्तर भारतात ‘राजमा’, तर पश्चिम महाराष्ट्रात ‘घेवडा’ या नावानेही ओळखतात. यातच कळंब व वाशी तालुक्यातील नवउत्पादक शेतकऱ्यांनी त्यास स्वतःचे असे ‘पावटा’ हे आणखी एक नाव दिले आहे. याची पेरणी करताना एकरी पंचवीस किलो बियाणे लागते; तर आठ ते दहा क्विंटल सरासरी उत्पादन मिळते. यास सध्या नऊ हजारांचा दर असला, तरी आजवर सरासरी सहा हजारांचा दर मिळाला असल्याने चाळीसेक हजारांचे नगदी उत्पन्न देणारे हे कमी जोखमीचे पीक आहे, असे काका मोरे यांनी सांगितले.

बारमाही पीक

राजमा हे वर्षातील तीनही हंगामात घेतले जाणारे पीक आहे. साधारणतः ७५ दिवसांत हाती पडणारे हे पीक खरिपात जून, रब्बीत ऑक्टोबर, तर उन्हाळी पीक जानेवारी, फेब्रुवारीत पेरले जाते. पेरणी ते काढणीदरम्यान केवळ दोन फवारण्या कराव्या लागत असल्याने कमी खर्चिक आहे. चाळीसेक शेंगांना सहा-सात दाणे लागणाऱ्या पिकावर सध्या फक्त माव्याचा प्रादुर्भाव होतो. पाण्याचे योग्य नियोजन केल्यास वर्षातून तीन हंगामात हाती येणारे हे पीक सध्या अनेकांना लळा लावत असल्याने बियाण्याचा दर शिखरावर पोहोचला आहे.

काय होते या शेतमालाचे

उत्तर भारत, पंजाब आदी भागात आहारात ‘राजमा’चे मोठे स्थान आहे. लज्जतदार रस्सा भाजी ते राजमा राईस असे विविध ‘मेनू’ अनेकांना भावतात. शिवाय आरोग्यदायी घटक असल्याने ‘शुगर ते बिपी’ अशा गंभीर आजारांनाही हे पीक हलकं करणारं आहे. उत्तर भारतातील विविध राज्यांच्या आहारात समाविष्ट असल्याने व काही देशात याची मागणी वृद्धिंगत होत असल्याने या ‘हेल्दी’ राजम्याची मागणी वाढत आहे. मागणी, पुरवठा व उत्पादन यांच्या तुलनेत याचे ‘अर्थशास्त्र’ समतोल राहिले तर हे पीक नक्कीच पुढील काळात मुख्य पिकांच्या यादीत दिसून येईल, अन् हा समतोल बिघडला तर बियाण्याचे पैसे निघणेही मुश्किल होईल.