शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांत वीजवाहिनी काढून नेल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:33 IST

तामलवाडी : शेतीपंपाच्या वीजजोडणीसाठी डिमांड भरल्यानंतर महावितरणने खांब उभारून वीजजोडणी दिली खरी. मात्र, सहाच महिन्यांत कर्मचाऱ्यांनी येथील वीज वाहिन्या ...

तामलवाडी : शेतीपंपाच्या वीजजोडणीसाठी डिमांड भरल्यानंतर महावितरणने खांब उभारून वीजजोडणी दिली खरी. मात्र, सहाच महिन्यांत कर्मचाऱ्यांनी येथील वीज वाहिन्या काढून नेल्यामुळे तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) शिवारातील शेतकऱ्याची सध्या विजेअभावी गैरसोय होत आहे.

सांगवी (काटी) शिवारात ज्ञानेश्वर विश्वभंर मगर यांची सहा एकर जमीन आहे. पिकाला पाणी देण्यासाठी त्यांनी विहीर खोदली असून, वीजजोडणीसाठी महावितरण कंपनीकडे पाच अश्वशक्तीच्या विद्युत पंपासाठी डिमांड रक्कमदेखील भरली. यानंतर महावितरण कंपनीने ठेकेदारामार्फत विजेचे १६ खांब उभे करून तारा ओढून मगर यांना वीजजोडणी दिली. परंतु, जानेवारी २०२१मध्ये जोडणी केलेल्या तारा वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी काढून नेल्या. त्यामुळे येथील वीजपुरवठा खंडित झाला. मगर यांचे रब्बी हंगामातील पीक पाण्याअभावी वाळून गेले. शिवाय, पाळीव जनावराना घागरीने उपसून पाणी पाजण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. पाण्याअभावी दोन पाळीव जनावरांचा बळीदेखील गेला. त्यामुळे विजेच्या ताराची जोडणी करून शेती पंपासाठी वीजपुरवठा करावा, अशी मागणी मगर यांनी केली आहे.

चौकट.....

अन्यथा उपोषण करू

सांगवी गावापासून पूर्व बाजूस दोन किमी अंतरावर शेतकरी ज्ञानेश्वर मगर यांची शेती असून, तेथे पाच ते सहा पाळीव जनावरे आहेत. विजेअभावी जनावरांची पिण्याच्या पाण्यासाठी गैरसोय होऊ लागल्याने त्यांनी गोठ्यावर मुक्कामी असलेली ही जनावरे आता घराजवळ आणली आहेत. येथे पाणी, वैरणीची सोय करून पशुधन जगविण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. त्यामुळे येत्या १५ दिवसांत वीजजोडणी नाही दिल्यास महावितरण कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.