शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांत वीजवाहिनी काढून नेल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:33 IST

तामलवाडी : शेतीपंपाच्या वीजजोडणीसाठी डिमांड भरल्यानंतर महावितरणने खांब उभारून वीजजोडणी दिली खरी. मात्र, सहाच महिन्यांत कर्मचाऱ्यांनी येथील वीज वाहिन्या ...

तामलवाडी : शेतीपंपाच्या वीजजोडणीसाठी डिमांड भरल्यानंतर महावितरणने खांब उभारून वीजजोडणी दिली खरी. मात्र, सहाच महिन्यांत कर्मचाऱ्यांनी येथील वीज वाहिन्या काढून नेल्यामुळे तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) शिवारातील शेतकऱ्याची सध्या विजेअभावी गैरसोय होत आहे.

सांगवी (काटी) शिवारात ज्ञानेश्वर विश्वभंर मगर यांची सहा एकर जमीन आहे. पिकाला पाणी देण्यासाठी त्यांनी विहीर खोदली असून, वीजजोडणीसाठी महावितरण कंपनीकडे पाच अश्वशक्तीच्या विद्युत पंपासाठी डिमांड रक्कमदेखील भरली. यानंतर महावितरण कंपनीने ठेकेदारामार्फत विजेचे १६ खांब उभे करून तारा ओढून मगर यांना वीजजोडणी दिली. परंतु, जानेवारी २०२१मध्ये जोडणी केलेल्या तारा वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी काढून नेल्या. त्यामुळे येथील वीजपुरवठा खंडित झाला. मगर यांचे रब्बी हंगामातील पीक पाण्याअभावी वाळून गेले. शिवाय, पाळीव जनावराना घागरीने उपसून पाणी पाजण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. पाण्याअभावी दोन पाळीव जनावरांचा बळीदेखील गेला. त्यामुळे विजेच्या ताराची जोडणी करून शेती पंपासाठी वीजपुरवठा करावा, अशी मागणी मगर यांनी केली आहे.

चौकट.....

अन्यथा उपोषण करू

सांगवी गावापासून पूर्व बाजूस दोन किमी अंतरावर शेतकरी ज्ञानेश्वर मगर यांची शेती असून, तेथे पाच ते सहा पाळीव जनावरे आहेत. विजेअभावी जनावरांची पिण्याच्या पाण्यासाठी गैरसोय होऊ लागल्याने त्यांनी गोठ्यावर मुक्कामी असलेली ही जनावरे आता घराजवळ आणली आहेत. येथे पाणी, वैरणीची सोय करून पशुधन जगविण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. त्यामुळे येत्या १५ दिवसांत वीजजोडणी नाही दिल्यास महावितरण कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.