शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
2
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
3
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
4
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
5
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
6
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
7
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
8
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
9
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
10
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
11
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
12
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
13
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
14
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
15
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
16
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
17
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
18
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
19
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
20
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास

विश्रामगृहाची दुरवस्था, वाहक-चालकांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:28 IST

उस्मानाबाद शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने जिल्ह्यासह परजिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात बसेस धावत असतात. चालक-वाहकांवरच एसटीची सेवा अवलंबून असते. त्यामुळे ...

उस्मानाबाद शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने जिल्ह्यासह परजिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात बसेस धावत असतात. चालक-वाहकांवरच एसटीची सेवा अवलंबून असते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना काही क्षण विश्रांती घेता यावी, तसेच लांब पल्ल्याच्या वाहक-चालकांना झोपण्याची सोय व्हावी, यासाठी मध्यवर्ती बस स्थानकालगत विश्रामगृहाची इमारत उभारण्यात आली आहे. या ठिकाणी उस्मानाबाद जिल्ह्यासह औरंगाबाद, कराड या लांब पल्ल्याच्या बस गाड्यांवरील वाहक-चालक आराम करण्यासाठी थांबत असतात. रात्रीच्या वेळी उस्मानाबाद बस आगारात इतर तालुक्यांच्या तुलनेत जास्त चालक-वाहक मुक्कामी असतात. विश्रामगृहाच्या केवळ दोन खोल्या आहेत. त्यामुळे अनेकदा रात्रीच्या वेळी चालक-वाहकांची गर्दी वाढल्यास अनेकांना जागाच मिळत नाही. त्यासाठी विश्रामगृहातील खोल्यांची संख्या वाढवायला हवी, असे मत उस्मानाबाद आगारातील काही चालकांनी व्यक्त केले. लांब पल्ल्याच्या वाहक-चालकांसाठी कोटची सोय करण्यात आलेली आहे. या खोलीतील दोन पैकी एकच पंखा सुरू आहे. जिल्ह्यातील आगाराच्या वाहक-चालकांसाठी एक खोली आहे. या खोलीतील फरशा फुटलेल्या आहेत, तसेच खिडक्यांच्या जाळ्या तुटलेल्या आहेत, शिवाय विश्रामगृहातील शौचालयांची साफसफाई केली जात नाही. यामुळे या शौचालयांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. परिणामी, डासांचा उच्छाद वाढला आहे. रात्री मुक्कामी असलेल्या चालक-वाहकांना यामुळे आपली रात्र जागूनच काढावी लागते. एसटी प्रशासनाने सोईसुविधा पुरविण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही वाहक चालकांतून होत आहे.

चौकट...

वराहाचा मुक्त संचार

बस स्थानकातील विश्रामगृहाच्या इमारतीच्या परिरात वराहाराचा मुक्त संचार असल्याचे आढळून येते. विश्रामगृहाच्या खोल्यांचा दरवाजा उघडा असल्यास, वराह थेट आतमध्येही प्रवेश करीत असतात.

स्वच्छतागृहांची सफाई नाही

लांब पल्ल्याच्या बसगाड्यावरील वाहक-चालकांना विश्रांती घेता यावी, यासाठी विश्रामगृहाची इमारत बांधण्यात आली असली, तरी या इमारतीलगत बांधण्यात आलेले स्वच्छतागृहांची दुरवस्था झालेली आहे. अनेक स्वच्छतागृहाची दरवाजे मोडले आहेत, तर त्याची स्वच्छताही केली जात नाही. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत असते. परिणामी, वाहक-चालक मध्यवर्ती बस स्थानकातील स्वच्छतागृहाचा वापर करीत असतात.

प्रतिक्रिया...

विश्रामगृहाच्या इमारतीतील स्वच्छतागृह वापरण्यायोग्य नाहीत. पिण्याच्या पाण्याचीही सोय इमारतीत नसल्याने पाणी विकत घ्यावे लागते, शिवाय स्वच्छता कर्मचारी नसल्याने वाहक-चालक साफसफाई करून करून घेतात.

-तनवीर खान, चालक

विश्रामगृहाच्या परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे डासाेत्पत्तीही वाढली, वराहाचा वावर असतो. इमारत परिसरातील साफसफाई केली जात नसल्याने दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो.

-आर.पी. सुरवसे, वाहक