शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
3
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
4
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
5
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
6
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
7
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
8
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
9
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
10
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
11
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
12
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
13
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
14
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
15
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
16
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
17
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
18
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
19
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
20
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका

पाॅलिटेक्निकचे ‘तंत्र’ बिघडणार; २१ दिवसांत ८२ विद्यार्थ्यांचेच अर्ज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:21 IST

उस्मानाबाद : दरवर्षी दहावीच्या निकालानंतर पाॅलिटेक्निकच्या अर्ज प्रक्रियेस सुरुवात केली जाते. या वर्षी विद्यार्थ्यांना कागदपत्रे गोळा करण्यासाठी वेळ ...

उस्मानाबाद : दरवर्षी दहावीच्या निकालानंतर पाॅलिटेक्निकच्या अर्ज प्रक्रियेस सुरुवात केली जाते. या वर्षी विद्यार्थ्यांना कागदपत्रे गोळा करण्यासाठी वेळ मिळाला याकरिता ३० जूनपासूनच अर्ज प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. मागील २१ दिवसांत ८२ विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्याची माहिती प्राचार्याने दिली.

यावर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या नाहीत. त्यामुळे मुलांचे वर्षभराचे मूल्यमापन करून निकाल लावण्यात आले. विद्यार्थ्यांना कागदपत्रे गोळा करण्यासाठी वेळ मिळाला याकरिता, पाॅलिटेक्निक प्रवेशासाठी ३० जूनपासून अर्ज प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे.‌ सुरुवातीचे काही दिवस नोंदणीसाठी विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद कमी होता. दहावीच्या निकालानंतर नोंदणीसाठी गती वाढली आहे. मात्र, कागदपत्रांअभावी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी अडचणी येत आहेत. पूर्वी पाॅलिटेक्निकसाठी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात जायचे याचे प्रमाण काही वर्षांपासून कमी झाल्याचे दिसून येत असल्याने दरवर्षी काही ना काही प्रमाणात क्षमतेएवढे विद्यार्थी दिसून येत नाहीत. गतवर्षी १० टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या.

निकाल लागला, आता येणार गती

दहावीचा निकाल लागल्यानंतर पाॅलिटेक्निकचे अर्ज भरण्यासाठी दरवर्षी गती येते. यंदा दहावीच्या निकालाअगोदरच पाॅलिटेक्निक अर्ज भरण्यास सुरुवात केली होती. त्यास प्रतिसाद कमी होता. १६ जुलै रोजी निकाल लागल्यानंतर अर्ज भरण्यासाठी गती आली आहे. कागदपत्रांअभावी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी अडचणी येत आहेत.

गेल्या वर्षी १० टक्के जागा रिक्त

उस्मानाबाद येथील पाॅलिटेक्निक काॅलेजमध्ये एकूण विद्यार्थी क्षमता ३७

० असून गतवर्षी यामधील १० टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या.

विद्यार्थ्यांकडे नॅशनलिटी जात प्रमाणपत्र नाही.

दहावीचा निकाल लागल्यानंतर शाळेकडून विद्यार्थ्यांना टीसी देण्यात येते. मात्र निकालच १६ जुलै रोजी लागल्याने अनेकांना टीसी मिळाली नाही. अर्ज कन्फर्म करण्यासाठी नॅशनॅलिटी बंधनकारक करण्यता आली आहे. मात्र, अनेकांकडे नॅशनॅलिटी नाही. नॅशनॅलिटी नसल्यास पासपोर्ट, निर्गम उतारा ग्राह्य धरला जातो.

अर्ज भरण्याकरिता जातीचे प्रमाणपत्र नाही तसेच काही जणांकडे नाॅनक्रिमिलेयर प्रमाणपत्र नसल्याने ते काढण्यासाठी लगबग सुरू आहे.

कोट...

३० जूनपासून पॉलिटेक्निक प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. २१ जूनपर्यंत ३८५ जणांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ८२ जणांचे अर्ज कन्फर्म झाले आहेत. कागदपत्रांअभावी अर्ज दाखल करण्यासाठी विलंब होत आहे. त्यामुळे तहसील कार्यालयाशी संपर्क साधला आहे.

डॉ. डी. एम. घायटिळक, प्राचार्य पॉलिटेक्निक कॉलेज उस्मानाबाद