उस्मानाबाद : देशातील काही राज्यांत ‘बर्ड फ्लू’ने डाेके वर काढले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनानेही स्थानिक प्रशासनाला खबरदारीचे निर्देश दिले आहेत. असे असतानाच गुरुवारी पाथरूड येथील एका पाेल्ट्री फार्ममधील १६ काेंबड्या दगावल्याने चिंता वाढली आहे. ही माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाचे पथक ‘स्पाॅट’वर दाखल झाले आहे. मृत काेंबड्यांचे नमुने पुणे अथवा भाेपाळ येथील प्रयाेगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.
काेराेनाचे संकट दूर झालेले नसतानाच देशातील काही राज्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’चे संकट उभे ठाकले आहे. हे संकट गांभीर्याने घेत राज्य सरकारकडून जिल्हास्तरीय यंत्रणेला खबरदारीच्या आनुषंगाने उपाययाेजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद पशुसवंर्धन विभागाने जिल्हाभरातील सुमारे साडेचारशेवर पाेल्ट्री फार्मचा सर्व्हे केला. पाेल्ट्री फार्मचालकांना मार्गदर्शनही केले जात आहे. तसेच माेठ्या धरण क्षेत्रावर नजर ठेवण्यात आली आहे. पक्षी दगावल्याचे आढळून आल्यास नमुने प्रयाेगशाळेत पाठविण्याची सूचना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. असे असतानाच मागील दाेन दिवसांत लाेहारा तालुक्यातील खेड येथे सलग दाेन दिवसांत बारा कावळे मृत अवस्थेत आढळून आले. बलसूर येथेही एक कावळा दगावला. यांचे नमुने पुणे येथील प्रयाेगशाळेत पाठिवण्यात आले हाेते. परंतु, तेथून ते भाेपाळच्या प्रयाेगशाळेत धाडले आहेत. त्यामुळे अद्याप अहवाल आलेला नसतानाच भूम तालुक्यातील पाथरूड येथील तिकटे नामक एका शेतकऱ्याच्या पाेल्ट्री फार्ममधील बुधवार व गुरुवार अशा दाेन दिवसांत १६ काेंबड्या दगावल्या आहेत. या काेंबड्या साधारपणे ४५ दिवसांच्या असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, ही माहिती समजताच जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. नामदेव आघाव आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. मृत काेंबड्यांचे नमुने पुणे अथवा भाेपाळ येथील प्रयाेगशाळेत पाठविले जाणार आहेत.
काेट...
जिल्ह्यात पक्षी वा काेंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याची अद्याप एकही केस आढळून आलेली नाही. या आजाराच्या आनुषंगाने जिल्हाभरातील साडेचारशेवर पाेल्ट्री फार्मचा सर्व्हे केला आहे. मृत आढळून आलेल्या कावळ्यांचे नमुने प्रयाेगशाळेत पाठविले आहेत. हाही अहवाल प्रलंबित आहे. गुरुवारी पाथरूड येथील पाेल्ट्री फार्ममधील १६ काेंबड्या दगावल्या आहेत. यांचेही नमुने प्रयाेग शाळेत पाठविले जातील.
-डाॅ. नामदेव आघाव, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद