शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

पाथरूडमध्ये १६ काेंबड्या दगावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:27 IST

उस्मानाबाद : देशातील काही राज्यांत ‘बर्ड फ्लू’ने डाेके वर काढले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनानेही स्थानिक प्रशासनाला खबरदारीचे निर्देश दिले ...

उस्मानाबाद : देशातील काही राज्यांत ‘बर्ड फ्लू’ने डाेके वर काढले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनानेही स्थानिक प्रशासनाला खबरदारीचे निर्देश दिले आहेत. असे असतानाच गुरुवारी पाथरूड येथील एका पाेल्ट्री फार्ममधील १६ काेंबड्या दगावल्याने चिंता वाढली आहे. ही माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाचे पथक ‘स्पाॅट’वर दाखल झाले आहे. मृत काेंबड्यांचे नमुने पुणे अथवा भाेपाळ येथील प्रयाेगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.

काेराेनाचे संकट दूर झालेले नसतानाच देशातील काही राज्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’चे संकट उभे ठाकले आहे. हे संकट गांभीर्याने घेत राज्य सरकारकडून जिल्हास्तरीय यंत्रणेला खबरदारीच्या आनुषंगाने उपाययाेजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद पशुसवंर्धन विभागाने जिल्हाभरातील सुमारे साडेचारशेवर पाेल्ट्री फार्मचा सर्व्हे केला. पाेल्ट्री फार्मचालकांना मार्गदर्शनही केले जात आहे. तसेच माेठ्या धरण क्षेत्रावर नजर ठेवण्यात आली आहे. पक्षी दगावल्याचे आढळून आल्यास नमुने प्रयाेगशाळेत पाठविण्याची सूचना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. असे असतानाच मागील दाेन दिवसांत लाेहारा तालुक्यातील खेड येथे सलग दाेन दिवसांत बारा कावळे मृत अवस्थेत आढळून आले. बलसूर येथेही एक कावळा दगावला. यांचे नमुने पुणे येथील प्रयाेगशाळेत पाठिवण्यात आले हाेते. परंतु, तेथून ते भाेपाळच्या प्रयाेगशाळेत धाडले आहेत. त्यामुळे अद्याप अहवाल आलेला नसतानाच भूम तालुक्यातील पाथरूड येथील तिकटे नामक एका शेतकऱ्याच्या पाेल्ट्री फार्ममधील बुधवार व गुरुवार अशा दाेन दिवसांत १६ काेंबड्या दगावल्या आहेत. या काेंबड्या साधारपणे ४५ दिवसांच्या असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, ही माहिती समजताच जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. नामदेव आघाव आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. मृत काेंबड्यांचे नमुने पुणे अथवा भाेपाळ येथील प्रयाेगशाळेत पाठविले जाणार आहेत.

काेट...

जिल्ह्यात पक्षी वा काेंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याची अद्याप एकही केस आढळून आलेली नाही. या आजाराच्या आनुषंगाने जिल्हाभरातील साडेचारशेवर पाेल्ट्री फार्मचा सर्व्हे केला आहे. मृत आढळून आलेल्या कावळ्यांचे नमुने प्रयाेगशाळेत पाठविले आहेत. हाही अहवाल प्रलंबित आहे. गुरुवारी पाथरूड येथील पाेल्ट्री फार्ममधील १६ काेंबड्या दगावल्या आहेत. यांचेही नमुने प्रयाेग शाळेत पाठविले जातील.

-डाॅ. नामदेव आघाव, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद