शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

वीज पडून पशुधन दगावलेल्या पालकांना मदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:09 IST

अजित चंदनशिवे तुळजापूर : तालुक्यात एप्रिल व मे या दोन महिन्यांत वीज पडून १९ पशुपालकांची ५१ जनावरे दगावली होती. ...

अजित चंदनशिवे

तुळजापूर : तालुक्यात एप्रिल व मे या दोन महिन्यांत वीज पडून १९ पशुपालकांची ५१ जनावरे दगावली होती. प्रशासनाने याचे पंचनामे केल्यानंतर यातील ६ शेतकरी, पशुपालकांच्या ७ जनावरांचे प्रस्ताव शासन निकषानुसार अपात्र ठरले. त्यामुळे उर्वरित ४४ जनावरांच्या पालकांना मदत मिळावी यासाठी तहसील स्तरावरून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले असून, अद्याप एकाही पशुपालकाला ही मदत मिळालेली नाही. त्यामुळे हे पशुपालक सध्या आर्थिक अडचणीचा सामना करीत आहेत.

कधी कमी तर कधी जास्त पाऊस, वादळी पाऊस, गारपीट यासारख्या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांना नेहमीच फटका बसतो. त्यातच एखादे पशुधन दगावले तरी शेतकऱ्याचे मोठे नुकसान होते. त्यामुळेच शासनाकडून नैसर्गिक आपत्ती म्हणून वीज पडून दगावलेल्या जनावरांपोटी पशुपालक व शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. तुळजापूर तालुक्यात एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत वडाचा तांडा, गुळहळ्ळी, निलेगाव, होर्टी, गुजनूर, चिकुंद्रा, पांगरधरवाडी, केमवाडी, बारूळ, कामठा, सावरगाव, दीपकनगर तांडा, काटगाव, वडगाव देव, चिवरी, फुलवाडी, आरळी (खु.) आदी गावांतील १९ शेतकरी, पशुपालकांची ५१ जनावरे दगावली. त्यामध्ये शासन निकषानुसार गुजनूर, चिकुंद्रा, केमवाडी, सावरगाव, चिवरी, फुलवाडी येथील ७ जनावरांचे प्रस्ताव अपात्र ठरले. तर उर्वरित १२ मोठी दुधाळ जनावरे, ओढकाम करणारे ४ मोठी, २ लहान जनावरे तसेच २६ शेळ्यांचे प्रस्ताव पात्र ठरले. यानुसार तहसील प्रशासनाकडे याच्या मदतीसाठी वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव दाखल केले; परंतु शासनाकडून अद्यापही ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात तहसीलदार सौदागर तांदळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, निधीची मागणी केली आहे. सर्व प्रस्ताव शासन स्तरावर रीतसर पाठविले आहेत.

चौकट........

पाच लाखांची मदत, तीही वेळेत मिळेना

तालुक्यात वीज पडून दगावलेली ४४ जनावरे आहेत. यासाठी शेतकरी, पशुपालक यांना मदतीसाठी ५ लाख ६१ हजार रुपयांचा निधी आवश्यक आहे; परंतु तोही शासनाकडे उपलब्ध नसल्यामुळे नैसर्गिक आपत्ती येऊनही पशुपालकांना वेळेत मदत मिळत नसल्याचे दिसत आहे.

कोट.......

मी शेती करून कुटुंबाची उपजीविका भागवितो. निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. शेतीला पूरक म्हणून मी दुग्ध व्यवासयही करतो; परंतु एप्रिल महिन्यात दूध व्यवसायासाठी असलेल्या म्हशी व गाय वीज पडून दगावले. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याला चार महिन्यांचा कालावधी लोटला तरी शासनाकडून मदत मिळालेली नाही.

- तानाजी शिंदे, पांगरधरवाडी