शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
3
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
4
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
5
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
6
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
7
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
8
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
9
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
10
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
11
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
12
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
13
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
14
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
15
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
16
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
17
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
18
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
19
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
20
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?

वीज पडून पशुधन दगावलेल्या पालकांना मदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:09 IST

अजित चंदनशिवे तुळजापूर : तालुक्यात एप्रिल व मे या दोन महिन्यांत वीज पडून १९ पशुपालकांची ५१ जनावरे दगावली होती. ...

अजित चंदनशिवे

तुळजापूर : तालुक्यात एप्रिल व मे या दोन महिन्यांत वीज पडून १९ पशुपालकांची ५१ जनावरे दगावली होती. प्रशासनाने याचे पंचनामे केल्यानंतर यातील ६ शेतकरी, पशुपालकांच्या ७ जनावरांचे प्रस्ताव शासन निकषानुसार अपात्र ठरले. त्यामुळे उर्वरित ४४ जनावरांच्या पालकांना मदत मिळावी यासाठी तहसील स्तरावरून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले असून, अद्याप एकाही पशुपालकाला ही मदत मिळालेली नाही. त्यामुळे हे पशुपालक सध्या आर्थिक अडचणीचा सामना करीत आहेत.

कधी कमी तर कधी जास्त पाऊस, वादळी पाऊस, गारपीट यासारख्या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांना नेहमीच फटका बसतो. त्यातच एखादे पशुधन दगावले तरी शेतकऱ्याचे मोठे नुकसान होते. त्यामुळेच शासनाकडून नैसर्गिक आपत्ती म्हणून वीज पडून दगावलेल्या जनावरांपोटी पशुपालक व शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. तुळजापूर तालुक्यात एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत वडाचा तांडा, गुळहळ्ळी, निलेगाव, होर्टी, गुजनूर, चिकुंद्रा, पांगरधरवाडी, केमवाडी, बारूळ, कामठा, सावरगाव, दीपकनगर तांडा, काटगाव, वडगाव देव, चिवरी, फुलवाडी, आरळी (खु.) आदी गावांतील १९ शेतकरी, पशुपालकांची ५१ जनावरे दगावली. त्यामध्ये शासन निकषानुसार गुजनूर, चिकुंद्रा, केमवाडी, सावरगाव, चिवरी, फुलवाडी येथील ७ जनावरांचे प्रस्ताव अपात्र ठरले. तर उर्वरित १२ मोठी दुधाळ जनावरे, ओढकाम करणारे ४ मोठी, २ लहान जनावरे तसेच २६ शेळ्यांचे प्रस्ताव पात्र ठरले. यानुसार तहसील प्रशासनाकडे याच्या मदतीसाठी वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव दाखल केले; परंतु शासनाकडून अद्यापही ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात तहसीलदार सौदागर तांदळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, निधीची मागणी केली आहे. सर्व प्रस्ताव शासन स्तरावर रीतसर पाठविले आहेत.

चौकट........

पाच लाखांची मदत, तीही वेळेत मिळेना

तालुक्यात वीज पडून दगावलेली ४४ जनावरे आहेत. यासाठी शेतकरी, पशुपालक यांना मदतीसाठी ५ लाख ६१ हजार रुपयांचा निधी आवश्यक आहे; परंतु तोही शासनाकडे उपलब्ध नसल्यामुळे नैसर्गिक आपत्ती येऊनही पशुपालकांना वेळेत मदत मिळत नसल्याचे दिसत आहे.

कोट.......

मी शेती करून कुटुंबाची उपजीविका भागवितो. निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. शेतीला पूरक म्हणून मी दुग्ध व्यवासयही करतो; परंतु एप्रिल महिन्यात दूध व्यवसायासाठी असलेल्या म्हशी व गाय वीज पडून दगावले. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याला चार महिन्यांचा कालावधी लोटला तरी शासनाकडून मदत मिळालेली नाही.

- तानाजी शिंदे, पांगरधरवाडी