शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
2
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
3
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
4
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
5
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
6
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव
7
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
8
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
9
सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!
10
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
11
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
12
संतापजनक! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये वापरलेल्या प्लेट्स धुवून दिलं जेवण, प्रवाशांच्या जीवाशी खेळ
13
'द केरला स्टोरी' फेम अदा शर्माचं खरं नाव माहितीये? वेगळं नाव का वापरावं लागलं? म्हणाली...
14
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियानं केल्या १३६ धावा, पण ऑस्ट्रेलियाला मिळालं १३१ धावांचं टार्गेट; कारण...
15
IAS Pawan Kumar : आईने विकले दागिने, वडिलांनी मजुरी करून शिकवलं; लेकाने IAS होऊन कष्टाचं सोनं केलं
16
"गोंद्या आला रे...पुष्पा आला रे...", बोगस मतदान रोखण्यासाठी मनसेचा कोडवर्ड; अविनाश जाधव, राजू पाटलांनी सांगितला प्लान!
17
एका घोटाळ्यामुळे ११७ वर्षांचा इतिहास संपुष्टात! 'हा' शेअर बाजार कायमचा बंद होणार; सेबीची विक्रीला मंजुरी
18
फक्त टार्गेट वाढतं, पगार नाही; कर्मचाऱ्याचा राजीनामा होतोय तुफान व्हायरल, कंपनी म्हणते...
19
"आम्ही ९ ते ५ जॉब करणाऱ्यांपेक्षा जास्त मेहनत करतो...", काजोल बरळली, म्हणाली- "आम्हाला १२-१४ तास..."
20
Raj Thackeray: तो मतदार आला की पकडलाच म्हणून समजा...! मनसेने रचला सापळा; राज ठाकरेंचे घणाघाती भाषण...

परंड्यात परशुराम जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:31 IST

मशागतींना वेग उस्मानाबाद : तालुक्यातील आळणी येथे खरीपपूर्व कामांना वेग आला आहे. रखरखत्या उन्हातही शेतकरी मशागतीच्या कामात मग्न ...

मशागतींना वेग

उस्मानाबाद : तालुक्यातील आळणी येथे खरीपपूर्व कामांना वेग आला आहे. रखरखत्या उन्हातही शेतकरी मशागतीच्या कामात मग्न असल्याचे शेतशिवारात पाहावयास मिळत आहे. मशागतीच्या कामासाठी शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टरला पसंती दिली जात आहे. त्यामुळे वेळेची बचत होते. त्यामुळे परंपरागत बैलजोडीऐवजी शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टरला अधिक मागणी वाढली आहे. अगाेदरच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी तरी खरीप हंगाम साथ देईल, अशी अशा बाळगून शेतकरी जाेमाने कामाला लागले आहे.

तालुकाध्यक्षपदी माळवदकर यांची निवड

लोहारा : येथील अक्षता माळवदकर यांची राष्ट्रवादी युवकी काँग्रेसच्या लोहारा तालुकाध्यक्षपदी निवड कण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांच्या शिफारशीनुसार जिल्हाध्यक्षा दीपाली सूर्यवंशी यांच्या हस्ते त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. याबद्दल राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, सुनील साळुंके, नाना पाटील, सुलोसना रसाळ, सुनील ठेले, बाळासाहेब लांडगे, हाजीबाबा शेख, शरिफा सय्यद, निहाल मुजावर, हेमंत माळवदकर, आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

‘मराठा समाजाला आरक्षण लागू करा’

उस्मानाबाद : सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले आरक्षण हे मराठा समाजावर अन्याय करणारे आहे. त्यामुळे मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गामध्ये आरक्षण द्यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. निवेदनावर ॲड. तानाजी चाैधरी, अतुल गायकवाड, आशिष पाटील, संदीप लाकाळ, बालाजी नाईकनवरे, हनुमान हुंबे, प्रदीप जाधव, दिनेश चाैगुले, सर्जेराव गायकवाड, धनराज बिराजदार, राजकुमार देशमुख, आकाश मुंडे, मनोज पाटील, विकास गडकर, आदित्य देशमुख, दत्ता कवडे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

तलावातील पाणी उपसा बंद करण्याची मागणी

परंडा : तालुक्यातील अनाळा येथील उपसा सिंचन तलावातील पाणी उपसा बंद करावा, या मागणीचे निवेदन ग्रामपंचायतीसह ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, अनाळ, इनगोंदा या गावासाठी पिण्याचे पाणी, जनावरांसाठीच्या पाण्याची सोय तलावातून केली जाते. तलावात सद्य:स्थितीत मृत अवस्थेत पाणी साठा आहे. तरीही काही शेतकरी शेतीसाठी पाण्याचा उपसा करीत आहेत. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाईला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा पाणी उपसा बंद करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

‘कोरोनाग्रस्त रुग्णांना जनआरोग्य योजनेचा लाभ द्या’

उस्मानाबाद : सध्या जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार देण्यात यावेत, अशी मागणी जनता दलाचे (से.) प्रदेश कार्याध्यक्ष ॲड. रेवण भोसले यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. निवेदनात म्हटले आहे, अनेक नागरिक खासगी रुग्णालयात आर्थिक भुर्दंड सहन करून उपचार घेत आहेत. त्यामुळे त्यातील पात्र रुग्णांचा या योजनेत समावेश करून त्यांना याचा लाभ देण्यात यावा, असेही म्हटले आहे.

जागजीत आरोग्य सर्वेक्षण मोहीम

उस्मानाबाद : तालुक्यातील जागजी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने डोअर टू डोअर सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नानासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत गावात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी सरपंच बापू बनसोडे, उपसरपंच वैजिनाथ सावंत, ग्रामसेवक सचिन वाघे, पोलीस पाटील सुभाष कदम, तलाठी कासराळे, दीपक सावंत, चंद्रकांत माळी, रणधीर पाटील, आदी उपस्थित होते. यावेळी गावातील प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले. यासाठी नऊ टीम कार्यरत करण्यात आल्या आहेत.