शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबादेत काेराेना लस ‘वेस्टेज’चे प्रमाण शून्य टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:24 IST

उस्मानाबाद : मध्यंतरी राज्यात विराेधी पक्षाने काेराेना लस वेस्टेजचा मुद्दा चांगलाच लावून धरला हाेता. त्यावरून माेठ्या प्रमाणात आराेप-प्रत्याराेपही झाले. ...

उस्मानाबाद : मध्यंतरी राज्यात विराेधी पक्षाने काेराेना लस वेस्टेजचा मुद्दा चांगलाच लावून धरला हाेता. त्यावरून माेठ्या प्रमाणात आराेप-प्रत्याराेपही झाले. यानंतर, तज्ज्ञांनी काही अंशी वेस्टेज असतेच, असेही सांगिले. मात्र, उस्मानाबाद जिल्हा यास पूर्णपणे अपवाद ठरला आहे. १०० पैकी १०० डाेस उपयाेगात आणले जात आहेत. म्हणजेच शून्य टक्के वेस्टेज आहे. मराठवाड्यात उस्मानाबाद हा असा एकमेव जिल्हा आहे, तर दुसरीकडे नांदेड लसीच्या वेस्टेजमध्ये अव्वल आहे. वेस्टेजचे प्रमाण १२.५ टक्के एवढे आहे.

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून काेराेना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ हाेत आहे. साेबतच मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. असे असतानाही जिल्हास्तरीय आराेग्य यंत्रणेला मागणीनुसार लस उपलब्ध हाेत नाही. उपलब्ध झालेले डाेस संपल्यानंतर चार-चार दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. अशा वेळी उपलब्ध लसीचा एकही डाेस वाया जाणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र, उस्मानाबाद वगळता मराठवाड्यातील एकाही जिल्ह्यात असे चित्र पाहावयास मिळत नाही. उस्मानाबादच्या आराेग्य यंत्रणेला १०० डाेस प्राप्त झाल्यास हे सर्व डाेस उपयाेगात आणले जात आहेत. म्हणजेच एकही डाेस वाया जाऊ दिला जात नाही. मध्यंतरी केंद्राचे पथक जिल्ह्यात आले हाेते. या पथकानेही ‘शून्य टक्के वेस्टेज’बद्दल लस विभागाच्या पाठीवर काैतुकाची थाप टाकली हाेती. अशा प्रकारे शून्य टक्के वेस्टेजचे उद्दिष्ट गाठणारा उस्मानाबाद हा मराठवाड्यातील एकमेव जिल्हा ठरला आहे, तर दुसरीकडे इतर जिल्ह्यातील लसीच्या वेस्टेजचे प्रमाण सध्याच्या शाॅर्टेजच्या काळात चिंता वाढविणारे आहे. लस वाया घालविण्यात नांदेड सर्वात पुढे आहे. यांचे वेस्टेजचे प्रमाण साधारपणे १२.५ टक्क्यांच्या आसपास आहे. म्हणजेच १०० पैकी जवळपास १२ डाेस वाया जाताहेत. हेच लातूरचे प्रमाण ५.५ टक्के, बीड ६.४७ टक्के, परभणी ८.४ टक्के, जालना ८.५ टक्के, हिंगाेली ५.१ टक्के तर मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळख असलेल्या औरंगाबादेत वेस्टेजचे प्रमाण ६.९ टक्के एवढे आहे. उपराेक्त जिल्ह्यांनी वेस्टेजचे प्रमाण शून्यावर आणल्यास, त्याचा शेकडाे नागरिकांना फायदा हाेऊ शकताे.

चाैकट...

केंद्राच्या टीमकडून काैतुक...

बाधितांचे प्रमाण आणि मृत्युदर वाढल्यानंतर मध्यंतरी केंद्र सरकारचे एक पथक जिल्ह्यात आले हाेते. यावेळी उस्मानाबादमध्ये लसीच्या वेस्टेजचे प्रमाण शून्य टक्के व कव्हरेचही माेठे असल्याचे समाेर आल्यानंतर संबंधित पथकाने लस विभागाचे काैतुक केले, तसेच काही सेंटरला भेट देऊन पाहणीही केली.

तीन दिवसांपासून प्रतीक्षा...

जिल्हा आराेग्य यंत्रणेने लसीकरणाची क्षमता माेठ्या प्रमाणात वाढविली आहे. सध्या २११ गव्हर्नमेंट तर ५ खासगी सेंटर आहेत. या सेंटरमधून लस दिली जात आहे. रविवारी लसीचे १५ हजार डाेस मिळाल्यानंतर साेमवारी दुपारपर्यंत लसीकरण पूर्ण करण्यात आले. लागलीच १ लाख डाेसची मागणी करण्यात आली, परंतु तीन दिवसांचा कालावधी लाेटला असतानाही लसीचा एकही डाेस मिळालेला नाही.