शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

उस्मानाबाद जिल्ह्यातील दीड हजार दूध संस्था अवसायानात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 19:41 IST

या सर्व संस्थांच्या माध्यमातून होणारे दूध संकलन अवघ्या १० हजारावर येऊन ठेपले आहे.

ठळक मुद्देदूध संकलनात मोठी घटजिल्ह्यात साठच संस्था सुरू

उस्मानाबाद : खाजगी दूध संकलकांचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारल्यामुळे जिल्ह्यातील सहकारी दूध संस्था अडचणीत आल्या आहेत. अशा संस्थांवर अवसायक नेमण्याची नामुष्की ओढावली आहे. आजवर सुमारे दीड हजारावर संस्था अवसायनात निघाल्या आहेत. या सर्व संस्थांच्या माध्यमातून होणारे दूध संकलन अवघ्या १० हजारावर येऊन ठेपले आहे.

काही दशकांपूर्वी जिल्ह्यात सहकारी दूध संस्थांचे जाळे भक्कम होते. प्रतिदिन लाखो लिटर दूध संकलन या संस्थांद्वारे केले जात होते. या संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित साधले जात असे. मध्यंतरीच्या काळात या व्यवसायात खाजगी संकलकांनी उडी घेतली. गावोगावी संकलन केंद्र सुरू केली. दूध उत्पादक शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी सहकारी संस्थांपेक्षा जास्त दर दिला जाऊ लागला. त्यामुळे शेतकरी खाजगी संकलन केंद्राकडे वळले. आणि याचाच फटका सहकारी दूध संस्थांना बसला. दूध संकलन जसजसे कमी-कमी होत गेले त्यानुसार संस्थांही अडचणीत येऊ लागल्या. आजघडीला जिल्हाभरातील थोड्याथोडक्या नव्हे, तर तब्बल १ हजार ५६८ सहकारी संस्था अवसायनात काढण्याची नामुष्की संबंधित कार्यालयावर ओढावली आहे.

यामध्ये भूम तालुक्यातील सर्वाधिक ३६४ संस्थांचा समावेश आहे. यानंतर परंडा तालुक्यातील ३२०, उस्मानाबाद ३११, तुळजापूर ५५, वाशी १३८, कळंब २३३, लोहारा ५४ आणि उमरगा तालुक्यातील ८५ संस्थांचा समावेश आहे. अवसायनात निघालेल्या संस्थांची संख्या लक्षात घेता सध्या केवळ साठच्या आसपास संस्था सुरू आहेत. या संस्थांकडून साधारपणे १० हजार लिटरच्या आसपास दूध संकलन केले जात आहे. दरम्यान, या सर्व परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे अशा संस्थांना पुन्हा बळ देण्याची गरज आता दूध उत्पादकांतून व्यक्त होऊ लागली आहे.

साठच संस्था सुरू....सहकारी दूध संस्थांना ना शासनाकडून प्रोत्साहन मिळत आहे ना सोयी सुविधा. त्यामुळे सदरील संस्थांच्या अडचणींमध्ये दिवसागणिक भर पडू लागली आहे. १ हजार ६२८ पैकी सुमारे १ हजार ५६८ संस्था अवसायनात निघाल्या आहेत. आजडीला केवळ ६० संस्था सुरू आहेत. यामध्ये उस्मानाबाद आठ, तुळजापूर दहा, परंडा सात, भूम सतरा, वाशी पाच, लोहारा पाच आणि उमरगा तालुक्यातील तीन संस्थांचा समावेश आहे. 

दूध संकलनात मोठी घट...काही वर्षांपूर्वी भूम येथील शासकीय दूध योजनेच्या माध्यमातून प्रतिदिन सुमारे ५ लाख लिटर दूध संकलन होत असे. परंतु, साडेतीनशेवर संस्था अवसायनात निघाल्यामुळे हे संकलन आता अवघ्या सात ते आठ हजारावर आले आहे. उमरगा येथील योजनेतून प्रतिदिन ४ हजार लिटर दूध संकलन होत असे. सध्या हे प्रमाण पावणेतीन हजार लिटरपर्यंत खाली आले आहे. याचाही फटका शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे.

टॅग्स :milkदूधMilk Supplyदूध पुरवठाFarmerशेतकरी