शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

उस्मानाबाद जिल्ह्यातील दीड हजार दूध संस्था अवसायानात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 19:41 IST

या सर्व संस्थांच्या माध्यमातून होणारे दूध संकलन अवघ्या १० हजारावर येऊन ठेपले आहे.

ठळक मुद्देदूध संकलनात मोठी घटजिल्ह्यात साठच संस्था सुरू

उस्मानाबाद : खाजगी दूध संकलकांचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारल्यामुळे जिल्ह्यातील सहकारी दूध संस्था अडचणीत आल्या आहेत. अशा संस्थांवर अवसायक नेमण्याची नामुष्की ओढावली आहे. आजवर सुमारे दीड हजारावर संस्था अवसायनात निघाल्या आहेत. या सर्व संस्थांच्या माध्यमातून होणारे दूध संकलन अवघ्या १० हजारावर येऊन ठेपले आहे.

काही दशकांपूर्वी जिल्ह्यात सहकारी दूध संस्थांचे जाळे भक्कम होते. प्रतिदिन लाखो लिटर दूध संकलन या संस्थांद्वारे केले जात होते. या संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित साधले जात असे. मध्यंतरीच्या काळात या व्यवसायात खाजगी संकलकांनी उडी घेतली. गावोगावी संकलन केंद्र सुरू केली. दूध उत्पादक शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी सहकारी संस्थांपेक्षा जास्त दर दिला जाऊ लागला. त्यामुळे शेतकरी खाजगी संकलन केंद्राकडे वळले. आणि याचाच फटका सहकारी दूध संस्थांना बसला. दूध संकलन जसजसे कमी-कमी होत गेले त्यानुसार संस्थांही अडचणीत येऊ लागल्या. आजघडीला जिल्हाभरातील थोड्याथोडक्या नव्हे, तर तब्बल १ हजार ५६८ सहकारी संस्था अवसायनात काढण्याची नामुष्की संबंधित कार्यालयावर ओढावली आहे.

यामध्ये भूम तालुक्यातील सर्वाधिक ३६४ संस्थांचा समावेश आहे. यानंतर परंडा तालुक्यातील ३२०, उस्मानाबाद ३११, तुळजापूर ५५, वाशी १३८, कळंब २३३, लोहारा ५४ आणि उमरगा तालुक्यातील ८५ संस्थांचा समावेश आहे. अवसायनात निघालेल्या संस्थांची संख्या लक्षात घेता सध्या केवळ साठच्या आसपास संस्था सुरू आहेत. या संस्थांकडून साधारपणे १० हजार लिटरच्या आसपास दूध संकलन केले जात आहे. दरम्यान, या सर्व परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे अशा संस्थांना पुन्हा बळ देण्याची गरज आता दूध उत्पादकांतून व्यक्त होऊ लागली आहे.

साठच संस्था सुरू....सहकारी दूध संस्थांना ना शासनाकडून प्रोत्साहन मिळत आहे ना सोयी सुविधा. त्यामुळे सदरील संस्थांच्या अडचणींमध्ये दिवसागणिक भर पडू लागली आहे. १ हजार ६२८ पैकी सुमारे १ हजार ५६८ संस्था अवसायनात निघाल्या आहेत. आजडीला केवळ ६० संस्था सुरू आहेत. यामध्ये उस्मानाबाद आठ, तुळजापूर दहा, परंडा सात, भूम सतरा, वाशी पाच, लोहारा पाच आणि उमरगा तालुक्यातील तीन संस्थांचा समावेश आहे. 

दूध संकलनात मोठी घट...काही वर्षांपूर्वी भूम येथील शासकीय दूध योजनेच्या माध्यमातून प्रतिदिन सुमारे ५ लाख लिटर दूध संकलन होत असे. परंतु, साडेतीनशेवर संस्था अवसायनात निघाल्यामुळे हे संकलन आता अवघ्या सात ते आठ हजारावर आले आहे. उमरगा येथील योजनेतून प्रतिदिन ४ हजार लिटर दूध संकलन होत असे. सध्या हे प्रमाण पावणेतीन हजार लिटरपर्यंत खाली आले आहे. याचाही फटका शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे.

टॅग्स :milkदूधMilk Supplyदूध पुरवठाFarmerशेतकरी