शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबादेत ७० छावण्यांमध्ये ४६ हजारावर पशुधन दाखल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 18:50 IST

पाण्यासोबतच चाऱ्याचेही दुर्भिक्ष्य

ठळक मुद्देदुष्काळाच्या झळा तीव्र भूम तालुक्यामध्ये सर्वाधिक ३७ छावण्या सुरू

उस्मानाबाद : अख्ख्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या ५० ते ५५ टक्के इतका अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे पिकेही हाती लागली नाहीत अन् भूजलस्तरही अपेक्षित प्रमाणात उंचावला नाही. त्यामुळे सध्या ग्रामीण भागात भीषण टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासोबतच चाऱ्याचेही दुर्भिक्ष्य निर्माण झाल्यामुळे पशुधन जगावायचे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. पशुपालक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात येत आहेत. जिल्हा प्रशासनाने छावण्यांसाठी ८६ प्रस्ताव दाखल झाले होते. यापैकी ७० छावण्यांना मंजुरी दिली असून सुमारे ४६ हजार ३१४ एवढ्या पशुधनास आधार मिळाला आहे. 

पशुधनासाठीचा चारा आणि पाण्याचाही दुष्काळ निर्माण झाल्याने चारा छावण्या सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत होती. या मागणीसाठी काहीवेळा आंदोलनेही झाले. यानंतर शासनाकडून चारा छावण्यांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले असता दीडशे ते पावणेदोनशे प्रस्ताव दाखल झाले होते. या प्रस्तावांची छाननी केल्यानंतर आजघडीला ८६ प्रस्ताव पात्र ठरले आहेत. यापैकी ७० प्रस्तावांना जिल्हा प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. या छावण्यास सध्या सुरू झाल्या आहेत. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील आठ, उमरगा एक, भूम ३७, परंडा १७, कळंब ३ आणि वाशी तालुक्यात चार छावण्यांचा समावेश आहे. या सर्व छावण्यांमध्ये मिळून आजघडीला मोठी ४१ हजार ३०८ आणि लहान ५ हजार ६ एवढ्या पशुधनास आधार मिळाला आहे. दुष्काळाची दाहकता दिवसागणिक वाढू लागली आहे. त्यानुसार छावण्यांची आणि छावण्यांत दाखल होणाऱ्या पशुधनाची संख्याही वाढू लागली आहे. भविष्यात ही परिस्थिती आणखी गंभीर रूप धारण करेल, असे शेतकरी सांगतात.

कडब्याचे दर कडाडलेपावसाळ्यात अत्यल्प पर्जन्यमान झाले. याचा फटका रबी हंगामातील पिकांना बसला. ज्वारीसारखी पिके अक्षरश: वाया गेली होती. त्यामुळे सध्या कडब्याची टंचाई निर्माण झाली आहे. टंचाईची दाहकता विचारात घेऊन अनेक शेतकरी कडब्या विकण्याच्या मनस्थितीत नाहीत. ज्यांच्याकडे पशुधन नाही, असे शेकरी कडबा विक्री करीत असले तरी एका पेंडीचा दर २५ ते ३० रूपये सांगत आहेत. येणाऱ्या काळात हे दर आणखी वाढतील !

३०० ते ३००० पशुधन...छारा छावण्यांसाठी शासनाकडून वेगवेगळ्या अटीही घालण्यात आल्या आहेत. एका छावणीत कमित कमी ३०० आणि जास्तीत जास्त ३ हजार पशुधन बंधनकारक आहे. तीनशे पेक्षा कमी पशुधन असलेल्या छावण्यांना प्रशासनाकडून परवानगीही दिली जात नाही. याच निकषाच्या आधारे सध्या छावण्यांना मंजुरी दिली जात आहे. सदरील निकष पूर्ण न करणाऱ्या संस्थांचे प्रस्ताव प्रशासनाकडून नामंजूर करण्यात आले  आहेत. 

छावण्यांची संख्या वाढविणे गरजेचे माझ्याकडे लहान-मोठे मिळून  पंधरा ते वीस जनावरे आहेत. अत्यल्प पर्जन्यमानामुळे रबी हंगामातील पिके हाती लागली नाहीत. त्यामुळे कडबा निघण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे पशुधन जगवायचे कसे? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाकडून चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु, तालुक्यातील पशुधनाची संख्या लक्षात घेता, छावण्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. गाव तिथे छावणी झाल्यास शेतकऱ्यांची सोय होईल.-दादा आखरे, पशुपालक, भूम.