शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

तीन महिन्यात केवळ ३२ हजार डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:25 IST

कळंब : कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढल्याने लसीकरणावर भर दिला जात असला तरी कळंब तालुक्यात तीन महिन्यात लसीचे केवळ ...

कळंब : कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढल्याने लसीकरणावर भर दिला जात असला तरी कळंब तालुक्यात तीन महिन्यात लसीचे केवळ ३२ हजार ‘डोस’ देण्यात यश आले आहे. यामुळे एकूण पावणेदोन लाखांवर लोकसंख्येचा विचार करता सर्वांपर्यंत लसीचे ‘सुरक्षा कवच’ पोहचवण्यासाठी प्रशासनाला अद्याप मोठा पल्ला गाठावा लागणार आहे.

कळंब तालुक्यात गतवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाचे आगमन झाले. यानंतर कळंब शहरासह तालुक्यातील जवळपास सर्वच गावात कोरोनाचे पाऊल पडले. गावोगावी रुग्ण निघाल्याने पहिल्या लाटेत बाधितांच्या संख्येने दोन हजारांचा आकडा पार केला. यानंतर दोनेक महिने कोरोनाचा प्रसार थांबल्याने सुटकेचा निःश्वास टाकण्यात आला होता. यातून जनजीवन सुरळीत होत असतानाच मार्चमध्ये दुसऱ्या लाटेने पाय पसरण्यास सुरुवात केली. याची व्याप्ती एवढी मोठी होती की, प्रशासन हतबल झाले. आरोग्य यंत्रणा तोकडी ठरू लागली. गंभीर रुग्णांची संख्या वाढत जाऊन अनेकांचा बळी चालला. या स्थितीत कोरोनावर ‘सुरक्षा कवच’ ठरत असलेल्या लसी आल्या.

कोवॅक्सिन व कोविशिल्ड गावपातळीवर पोहचली. २७ जानेवारीपासून कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात तर १० मार्चपासून ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्रात नागरिकांना लसीकरण केले जाऊ लागले. यात पहिल्या टप्प्यात कोमॉरबीड व साठ वर्षांवरील ज्येष्ठांना, दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील नागरिकांना तर तिसऱ्या टप्प्यात १८ ते ४४ वर्षाच्या तरुणांना लस देण्याचा निर्णय अंमलात आणला गेला. कळंब शहराची लोकसंख्या जवळपास २७ हजार आहे. याशिवाय ग्रामीण भागातील ९५ गावात एक लाख ७५ हजारांच्या आसपास लोकसंख्या आहे. एकूणच तालुक्याची दोन लाखांवर लोकसंख्या असताना आजवर केवळ ३२ हजार १०७ लसीचे डोस झाले आहेत. यात पहिल्या व दुसऱ्या डोसधारकांचा दुबार आकडा वजा केला तर लसीच्या कवच मिळालेल्या आकड्यात परक पडू शकतो. दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण सुरू होऊन चार महिने तर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या अंतर्गतच्या ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू होऊन तीन महिने झाले तरी अद्यापपर्यंत केवळ दहा ते पंधरा टक्के लोकसंख्येलाच लस मिळाली असल्याने प्रशासनाला मोठा पल्ला गाठावा लागणार आहे.

चौकट....

उपजिल्हा रुग्णालयाने कापला दहा हजारांचा पल्ला

कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात आजवर एकूण १२ हजार ४४० लसीचे डोस टोचण्यात आले आहेत. यात ८ हजार ६०७ डोस पहिले आहेत तर ३ हजार ४३३ डोस दुसरे आहेत. यातही कोविशिल्डचा वरचष्मा असून त्यांचे ७ हजार ३९३ तर कोवॅक्सिनचे ४ हजार ६४७ डोस झाले आहेत. यामध्ये ४५ वर्षांवरील नागरिकांना दहा हजारांच्या आसपास डोस दिले असल्याचे असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जीवन वायदंडे यांनी सांगितले.

ग्रामीण भागात १९ हजार डोस

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय ग्रामीण भागात लसीकरणाचा कार्यक्रम राबवत आहे. मागच्या तीन महिन्यात यासाठी सहा प्राथमिक आरोग्य केंद्र व त्या अंतर्गत येणाऱ्या अरोग्य उपकेंद्रात लसीकरणाचे एकूण १५८ सेशन्स झाले आहेत. यामध्ये एकूण १९ हजार ६६७ लसीचे डोस देण्यात आले आहेत. यात अधिकांश लोक ज्येष्ठ नागरिक आहेत, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीपकुमार जाधव यांनी सांगितले.

तरुणाई पुन्हा ‘वेटिंग’वर

मध्यंतरी १८ ते ४४ वयोगटातील तरुणांना लसीकरणास अनुमती देण्यात आली होती. यासाठीच्या ऑनलाइन प्रक्रियेत तरुण दिवस-दिवस व्यस्त असत. यातून संधी प्राप्त झालेल्या दोनेक हजार तरुणांना लस मिळाली आहे. परंतु, बाकी तरुणाई सध्या वेटिंगवरच दिसून येत आहे.