शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आता खा, प्या घरी नेऊनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:32 IST

उस्मानाबाद : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आधी ५० टक्के ग्राहकांनाच परवानगी ...

उस्मानाबाद : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आधी ५० टक्के ग्राहकांनाच परवानगी दिलेली असताना बुधवारपासून ही अटही रद्द करण्यात आली आहे. हॉटेलधून आता यापुढे केवळ पार्सल घेऊन जाण्यासच मुभा असणार आहे.

कोरोना बाधितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून पन्नाशीपार येत आहे. या अनुषंगाने निर्बंध आणखी कठोर करण्यात येत आहेत. यापूर्वी फूड कोर्ट, हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, उपाहारगृहे यांना ५० ग्राहकांनाच सेवा देण्यास मुभा देण्यात आली होती. सोमवारी काढण्यात आलेल्या नव्या आदेशाद्वारे ही मुभाही आता संपुष्टात आली आहे. या ठिकाणी स्वयंपाकगृह सुरू ठेवण्यास परवानगी आहे. मात्र, आत ग्राहकांना बसवून घेऊन कोणत्याही प्रकारची सेवा देता येणार नाही. सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत पार्सल सेवा देता येणार आहे. निवासी हॉटेल्स (लॉज) असल्यास त्यांनाही केवळ तेथे निवासास असलेल्या व्यक्तींनाच अन्नसेवा देता येणार आहे. तीही रूम सर्व्हिसद्वारेच. बारमध्ये सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत केवळ पार्सल सेवा देता येईल. दरम्यान, राज्य व राष्ट्रीय महामार्गावर असणा-या ढाब्यांना मात्र २४ तास परवानगी असेल. परंतु या ठिकाणीही एकावेळी क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांनाच सेवा देता येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सोमवारी काढले आहेत.