शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

आता खा, प्या घरी नेऊनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:32 IST

उस्मानाबाद : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आधी ५० टक्के ग्राहकांनाच परवानगी ...

उस्मानाबाद : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आधी ५० टक्के ग्राहकांनाच परवानगी दिलेली असताना बुधवारपासून ही अटही रद्द करण्यात आली आहे. हॉटेलधून आता यापुढे केवळ पार्सल घेऊन जाण्यासच मुभा असणार आहे.

कोरोना बाधितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून पन्नाशीपार येत आहे. या अनुषंगाने निर्बंध आणखी कठोर करण्यात येत आहेत. यापूर्वी फूड कोर्ट, हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, उपाहारगृहे यांना ५० ग्राहकांनाच सेवा देण्यास मुभा देण्यात आली होती. सोमवारी काढण्यात आलेल्या नव्या आदेशाद्वारे ही मुभाही आता संपुष्टात आली आहे. या ठिकाणी स्वयंपाकगृह सुरू ठेवण्यास परवानगी आहे. मात्र, आत ग्राहकांना बसवून घेऊन कोणत्याही प्रकारची सेवा देता येणार नाही. सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत पार्सल सेवा देता येणार आहे. निवासी हॉटेल्स (लॉज) असल्यास त्यांनाही केवळ तेथे निवासास असलेल्या व्यक्तींनाच अन्नसेवा देता येणार आहे. तीही रूम सर्व्हिसद्वारेच. बारमध्ये सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत केवळ पार्सल सेवा देता येईल. दरम्यान, राज्य व राष्ट्रीय महामार्गावर असणा-या ढाब्यांना मात्र २४ तास परवानगी असेल. परंतु या ठिकाणीही एकावेळी क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांनाच सेवा देता येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सोमवारी काढले आहेत.