शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

आता कानांना ऑटोमायकोसिसचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:23 IST

उस्मानाबाद : पावसात भिजल्याने कानात पाणी जात असते. त्यामुळे कानांना बुरशी, बॅक्टेरियाचा धोका निर्माण होत आहे. जिल्हा रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण ...

उस्मानाबाद : पावसात भिजल्याने कानात पाणी जात असते. त्यामुळे कानांना बुरशी, बॅक्टेरियाचा धोका निर्माण होत आहे. जिल्हा रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज ५ ते ७ रुग्ण ऑटोमायकोसिसच्या समस्येने त्रस्त असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

ऑटोमायकोसिस हा एक बुरशीजन्य आजार आहे. या आजारात मुख्यतः कानाला संसर्गाचा धोका अधिक असतो. बुरशीजन्य कानात होणारे संक्रमण मुख्यत: कान कालवावर परिणाम करते. दूषित पाण्यात पोहणे, कानाला आघात होणे आणि मधुमेह या कारणांमुळे कानाला संसर्ग होऊ शकतो. मात्र, अद्यापही कानदुखीसारख्या रोगांकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने दुर्लक्षामुळे हा धोका अधिक वाढण्याची भीती आहे. कानात पाणी शिरणे अथवा वेळेत ते काढले न जाणे, कानात तेल टाकणे, जुने ड्राप टाकणे, एअर फोनचा सतत वापर करणे, यामुळे कानात बुरशी होण्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. जिल्हा रुग्णालयात प्रतिदिन ५ ते ७ रुग्ण ऑटोमायकोसिस आजाराचे येत असल्याचे डॉक्टर म्हणाले. ऑटोमायकोसिसमुळे आवाज कमी येणे, पू येणे, कान दुखणे, कान भरल्यासारखे वाटणे अशी लक्षणे असून, वेळीस उपचार न घेतल्यास बहिरेपणा येण्याची दाट शक्यता असते. असे कान-नाक-घसा तज्ज्ञांनी सांगितले.

पावसाळ्यात ओलाव्यामुळे धोका

१.ऑटोमायकोसिसचे रुग्ण वर्षभर आढळून येत असतात. मात्र, पावसाळ्याच्या दिवसात त्याचे प्रमाण अधिक असते. पावसात भिजल्याने पाणी कानात जाते, कान वेळेवर कोरडे न केल्याने कानात पाणी साचून राहते. त्यामुळे कान दुखण्याची समस्या उद्भवते.

२. कानातील मळ काढण्यासाठी अनेकजण कानात तेल टाकत असतात. शिवाय कापसाच्या काडीने कान साफ केले जातात, तर काहीजण जुने कुठलेही ड्राप्स कानात टाकत असतात. एअरफोनचा सतत वापर यामुळे ऑटोमायकोसिसचा त्रास होऊ शकतो, असे डॉक्टर म्हणाले.

काय घ्याल काळजी

ऑटोमायकोसिसचा धोका टाळण्यासाठी कान कोरडे ठेवणे.

अंघोळीचे पाणी, तसेच पावसाचे पाणी कानात गेल्यानंतर कानाला हात न लावता मान वाकडी करून पाणी बाहेर येऊ द्यावे.

कापसाच्या काड्या कानात घालणे टाळावे, तसेच मळ काढण्यासाठी कानात तेल टाकणे टाळावे. एअरफोनचा वापर कमी करावा. जुने ड्राप्स कानात टाकू नये, टोकदार वस्तूने कान स्वच्छ करणे टाळावे. कानाचा त्रास उद्भवू लागल्यास घरगुती उपाय करत बसण्यापेक्षा रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत.

कोट...

कानातील मळ काढण्यासाठी कानात तेल टाकणे धोक्याचे ठरू शकते. शिवाय, ड्राप्स फोडल्यानंतर तो ड्राप्स एका महिन्याच्या कालावधीपर्यंत वापरता येतो. मात्र, नागरिक कानात दुखत असल्यास कुठलाही ड्राप्स कानात सोडत असतात. त्यामुळे कानाचे त्रास उद्भवतात. कानाचा त्रास झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

डॉ. सचिन देशमुख,

कान-नाक-घसा तज्ज्ञ

पावसात भिजल्यानंतर कानात पाणी गेल्यानंतर तत्काळ कान कोरडे करणे गरजेचे असते. काहीजण कान धुऊन घेण्यावर भर देतात. मात्र, कान धुतल्यानंतर ते स्वच्छ नाही केले तर इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. कान दुखू लागल्यास किंवा कानातून पाणी येऊ लागल्यास त्वरित उपचार घ्यावे. तत्काळ उपचार न घेतल्यास बहिरेपणा येऊ शकतो.

डॉ. रवींद्र पापडे, कान-नाक-घसा तज्ज्ञ