शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

आता कानांना ऑटोमायकोसिसचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:23 IST

उस्मानाबाद : पावसात भिजल्याने कानात पाणी जात असते. त्यामुळे कानांना बुरशी, बॅक्टेरियाचा धोका निर्माण होत आहे. जिल्हा रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण ...

उस्मानाबाद : पावसात भिजल्याने कानात पाणी जात असते. त्यामुळे कानांना बुरशी, बॅक्टेरियाचा धोका निर्माण होत आहे. जिल्हा रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज ५ ते ७ रुग्ण ऑटोमायकोसिसच्या समस्येने त्रस्त असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

ऑटोमायकोसिस हा एक बुरशीजन्य आजार आहे. या आजारात मुख्यतः कानाला संसर्गाचा धोका अधिक असतो. बुरशीजन्य कानात होणारे संक्रमण मुख्यत: कान कालवावर परिणाम करते. दूषित पाण्यात पोहणे, कानाला आघात होणे आणि मधुमेह या कारणांमुळे कानाला संसर्ग होऊ शकतो. मात्र, अद्यापही कानदुखीसारख्या रोगांकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने दुर्लक्षामुळे हा धोका अधिक वाढण्याची भीती आहे. कानात पाणी शिरणे अथवा वेळेत ते काढले न जाणे, कानात तेल टाकणे, जुने ड्राप टाकणे, एअर फोनचा सतत वापर करणे, यामुळे कानात बुरशी होण्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. जिल्हा रुग्णालयात प्रतिदिन ५ ते ७ रुग्ण ऑटोमायकोसिस आजाराचे येत असल्याचे डॉक्टर म्हणाले. ऑटोमायकोसिसमुळे आवाज कमी येणे, पू येणे, कान दुखणे, कान भरल्यासारखे वाटणे अशी लक्षणे असून, वेळीस उपचार न घेतल्यास बहिरेपणा येण्याची दाट शक्यता असते. असे कान-नाक-घसा तज्ज्ञांनी सांगितले.

पावसाळ्यात ओलाव्यामुळे धोका

१.ऑटोमायकोसिसचे रुग्ण वर्षभर आढळून येत असतात. मात्र, पावसाळ्याच्या दिवसात त्याचे प्रमाण अधिक असते. पावसात भिजल्याने पाणी कानात जाते, कान वेळेवर कोरडे न केल्याने कानात पाणी साचून राहते. त्यामुळे कान दुखण्याची समस्या उद्भवते.

२. कानातील मळ काढण्यासाठी अनेकजण कानात तेल टाकत असतात. शिवाय कापसाच्या काडीने कान साफ केले जातात, तर काहीजण जुने कुठलेही ड्राप्स कानात टाकत असतात. एअरफोनचा सतत वापर यामुळे ऑटोमायकोसिसचा त्रास होऊ शकतो, असे डॉक्टर म्हणाले.

काय घ्याल काळजी

ऑटोमायकोसिसचा धोका टाळण्यासाठी कान कोरडे ठेवणे.

अंघोळीचे पाणी, तसेच पावसाचे पाणी कानात गेल्यानंतर कानाला हात न लावता मान वाकडी करून पाणी बाहेर येऊ द्यावे.

कापसाच्या काड्या कानात घालणे टाळावे, तसेच मळ काढण्यासाठी कानात तेल टाकणे टाळावे. एअरफोनचा वापर कमी करावा. जुने ड्राप्स कानात टाकू नये, टोकदार वस्तूने कान स्वच्छ करणे टाळावे. कानाचा त्रास उद्भवू लागल्यास घरगुती उपाय करत बसण्यापेक्षा रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत.

कोट...

कानातील मळ काढण्यासाठी कानात तेल टाकणे धोक्याचे ठरू शकते. शिवाय, ड्राप्स फोडल्यानंतर तो ड्राप्स एका महिन्याच्या कालावधीपर्यंत वापरता येतो. मात्र, नागरिक कानात दुखत असल्यास कुठलाही ड्राप्स कानात सोडत असतात. त्यामुळे कानाचे त्रास उद्भवतात. कानाचा त्रास झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

डॉ. सचिन देशमुख,

कान-नाक-घसा तज्ज्ञ

पावसात भिजल्यानंतर कानात पाणी गेल्यानंतर तत्काळ कान कोरडे करणे गरजेचे असते. काहीजण कान धुऊन घेण्यावर भर देतात. मात्र, कान धुतल्यानंतर ते स्वच्छ नाही केले तर इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. कान दुखू लागल्यास किंवा कानातून पाणी येऊ लागल्यास त्वरित उपचार घ्यावे. तत्काळ उपचार न घेतल्यास बहिरेपणा येऊ शकतो.

डॉ. रवींद्र पापडे, कान-नाक-घसा तज्ज्ञ