शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

राज्य सरकारच्या मदतीतून काहीच होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:30 IST

तुळजापूर : सोमवारी केंद्रीय पथकाने तालुक्यातील आपसिंगा व कात्री शिवारात ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी ...

तुळजापूर : सोमवारी केंद्रीय पथकाने तालुक्यातील आपसिंगा व कात्री शिवारात ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी ‘साहेब, न भरून येणारे नुकसान झाले आहे. राज्य शासनाकडून मिळालेल्या मदतीत काहीच होणार नाही. केंद्राकडूनही काही मदत मिळतेय का पाहा’, अशी अपेक्षा त्यांच्याकडे व्यक्त केली. यावेळी केंद्रीय पथकाने शेतात फिरून, शेतकऱ्यांना प्रश्न विचारून प्रत्यक्ष नुकसानीची माहिती घेतली. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी नुकसानीचे स्वरूप समजावून सांगितले. यावेळी तहसीलदार सौदागर तांदळे, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, तालुका कृषी अधिकारी एन. टी. गायकवाड, जलसंधारण अधिकारी महादेव आदटराव, लघु पाटबंधारे विभागाचे गजानन होळकर, कृषी सहायक नवनाथ आलमले, मंडळ कृषी अधिकारी अनिल पवार, ग्रामसेवक चैतन्य गोरे, सरपंच गोरे, ग्रा. पं. सदस्य आमीर शेख, योगेश रोकडे आदींची उपस्थिती होती.

पथकाने आपसिंगा येथे अर्चना युवराज पाटील यांच्या शेतातील नुकसान झालेल्या द्राक्ष बागेची पाहणी केली. यावेळी याच जमिनीमध्ये लगतच्या ओढ्याच्या प्रवाहाने वाहून आलेले मोठमोठे दगड, धोंडे वावरात दिसत होते. पाण्याची विहीरही भुईसपाट झाली आहे. त्यामुळे जवळपास लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

चौकट...

सोयबीन पावसाने काळे पडले होते. ते विकायला बाजार समितीमध्ये घेऊन गेलो तर तेथे विकत घेतले गेले नाही. गाळाने विहीर बुजली गेली आहे. कांदा काढणीचे दिवस सुरू झाले आहेत. तरीही कांद्याची वाढ होत नाही, अशी परिस्थिती झाली आहे, अशी व्यथा कात्री येथील शेतकरी बलभीम जमदाडे यांनी यावेळी मांडली.

या पथकाने नेताजी जमदाडे यांच्या द्राक्षबागेची पाहणी केली. यावेळी त्यांनी पूर्ण बाग पाण्यामध्ये राहिल्यामुळे द्राक्ष घडाची वाढ होत नाही. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान होणार असल्याचे सांगितले.