शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
5
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
6
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
7
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
8
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
9
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
10
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
11
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
12
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
13
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
14
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
15
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
16
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
17
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
18
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?
19
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

राज्य सरकारच्या मदतीतून काहीच होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:30 IST

तुळजापूर : सोमवारी केंद्रीय पथकाने तालुक्यातील आपसिंगा व कात्री शिवारात ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी ...

तुळजापूर : सोमवारी केंद्रीय पथकाने तालुक्यातील आपसिंगा व कात्री शिवारात ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी ‘साहेब, न भरून येणारे नुकसान झाले आहे. राज्य शासनाकडून मिळालेल्या मदतीत काहीच होणार नाही. केंद्राकडूनही काही मदत मिळतेय का पाहा’, अशी अपेक्षा त्यांच्याकडे व्यक्त केली. यावेळी केंद्रीय पथकाने शेतात फिरून, शेतकऱ्यांना प्रश्न विचारून प्रत्यक्ष नुकसानीची माहिती घेतली. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी नुकसानीचे स्वरूप समजावून सांगितले. यावेळी तहसीलदार सौदागर तांदळे, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, तालुका कृषी अधिकारी एन. टी. गायकवाड, जलसंधारण अधिकारी महादेव आदटराव, लघु पाटबंधारे विभागाचे गजानन होळकर, कृषी सहायक नवनाथ आलमले, मंडळ कृषी अधिकारी अनिल पवार, ग्रामसेवक चैतन्य गोरे, सरपंच गोरे, ग्रा. पं. सदस्य आमीर शेख, योगेश रोकडे आदींची उपस्थिती होती.

पथकाने आपसिंगा येथे अर्चना युवराज पाटील यांच्या शेतातील नुकसान झालेल्या द्राक्ष बागेची पाहणी केली. यावेळी याच जमिनीमध्ये लगतच्या ओढ्याच्या प्रवाहाने वाहून आलेले मोठमोठे दगड, धोंडे वावरात दिसत होते. पाण्याची विहीरही भुईसपाट झाली आहे. त्यामुळे जवळपास लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

चौकट...

सोयबीन पावसाने काळे पडले होते. ते विकायला बाजार समितीमध्ये घेऊन गेलो तर तेथे विकत घेतले गेले नाही. गाळाने विहीर बुजली गेली आहे. कांदा काढणीचे दिवस सुरू झाले आहेत. तरीही कांद्याची वाढ होत नाही, अशी परिस्थिती झाली आहे, अशी व्यथा कात्री येथील शेतकरी बलभीम जमदाडे यांनी यावेळी मांडली.

या पथकाने नेताजी जमदाडे यांच्या द्राक्षबागेची पाहणी केली. यावेळी त्यांनी पूर्ण बाग पाण्यामध्ये राहिल्यामुळे द्राक्ष घडाची वाढ होत नाही. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान होणार असल्याचे सांगितले.