शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संसर्गामुळे जारची मागणी नाहीच, उन्हाळ्यात थंड पाण्याचा व्यवसाय थंडावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:14 IST

उस्मानाबाद : मागील वर्षीपासून कोरोनाचे संकट असताना, यावेळीही मार्च महिन्यापासून कोरोनाचे थैमान सुरू आहे. कोरोनाच्या भीतीमुळे थंड पाण्यासोबत शीतपेयाची ...

उस्मानाबाद : मागील वर्षीपासून कोरोनाचे संकट असताना, यावेळीही मार्च महिन्यापासून कोरोनाचे थैमान सुरू आहे. कोरोनाच्या भीतीमुळे थंड पाण्यासोबत शीतपेयाची मागणी कमी झाली आहे. परिणामी, थंड पाण्याच्या जारची विक्री मंदावली आहे.

दरवर्षी उन्हाळा आला की, जारच्या माध्यमातून विक्री हाेणाऱ्या पाण्याची मागणी प्रचंड वाढत असते. तसेच बाजारपेठेतही दुकानदार उन्हाळ्यात थंड पाणी मागवून आपली तहान भागवत असतात. मात्र, कोरोनामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दुकाने बंद आहेत. शिवाय काही रुग्णालये, मेडिकलमध्ये कमी प्रमाणात जारचा वापर सुरू आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका, पतसंस्थांमध्येही जारला मागणी होती. मात्र, कार्यालयातही १५ टक्केच कर्मचारी उपस्थिती करण्यात आली आहे. त्यामुळे या कार्यालयातून जारला मागणी घटली आहे. जारची मागणी कमी झाल्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या गाड्यांही अगदी कमी प्रमाणात फिरताना दिसत आहेत. जारद्वारे विकले जाणारे फिल्टरचे पाणी विकत घेण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे या व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. २० ते ३० रुपयांना मिळणारा जार दोन ते तीन दिवस वापरला जात होता. किमान एक व जास्तीत जास्त ४ ते ५ विकत घेतले जात होते. लग्नकार्य असो किंवा आणखी कोणताही कार्यक्रम, त्या ठिकाणी एका दिवसासाठी २५ ते ५० जार मागविले जात होते. कार्यक्रमांवरही बंधन आल्यामुळे जारचा व्यवसाय ठप्प झाला आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा जारच्या पाण्याची मागणी ७० टक्क्यांनी घटली आहे.

साध्या जारला पसंती

सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे अनेकजण शीतपेय, थंड पदार्थ तसेच थंड पाणी पिण्याचे टाळत आहेत. त्यामुळे थंड पाण्याच्या जारऐवजी साध्या जारला नागरिकांतून पसंती असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

जार विक्रेत्यांसह कामगारांचे नुकसान

दरवर्षी उन्हाळ्यात विवाह समारंभ तसेच इतर उपक्रमांवेळी थंड पाण्याच्या जारला मागणी असते. शिवाय, पाणपोईसाठी मागील काही वर्षांपासून जारचे पाणीच ठेवले जात होते. मात्र, यंदा संचारबंदीमुळे अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी मोजक्याच उपस्थितीमध्ये कार्यक्रम होत असल्याने मागणी घटली आहे. त्यामुळे जार विक्रेत्यांसह कामगारांचे नुकसान झाले आहे.

प्रतिक्रिया...

माझा हॉटेलचा व्यवसाय आहे. हॉटेल सुरू होते, तेव्हा प्रतिदिन मी चार ते पाच जार विकत घेत होतो. संचारबंदीमुळे हॉटेल बंद आहेत. त्यामुळे आता जार बंद केला आहे. कोरोना संसर्गामुळे थंड पाणी पिणे टाळत आहे. त्यामुळे घरीही साध्या पाण्याचा जार घेत आहे.

अशोक घोळवे,

हॉटेल व्यावसायिक

कडक ऊन असतानाही सध्या थंड पाणी पिणे टाळत आहोत. त्याऐवजी साध्या जारचे पाणी पिण्यास पसंती देत आहोत. फेब्रुवारी महिन्यात दररोज दोन थंड पाण्याचे जार घेतले जात होते. सध्या साध्या पाण्याचे दोन जार घरी घेत आहोत.

रोहित आवाड, नागरिक

दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात जारच्या थंड पाण्यास मोठी मागणी असायची. लग्न समारंभास २५ ते ५० जार खरेदी केले जात होते. थंडपेयाचे स्टॉल, हॉटेलमध्येही जारला मागणी होती. मात्र, यंदा कोरोना संसर्गामुळे हाॅटेल बंद आहेत. तसेच लग्न समारंभास कमी व्यक्ती हजर राहत आहेत. त्यामुळे जारला मागणी घटली आहे. त्याचा फटका जार व्यावसायिकांना बसत आहे.

संदीप साळुंके, नागरिक