शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
2
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
3
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
4
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
5
...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई
6
Harsha Richhariya : “महाकुंभमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं, कधी कल्पनाही...”; असं का म्हणाली हर्षा रिछारिया?
7
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
8
महिलांसाठी खुशखबर! पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये करा गुंतवणूक, बँकांपेक्षाही जास्त व्याज आणि सुरक्षित भविष्य!
9
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...
10
"१० वर्षांपूर्वी माझा घटस्फोट झाला, त्यानंतर...", Divorce बद्दल अपूर्वा नेमळेकरचं भाष्य, म्हणाली- "मी अजूनही सिंगल..."
11
पाकिस्तानच्या २ गद्दारांना अमेरिकेतून अटक, बनावट कंपनीच्या नावाखाली सरकारलाही फसवत होते!
12
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
13
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
14
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
15
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर साधूने त्रिशूळाने केला हल्ला, एक पोलीस अधिकारी जखमी   
16
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना
17
एक-एक करत 3 गाड्या उडवल्या; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला, 32 जवानांचा मृत्यू
18
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
19
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!

यंदा जिल्ह्यात ना टँकर, ना अधिग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:30 IST

उस्मानाबाद -उन्हाळा सुरू झाला की जिल्ह्यातील अनेक वाडी, तांड्यांसह गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न डाेके वर काढत असे. अनेकवेळा एकेका ...

उस्मानाबाद -उन्हाळा सुरू झाला की जिल्ह्यातील अनेक वाडी, तांड्यांसह गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न डाेके वर काढत असे. अनेकवेळा एकेका गावातील शिवारात टँकर भरण्यासाठीही जलस्त्राेत उपलब्ध हाेत नव्हते. मात्र, गतवर्षी जिल्हाभरात मुबलक पाऊस झाला. त्याचा परिणाम म्हणून की काय, यंदा पावसाळा ताेंडावर आला असतानाही एकही टँकर वा जलस्त्राेत अधिग्रहित करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावलेली नाही. मे २०२० मध्ये म्हणजेच गतवर्षी १८ टँकर अन् २७५ जलस्त्राेतांचे अधिग्रहण करावे लागले हाेते.

मागील काही वर्षांत उस्मानाबाद बराेबर पाणीटंचाई हे समीकरण निर्माण झाले हाेते. एप्रिल, मे महिन्यात तर टंचाईचे सावट अधिक गडद हाेत असे. वाडी, वस्ती, तांडा तसेच गावागावांतून पिण्याच्या पाण्यासाठी ओरड हाेत असे. अशावेळी प्रशासनाला दाेरीवरची कसरत करावी लागत हाेती. दरम्यान, मागील वर्षी जिल्ह्याच्या सर्वच भागात जाेरदार पाऊस झाला. सीना-काेळेगावसारखे माेठे धरण शंभर टक्के भरले. लहान-माेठे प्रकल्पही ओव्हरफ्लाे झाले हाेते. त्यामुळेच की काय, यंदा जिल्ह्यात ना टँकर सुरू आहे, ना जलस्त्राेतांचे अधिग्रहण करावे लागले. सध्या जिल्हा टँकरमुक्त आहे. दरम्यान, गतवर्षी याच काळात म्हणजेच मे अखेर १८ टँकर व २७५ जलस्त्राेतांचे अधिग्रहण करून टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा केला जात हाेता. शेजारचे लातूर, नांदेड आदी जिल्ह्यात काही ना काही गावांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख निर्माण झालेल्या उस्मानाबादकरांसाठी ही बाब दिलासा देणारीच म्हटली पाहिजे.

काेट...

जिल्ह्यात मागील वर्षी जाेरदार पाऊस झाला हाेता. त्यामुळे बहुतांश लहान-माेठे प्रकल्प तुडुंब भरले. त्यामुळेच यंदा मे महिना सरत आला असला तरी एकही टँकर वा अधिग्रहणाची मागणी नाही. भविष्यात टँकर वा अधिग्रहणांची मागणी झाल्यास तातडीने उपाययाेजना केल्या जातील.

-देवकर, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग.