उस्मानाबाद : काेराेना संकटाचा सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. यातून शिक्षण क्षेत्रही सुटलेले नाही. मागील दीड वर्षापासून शाळा कुलूपबंद असल्याने शासनाने पहिली ते बारावीपर्यंतच्या वर्गांच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्हाभरातील सुमारे २ लाख ८९ हजार २६३ विद्यार्थी परीक्षेविना पास झाले आहेत.
काेराेना संकटामुळे शिक्षण व्यवस्था प्रभावित झाली आहे. काेराेनाचा संसर्ग लक्षात घेऊन राज्य शासनाने ६ एप्रिल २०२१ राेजी पहिली जे नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करून त्यांना पुढील वर्गामध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेतला हाेता. यानंतर दहावी, बारावीच्या परीक्षेची तयारी करण्यात आली हाेती. परीक्षा केंद्रेही निश्चित केली हाेती. असे असतानाच काेराेनाची दुसरी लाट धडकली. ही लाट पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिक तीव्र असल्याने संभाव्य धाेका ओळखून याही परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे जिल्हाभरातील सुमारे दीड हजारांवर शाळांतील पहिली ते बारावीच्या वर्गातील तब्बल २ लाख ८९ हजार २६३ विद्यार्थ्यांना परीक्षेविना उत्तीर्ण करण्यात आले आहे.
चाैकट...
वर्गनिहाय विद्यार्थी
पहिली २५६६९
दुसरी २६५८३
तिसरी ३१९९३
चाैथी २६४३३
पाचवी २५७६५
सहावी २६०३७
सातवी २५५४७
आठवी २५२२४
नववी २५५५६
दहावी २५४७३
अकरावी १४९६९
बारावी १५९३०
शहरे...
माेबाईल, टॅब, लॅपटाॅप असल्याने शहरी भागात ऑनलाईन शिक्षणात फारसा व्यत्यय आला नाही. पालकांनी मुलांचा ऑनलाईन गृहपाठ, अभ्यास करून घेतला. परिणामी मुलांचाही ऑनालाईन शिक्षणास प्रतिसाद मिळाला.
खेडेगाव...
खेडेगावातील गरीब विद्यार्थ्यांकडे माेबाईल अथवा टॅबची साेय नाही. त्यामुळे त्यांना ऑनलाईन शिक्षणात सामावून घेताना अडचणी आल्या. अनेक गावांमध्ये माेबाईलला रेंज नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणात सातत्य राहिले नाही.
फायदे...
काेराेना संसर्गाच्या काळात शाळा बंद हाेत्या. त्यामुळे शिक्षणही बंद राहिले. विद्यार्थ्यांचे नुकसान हाेऊ नये, यासाठी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यात आले.
ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात फारसा खंड पडला नाही. अभ्यासाची सवय कायम राहिली.
ऑनलाईन पद्धतीने घटक चाचणी, सराव परीक्षा घेऊन उजळणी घेतली. विद्यार्थ्यांवर शिक्षकांचा वाॅच राहिला.
ताेटे....
विविध अडचणीमुळे ऑनलाईन शिक्षण खेडाेपाडी पाेहोचले नाही.
ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या हाती माेबाईल, टॅब असल्याने विद्यार्थ्यांना माेबाईलचे व्यसन जडले.
अनेक विद्यार्थी तासनतास माेबाईलवर असल्याने डाेळ्यांच्या समस्या तसेच डाेकेदुखी वाढली. मुलांमध्ये चिडचिड, मानसिक समस्यादेखील निर्माण झाल्या आहेत. अभ्यास साेडून मुले माेबाईलमध्ये विविध प्रकारचे गेम खेळू लागले आहेत.
जिल्हा परिषद शाळा
१०७९
खासगी शाळा
४४५
अनुदानित शाळा
१५०
विनाअनुदानित
३५५