शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

ना रस्त्याची कामे झाली, ना नाल्यांची...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:00 IST

लोहारा : शहरातील प्रभाग क्रमाक १३ मध्ये आजवर ना रस्त्याचे काम झाले, ना नाल्याचे. यामुळे पावसाळ्यात येथील रस्ते चिखलमय ...

लोहारा : शहरातील प्रभाग क्रमाक १३ मध्ये आजवर ना रस्त्याचे काम झाले, ना नाल्याचे. यामुळे पावसाळ्यात येथील रस्ते चिखलमय होतात. यामुळे नागरिकांना घराकडे ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच काही भागात विद्युत खांबांचीही वानवा दिसून येते.

शहरातील प्रभाग क्रमाक १३ हा सर्वांत लहान प्रभाग असून, यामध्ये बाराईमान मोहल्ला, मज्जिद, माणिक नगर, कृष्णात कदम प्लॉटिंग आदी भाग येतो. उत्तरेस समीर कोनाळे कॉम्प्लेक्स ते निलू जाधव घर, पूर्वेस निलू जाधव घर, उमाकांत लांडगे घर ते सर्व्हे नंबर १४९, दक्षिणेस सर्व्हे नंबर १४९ ते सर्व्हे नंबर १४२, पश्चिमेस सर्व्हे नंबर १४२ ते समीर कोनाळे कॉम्प्लेक्स अशी या प्रभागाची रचना आहे. या प्रभागातील दोन प्रमुख रस्त्यावर पूल करण्यात आले असून, बाराईमान मोहल्ला येथे कच्चा रस्ता करण्यात आला आहे. तसेच बाराईमान मोहल्ला भागातील पाणीटंचाई लक्षात घेऊन पाच-सहा महिन्यांपूर्वीच शादी खानाजवळील बोअरपासून मलंग बंबईवाले यांच्या घरापर्यंत नागरिकांच्याच पुढाकारातून पाईपलाईन झाली. येथे दोन घरांसाठी एक नळ देण्यात आला आहे. त्यामुळे काहीअंशी या भागातील पाणीटंचाई दूर झाली आहे.

बाराईमान मोहल्ला येथे कच्चा रस्ता करण्यात आला असला तरी सिमेंट रस्ता, नाली होणे गरजेचे आहे. तसेच कृष्णात कदम दुकान ते रमेश वाघोले प्लॉटपर्यंत, माणिकनगर, कुंभार, जंगी, राठोड, शेख घर या भागात आतापर्यंत ना साधे कच्चेही रस्ते झाले, ना नाल्या. त्यामुळे या भागातील नागरिकांना पावसाळ्यात नाहक त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत असल्यामुळे नेमका रस्ता कुठे आहे, याचाही अंदाज नागरिकांना येत नाही. तसेच जंगी, शेख, गोसावी यांच्या घराकडे रस्ता, नाली याबरोबरच विजेच्या खांबांचीही वानवा दिसून येते. जवळपास विद्युत खांब नसल्यामुळे येथील रहिवाशांना लांब असलेल्या खांबावरून विजेचे कनेक्शन घ्यावे लागत आहे.

कोट....

प्रभाग क्रमाक १३ मध्ये रस्ते, नाल्या नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात आम्हाला त्रास सहन करावा लागतो. अनेकदा घराकडे जाताना चप्पल हातात घेऊन चिखलातून वाट काढावी लागते. तसेच कदम प्लॉटिंगमध्ये विजेचे खांब नाहीत. त्यामुळे या भागात रस्ते, नाली यासोबतच विद्युत खांब उभारण्याचीही गरज आहे.

- गौस जंगी, रहिवासी

या प्रभागात काही कामे झाली असली तरी अपेक्षित कामे झाली नाहीत. आपसातील मतभेदामुळे जनतेला वेठीस धरणे चुकीचे आहे. अल्पसंख्याकांसाठी आलेला निधी सत्ताधाऱ्यांच्या आडमुठी धोरणामुळे परत गेला आहे. प्रभागात विकासकामे झाली नाहीत, याला केवळ सत्ताधारीच जबाबदार आहेत.

- आयुब शेख, रहिवासी

प्रभाग क्रमाक १३ मधील अल्पसंख्याकांसाठी २० लाख रुपयांचा निधी आला होता. तो सत्ताधाऱ्यांच्या मनमानीमुळे परत गेला. त्यामुळे या प्रभागात विकासकामे होऊ शकली नाहीत. याला सर्वस्वी हे सत्ताधारीच जबाबदार आहेत.

- आबुलवफा कादरी, नगरसेवक

फोटो - लोहारा शहरातील प्रभाग क्रमाक १३ मध्ये कृष्णात कदम दुकान ते रमेश वाघोले प्लॉटपर्यंत रस्त्याची अशी परिस्थिती अशी आहे.