शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

बिल भरूनही वीजजोडणी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:33 IST

तामलवाडी : महावितरणने थकीत बिलाच्या वसुलीसाठी तोडलेली वीज बिलाचा भरणा करूनही जोडली जात नसल्यामुळे चार गावच्या ग्रामस्थांना सध्या तीव्र ...

तामलवाडी : महावितरणने थकीत बिलाच्या वसुलीसाठी तोडलेली वीज बिलाचा भरणा करूनही जोडली जात नसल्यामुळे चार गावच्या ग्रामस्थांना सध्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्याचा शोध घेत ग्रामस्थ भर उन्हात रानोमाळ भटकंती करताना दिसत आहेत.

तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा वीज उपकेंद्रांतर्गत असलेल्या सांगवी, पिंपळा (खुर्द), पिंपळा (बु.) आणि कुंभारी या गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहरीवरील वीज पंपांचा विद्युत पुरवठा थकीत बिलासाठी महावितरणने खंडित केला आहे. यानंतर ग्रामपंचायतीने बिलाच्या थकबाकीपोटीची रक्कम महावितरण कार्यालयाकडे भरणा केली. त्यास चार दिवस लोटले तरी महावितरणकडून अद्याप ही वीज जोडणी पूर्ववत करण्यात आली नाही. त्यामुळे मागील पाच दिवसांपासून या चार गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावात पाण्याचा थेंब नसल्याने ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत असल्याने ग्रामस्थांत महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

झोपडपट्टीवासीयांचे हाल कायम

सांगवी झोपडपट्टी भागात विजेविना चालणारे पाण्याचे एकही स्रोत नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना नळाच्या पाणीपुरवठ्यावरच अवलंबून राहावे लागते; परंतु महावितरणने येथील पाणीपुरवठ्याची वीजदेखील खंडित केली असून, शेतीपंपासाठी दिवसाकाठी तासभर मिळणारी वीजही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे जनावरे, गावकऱ्यांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. शेतात जनावरांना पाणी पाजण्यासाठी विहिरीतून घागरीने पाणी काढावे लागत असून, झोपडपट्टीतील रहिवाशांना जीव मुठीत घेऊन महामार्ग ओलांडून पाण्यासाठी भटकावे लागत आहे.

...तर घागर मोर्चा काढू

ग्रामपंचायतने वीज बिलाची रक्कम भरूनही तीन दिवस झाले; परंतु माळुंब्रा वीज उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता पी. एन. कावरे हे वीज जोडणीचे आदेश देण्यास जाणूनबुजून टाळाटाळ करीत आहेत. याबाबत राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडेदेखील तक्रार केली आहे. महावितरणने तात्काळ वीजपुरवठा जोडून न दिल्यास कार्यालयावर घागर मोर्चा काढू, असा इशारा सांगवीचे उपसरपंच मिलिंद मगर यांनी दिला आहे.

कोट....

माझी सांगवी शिवारात स्वत:ची शेतजमीन, विहीर असून, शेतीपंपासाठी अनामत रक्कम भरल्यानंतर महावितरणने तीन वर्षांपूर्वी खांब उभारून तारा ओढल्या; परंतु अद्यापही वीजजोडणी दिलेली नाही. त्यामुळे विहिरीतून घागरीने पाणी उपसून जनावरांची तहान भागवावी लागत आहे.

- ज्ञानेश्वर मगर,

शेतकरी सांगवी (काटी)