शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

बिल भरूनही वीजजोडणी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:33 IST

तामलवाडी : महावितरणने थकीत बिलाच्या वसुलीसाठी तोडलेली वीज बिलाचा भरणा करूनही जोडली जात नसल्यामुळे चार गावच्या ग्रामस्थांना सध्या तीव्र ...

तामलवाडी : महावितरणने थकीत बिलाच्या वसुलीसाठी तोडलेली वीज बिलाचा भरणा करूनही जोडली जात नसल्यामुळे चार गावच्या ग्रामस्थांना सध्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्याचा शोध घेत ग्रामस्थ भर उन्हात रानोमाळ भटकंती करताना दिसत आहेत.

तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा वीज उपकेंद्रांतर्गत असलेल्या सांगवी, पिंपळा (खुर्द), पिंपळा (बु.) आणि कुंभारी या गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहरीवरील वीज पंपांचा विद्युत पुरवठा थकीत बिलासाठी महावितरणने खंडित केला आहे. यानंतर ग्रामपंचायतीने बिलाच्या थकबाकीपोटीची रक्कम महावितरण कार्यालयाकडे भरणा केली. त्यास चार दिवस लोटले तरी महावितरणकडून अद्याप ही वीज जोडणी पूर्ववत करण्यात आली नाही. त्यामुळे मागील पाच दिवसांपासून या चार गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावात पाण्याचा थेंब नसल्याने ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत असल्याने ग्रामस्थांत महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

झोपडपट्टीवासीयांचे हाल कायम

सांगवी झोपडपट्टी भागात विजेविना चालणारे पाण्याचे एकही स्रोत नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना नळाच्या पाणीपुरवठ्यावरच अवलंबून राहावे लागते; परंतु महावितरणने येथील पाणीपुरवठ्याची वीजदेखील खंडित केली असून, शेतीपंपासाठी दिवसाकाठी तासभर मिळणारी वीजही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे जनावरे, गावकऱ्यांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. शेतात जनावरांना पाणी पाजण्यासाठी विहिरीतून घागरीने पाणी काढावे लागत असून, झोपडपट्टीतील रहिवाशांना जीव मुठीत घेऊन महामार्ग ओलांडून पाण्यासाठी भटकावे लागत आहे.

...तर घागर मोर्चा काढू

ग्रामपंचायतने वीज बिलाची रक्कम भरूनही तीन दिवस झाले; परंतु माळुंब्रा वीज उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता पी. एन. कावरे हे वीज जोडणीचे आदेश देण्यास जाणूनबुजून टाळाटाळ करीत आहेत. याबाबत राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडेदेखील तक्रार केली आहे. महावितरणने तात्काळ वीजपुरवठा जोडून न दिल्यास कार्यालयावर घागर मोर्चा काढू, असा इशारा सांगवीचे उपसरपंच मिलिंद मगर यांनी दिला आहे.

कोट....

माझी सांगवी शिवारात स्वत:ची शेतजमीन, विहीर असून, शेतीपंपासाठी अनामत रक्कम भरल्यानंतर महावितरणने तीन वर्षांपूर्वी खांब उभारून तारा ओढल्या; परंतु अद्यापही वीजजोडणी दिलेली नाही. त्यामुळे विहिरीतून घागरीने पाणी उपसून जनावरांची तहान भागवावी लागत आहे.

- ज्ञानेश्वर मगर,

शेतकरी सांगवी (काटी)