शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

नववी ते बारावीच्या वर्गाची अजूनही ३५ टक्केच उपस्थिती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:43 IST

उस्मानाबाद -काेराेनाचा संसर्ग ओसरल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत; परंतु महिनाभरापेक्षा अधिक कालावधी लाेटला ...

उस्मानाबाद -काेराेनाचा संसर्ग ओसरल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत; परंतु महिनाभरापेक्षा अधिक कालावधी लाेटला असतानाही शाळांतील पट अपेक्षित गतीने वाढताना दसत नाही. आजघडीला ८० हजार २९२ पैकी २८ हजार ४०७ म्हणजेच ३५ विद्यार्थीच शाळेत दाखल झाले आहेत. हे प्रमाण वाढविण्यासाठी आता शिक्षण विभागाने विशेष उपाययाेजना हाती घेणे गरजेचे आहे.

काेराेनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाच्या निर्देशानुसार शाळा बंद ठेवण्यात आल्या हाेत्या. दरम्यान, काेराेनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर साधारण २३ नाव्हेंबर २०१९ पासून नववी ते बरावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले. जिल्ह्यात नववी ते बारावीचे वर्ग असलेल्या शाळांची संख्या साधारण ४९१ एवढी आहे. यापैकी ४६२ शाळांतील वर्ग भरविण्यात येत आहेत. या सर्व वर्गांची मिळून विद्यार्थीसंख्या ८० हजार २९२ एवढी आहे. ४ जानेवारी अखेर २८ हजार ४०७ विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली आहे. याचे प्रमाण ३५ टक्केच आहे. ही बाब लक्षात घेऊन आता शिक्षण विभागाच्यावतीने पालकांच्या घरी जावून मुलांना शाळेत पाठविण्याचे आवाहन केले जात आहे, तसेच खबरदारीचा उपाय म्हणून काेणकाेणत्या उपाययाेजना केल्या जात आहेत, त्याचीही माहिती दिली जात आहे.

चाैकट...

४९१

नववी ते बारावीचे वर्ग असलेल्या एकूण शाळा

४६२

सुरू असलेल्या शाळा

८०२९२

एकूण विद्यार्थी

२८४०७

विद्यार्थ्यांची उपस्थिती

महिनाभरात जिल्ह्यात एकही विद्यार्थी नाही संक्रमित

शाळा भरविल्यानंतर विद्यार्थी काेराेना संक्रमित हाेतील, अशी भीती अनेकांनी बाेलून दाखविली हाेती; परंतु सरकारच्या निर्देशानुसार सर्वच शाळांकडून खबरदारीचा भाग म्हणून सॅनिटाझर, मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबत सक्त सूचना केल्या आहेत. त्यामुळे काळजी घेतली जात आहे. परिणामी, आजवर एकही विद्यार्थी संक्रमित झाला नाही, हे विशेष.

राज्य सरकारने नववी ते बारावीचे वर्ग भरविण्यास अनुमती दिल्यानंतर सर्व शाळांच्या संबंधित मुख्याध्यापकांची बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या हाेत्या, तसेच शिक्षकांच्या चाचण्या करूनच त्यांना वर्गावर पाठविले हाेते. त्यामुळे आपल्याकडे आजवर एकही विद्यार्थी संक्रमित आढळलेला नाही. ही आपल्या दृष्टिकाेनातून दिलासादायक बाब मानली पाहिजे.

-गजानन सुसर, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद.

सुरुवातीच्या दिवशी अवघे पाच ते हजार विद्यार्थीच वर्गात आले हाेते. यानंतर सातत्याने उपस्थिती वाढत गेली.