शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
6
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
7
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
10
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
11
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
12
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
13
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
14
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
15
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
16
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
17
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
18
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
19
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
20
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात

नववी ते बारावीच्या वर्गाची अजूनही ३५ टक्केच उपस्थिती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:43 IST

उस्मानाबाद -काेराेनाचा संसर्ग ओसरल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत; परंतु महिनाभरापेक्षा अधिक कालावधी लाेटला ...

उस्मानाबाद -काेराेनाचा संसर्ग ओसरल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत; परंतु महिनाभरापेक्षा अधिक कालावधी लाेटला असतानाही शाळांतील पट अपेक्षित गतीने वाढताना दसत नाही. आजघडीला ८० हजार २९२ पैकी २८ हजार ४०७ म्हणजेच ३५ विद्यार्थीच शाळेत दाखल झाले आहेत. हे प्रमाण वाढविण्यासाठी आता शिक्षण विभागाने विशेष उपाययाेजना हाती घेणे गरजेचे आहे.

काेराेनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाच्या निर्देशानुसार शाळा बंद ठेवण्यात आल्या हाेत्या. दरम्यान, काेराेनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर साधारण २३ नाव्हेंबर २०१९ पासून नववी ते बरावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले. जिल्ह्यात नववी ते बारावीचे वर्ग असलेल्या शाळांची संख्या साधारण ४९१ एवढी आहे. यापैकी ४६२ शाळांतील वर्ग भरविण्यात येत आहेत. या सर्व वर्गांची मिळून विद्यार्थीसंख्या ८० हजार २९२ एवढी आहे. ४ जानेवारी अखेर २८ हजार ४०७ विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली आहे. याचे प्रमाण ३५ टक्केच आहे. ही बाब लक्षात घेऊन आता शिक्षण विभागाच्यावतीने पालकांच्या घरी जावून मुलांना शाळेत पाठविण्याचे आवाहन केले जात आहे, तसेच खबरदारीचा उपाय म्हणून काेणकाेणत्या उपाययाेजना केल्या जात आहेत, त्याचीही माहिती दिली जात आहे.

चाैकट...

४९१

नववी ते बारावीचे वर्ग असलेल्या एकूण शाळा

४६२

सुरू असलेल्या शाळा

८०२९२

एकूण विद्यार्थी

२८४०७

विद्यार्थ्यांची उपस्थिती

महिनाभरात जिल्ह्यात एकही विद्यार्थी नाही संक्रमित

शाळा भरविल्यानंतर विद्यार्थी काेराेना संक्रमित हाेतील, अशी भीती अनेकांनी बाेलून दाखविली हाेती; परंतु सरकारच्या निर्देशानुसार सर्वच शाळांकडून खबरदारीचा भाग म्हणून सॅनिटाझर, मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबत सक्त सूचना केल्या आहेत. त्यामुळे काळजी घेतली जात आहे. परिणामी, आजवर एकही विद्यार्थी संक्रमित झाला नाही, हे विशेष.

राज्य सरकारने नववी ते बारावीचे वर्ग भरविण्यास अनुमती दिल्यानंतर सर्व शाळांच्या संबंधित मुख्याध्यापकांची बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या हाेत्या, तसेच शिक्षकांच्या चाचण्या करूनच त्यांना वर्गावर पाठविले हाेते. त्यामुळे आपल्याकडे आजवर एकही विद्यार्थी संक्रमित आढळलेला नाही. ही आपल्या दृष्टिकाेनातून दिलासादायक बाब मानली पाहिजे.

-गजानन सुसर, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद.

सुरुवातीच्या दिवशी अवघे पाच ते हजार विद्यार्थीच वर्गात आले हाेते. यानंतर सातत्याने उपस्थिती वाढत गेली.