शहरं
Join us  
Trending Stories
1
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
3
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
4
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
5
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
6
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
7
एकीकडे 'घरवाली' दुसरीकडे 'बाहेरवाली'; दोघींसोबत आनंदाने जगत होता तरुण अन् एक दिवस असं काही झालं... 
8
पितृपक्ष इंदिरा एकादशी २०२५: १० राशींवर श्रीहरी प्रसन्न, शिव-गौरी-लक्ष्मी कृपा; शुभ-लाभ-पैसा!
9
'क्रिस्टल ब्लॅक पर्ल' रंगात होंडा अमेझ भारतात लॉन्च; नव्या लूकमध्ये दिसते आणखी धासू!
10
बीचवर फिरायला गेलेल्या तरुणीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार; पोलिसांनी आरोपी कसे शोधले?
11
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
12
आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली...
13
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
14
'ओझेम्पिक टीथ' म्हणजे काय? वजन कमी करण्याच्या औषधाचा होतोय 'असा' दुष्परिणाम
15
Nupur Bora: नुपूर बोरा आहे तरी कोण? सहा वर्षात अनेक गैरव्यवहार, घरातही सापडलं मोठं घबाड!
16
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
17
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
18
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
19
बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला
20
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स

नववी ते बारावीच्या वर्गाची अजूनही ३५ टक्केच उपस्थिती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:43 IST

उस्मानाबाद -काेराेनाचा संसर्ग ओसरल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत; परंतु महिनाभरापेक्षा अधिक कालावधी लाेटला ...

उस्मानाबाद -काेराेनाचा संसर्ग ओसरल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत; परंतु महिनाभरापेक्षा अधिक कालावधी लाेटला असतानाही शाळांतील पट अपेक्षित गतीने वाढताना दसत नाही. आजघडीला ८० हजार २९२ पैकी २८ हजार ४०७ म्हणजेच ३५ विद्यार्थीच शाळेत दाखल झाले आहेत. हे प्रमाण वाढविण्यासाठी आता शिक्षण विभागाने विशेष उपाययाेजना हाती घेणे गरजेचे आहे.

काेराेनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाच्या निर्देशानुसार शाळा बंद ठेवण्यात आल्या हाेत्या. दरम्यान, काेराेनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर साधारण २३ नाव्हेंबर २०१९ पासून नववी ते बरावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले. जिल्ह्यात नववी ते बारावीचे वर्ग असलेल्या शाळांची संख्या साधारण ४९१ एवढी आहे. यापैकी ४६२ शाळांतील वर्ग भरविण्यात येत आहेत. या सर्व वर्गांची मिळून विद्यार्थीसंख्या ८० हजार २९२ एवढी आहे. ४ जानेवारी अखेर २८ हजार ४०७ विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली आहे. याचे प्रमाण ३५ टक्केच आहे. ही बाब लक्षात घेऊन आता शिक्षण विभागाच्यावतीने पालकांच्या घरी जावून मुलांना शाळेत पाठविण्याचे आवाहन केले जात आहे, तसेच खबरदारीचा उपाय म्हणून काेणकाेणत्या उपाययाेजना केल्या जात आहेत, त्याचीही माहिती दिली जात आहे.

चाैकट...

४९१

नववी ते बारावीचे वर्ग असलेल्या एकूण शाळा

४६२

सुरू असलेल्या शाळा

८०२९२

एकूण विद्यार्थी

२८४०७

विद्यार्थ्यांची उपस्थिती

महिनाभरात जिल्ह्यात एकही विद्यार्थी नाही संक्रमित

शाळा भरविल्यानंतर विद्यार्थी काेराेना संक्रमित हाेतील, अशी भीती अनेकांनी बाेलून दाखविली हाेती; परंतु सरकारच्या निर्देशानुसार सर्वच शाळांकडून खबरदारीचा भाग म्हणून सॅनिटाझर, मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबत सक्त सूचना केल्या आहेत. त्यामुळे काळजी घेतली जात आहे. परिणामी, आजवर एकही विद्यार्थी संक्रमित झाला नाही, हे विशेष.

राज्य सरकारने नववी ते बारावीचे वर्ग भरविण्यास अनुमती दिल्यानंतर सर्व शाळांच्या संबंधित मुख्याध्यापकांची बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या हाेत्या, तसेच शिक्षकांच्या चाचण्या करूनच त्यांना वर्गावर पाठविले हाेते. त्यामुळे आपल्याकडे आजवर एकही विद्यार्थी संक्रमित आढळलेला नाही. ही आपल्या दृष्टिकाेनातून दिलासादायक बाब मानली पाहिजे.

-गजानन सुसर, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद.

सुरुवातीच्या दिवशी अवघे पाच ते हजार विद्यार्थीच वर्गात आले हाेते. यानंतर सातत्याने उपस्थिती वाढत गेली.