शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

नवा कोरोना येतोय, तरीही नागरिक गाफिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:00 IST

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा प्रवेश एप्रिलमध्ये झाला. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत येथे उशिरा लागण सुरु झाली असली तरी प्रसाराची गती मात्र ...

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा प्रवेश एप्रिलमध्ये झाला. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत येथे उशिरा लागण सुरु झाली असली तरी प्रसाराची गती मात्र सुपरफास्ट होती. त्यामुळेच जिल्ह्यात आजवर १७ हजारांहून अधिक जण कोरोनाबाधित झाले. बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के असले तरी मृत्यूचे प्रमाण साडेतीन टक्क्यांवर आहे. नागरिकांतील बेफिकिरी, अपुरी आरोग्य व्यवस्था यामुळे मृत्यूचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत उस्मानाबादला जास्त आहे. ही काळजीत भर टाकणारी बाब आहे. दरम्यान, अजूनही नियमितपणे कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेतच. दररोज सरासरी १० ते १२ रुग्ण कोरोनाबाधित निघत आहेत. हे प्रमाण काहिसे कमी वाटत असले तरी सध्या नागरिकांचा सुरु असलेला मुक्त संचार लक्षात घेता तो वाढण्यास वेळ लागणार नाही. शिवाय, आरोग्य यंत्रणा अजूनही म्हणावी तितकी सक्षम झालेली नाही. डॉक्टर तसेच कर्मचार्यांची मोठ्या प्रमाणात रिक्त असलेली पदे, अपुर्या सोयी यामुळे पुन्हा उद्रेक झाल्यास परिस्थिती नियंत्रणात आणणे जिकिरीचे होऊन जाईल.

विना मास्क, मुक्त प्रवेश...

बुधवारी बसस्थानकात पाहणी केली असता नागरिकांकडून मास्क, सुरक्षित अंतराचे कोठेच पालन होत नसल्याचे दिसून आले. सध्या लग्नसराई सुरु असल्याने प्रचंड गर्दी होत आहे. त्यात सुरक्षित अंतराला हरताळ फासला जात आहे. बसवर मोठ्या अक्षरात मास्क नसल्यास प्रवेश नसल्याचा संदेश कोरला आहे. मात्र, प्रत्यक्षात बोटावर मोजण्याइतक्याच लोकांकडे मास्क दिसून आला. तरीही सर्वांना विनाअडथळा प्रवेश मिळत होता.

बाजारपेठेतही नियमांना फाटा...

दुकाने सुरु करताना दकानदारांना सॅनिटायझर ठेवणे, सातत्याने दुकानाची स्वच्छता करुन घेणे, मास्कविना ग्राहकास प्रवेश द्यायचा नाही, अंतराचे पालन असे नियम घालून देण्यात आले होते. मात्र, शहरातील मुख्य बाजारपेठेत फेरफटका मारला असता हे सर्व नियम आता कागदावरच राहिल्याचे दिसून आले. सॅनिटायझर ठेवले, मात्र वापर नाही. मास्कशिवाय व अंतराचे पालन न करता ग्राहक मुक्तपणे खरेदी करताना दिसून येत होते.

तर आता १ हजार दंड...

विनामास्क फिरल्यास यापूर्वी २०० रुपये दंड आकारला जात होता. मात्र, कोरोनाच्या उद्रेकाच्या भितीने व नागरिकांच्या बेफिकीर वृत्तीमुळे हा दंड आता १ हजार रुपये करण्यात आला आहे. विनामास्क सापडल्यास खिश्याला मोठी कात्री आता लागेल. तसेच सोहळे, मेळावे, लग्नसमारंभावरही पुन्हा निर्बंध आणले जात आहेत. संख्येची मर्यादा ओलांडल्यास गुन्हे दाखल होणार आहेत. शिकवण्यांचीही तपासणीहाती घेऊन नियमांचे पालनहोतेय का, याची चाचपणी केली जाणार आहे.