शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

कळंबमध्ये राष्ट्रवादीची वज्रमूठ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:31 IST

उस्मानाबाद -राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या सत्ता काळात कळंब शहरामध्ये माेठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. उर्वरित विकासकामांसाठीही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पाठपुरावा करावा, असे ...

उस्मानाबाद -राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या सत्ता काळात कळंब शहरामध्ये माेठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. उर्वरित विकासकामांसाठीही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पाठपुरावा करावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी केले. कळंबमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची वज्रमूठ कायम असल्याने आगामी निवडणुकीतही निश्चित यश मिळेल, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शहरातील वसंतराव काळे संगणक महाविद्यालयाच्या सभागृहात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी माजी आमदार राहुल मोटे, प्रदेश चिटणीस सुरेश पाटील ,जिल्हा कार्याध्यक्ष संजय दुधगावकर, धनेश्वरी शिक्षण समूहाचे डॉ. प्रतापसिंह पाटील, जिल्हा सरचिटणीस नितीन बागल, तालुकाध्यक्ष प्रा. श्रीधर भवर, उपनगराध्यक्ष संजय मुंदडा, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा. डॉ. संजय कांबळे, भास्कर खोसे, युवकचे प्रदेश सरचिटणीस तारेक मिर्झा, प्रा. तुषार वाघमारे, शंतनू खंदारे, महम्मद चाऊस, सुनंदा भोसले यांची प्रमुख उपस्थिती हाेती.

जिल्हाध्यक्ष प्रा. बिराजदार म्हणाले की, खा. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पुरोगामी विचार आणि तळागाळातील सर्वसामान्यांसाठी विकासात्मक भूमिका मांडूनच येणाऱ्या निवडणुकीला आपण सामोरे जाणार आहोत. बैठकीला उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संख्या पाहून आपणा सर्वांच्या बळावर हाेऊ घातलेल्या निवडणुकीत निश्चित विजय मिळवू, असा ठाम विश्वास व्यक्त केला. माजी आमदार माेटे यांनीही यावेळी मनाेगत व्यक्त केले. भवर यांनी संघटनात्मक बाबींचा लेखाजाेखा मांडला. उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी पक्षाने नगरपालिकेच्या माध्यमातून मागील पाच वर्षांत राबविलेल्या विकासकामांची माहिती दिली. बैठकीस नगरसेवक अमर गायकवाड, सुभाष पवार, शकील काझी, किरण मस्के, भाऊ कुचेकर, सुमित रणदिवे, बापू सावंत, सलमा सौदागर, शहराध्यक्ष मुन्नी सय्यद, भीमा हगारे, दर्शना बचुटे, अतिक पठाण, सर्फराज मोमीन, महेश पुरी, उत्तरेश्वर चोंदे, दिनेश यादव आदी उपस्थित हाेते. सूत्रसंचालन शहराध्यक्ष मुसद्दीक काझी यांनी, तर आभार शहर कार्याध्यक्ष बाळासाहेब कथले यांनी मानले.