शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

राष्ट्रीय महामार्गाची झाली चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:01 IST

मुरुम : उमरगा तालुक्यातील मुरुम फाटा ते अक्कलकोट या नव्याने घोषित झालेल्या राष्ट्रीय महामार्गवर प्रामुख्याने मुरुम ते आलूर दरम्यान ...

मुरुम : उमरगा तालुक्यातील मुरुम फाटा ते अक्कलकोट या नव्याने घोषित झालेल्या राष्ट्रीय महामार्गवर प्रामुख्याने मुरुम ते आलूर दरम्यान अनेक ठिकाणी धोकादायक खड्डे पडले असून खड्डयांमुळे वाहनचालक व प्रवाशांचे अंग मोकळे होत आहे. शिवाय जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे.

मुरुम फाटा ते अक्कलकोट हा केंद्र सरकारकडून राष्ट्रीय महामार्ग म्हणून आठ महिन्यापूर्वी जाहीर झाला आहे. यापूर्वी हा रस्ता राज्यमार्ग होता. या रस्त्यावर गेल्या वर्षभरापासून अनेक ठिकाणी धोकादायक खड्डे पडले आहेत. यासंदर्भात ‘लोकमत’ने मध्यंतरी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर या रस्त्यावरील बहुतांश खड्डे बुजवण्यात आले आहेत. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे मुरुम ते बेळंब पर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम अर्धवटच राहिले आहे. या रस्त्यावरुन उमरगा, अक्कलकोट, आळंद, लातूर, भोकर, पुणे, पाथरी आदी आगाराच्या दिवसभरात पन्नासेक बसफेऱ्या ये-जा करतात. पुढे हा रस्ता अक्कलकोट व उमरगा या गावांना जातो. दोन्ही गावे तालुक्याचे ठिकाण असल्याने वाहनांची नेहमी वर्दळ असते. तसेच कर्नाटकातील आळंद तालुक्यालाही हा रस्ता जात असल्याने या रस्त्यावर वाहनांची गर्दी असते. अतिवृष्टी आणि वाहनांच्या वर्दळीमुळे या रस्त्याची सध्या चाळण झाली आहे. रस्त्यावरील खड्यामुळे वाहनांची आदळआपट मोठ्या प्रमाणात होत आहे. मुरुम ते बेळंब पर्यंतच्या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात धोकादायक खड्डे पडले असून, हा रस्ताच खड्डयांनी व्यापला आहे. मुरुम ते बेळंबचे अंतर केवळ पाच किलोमीटरचे आहे. रस्ता चांगला झाल्यास केवळ पाच मिनीटात मुरुमला प्रवाशांना जाता येईल. मात्र, खड्डयांमुळे प्रवाशांना पाच किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी अर्धा तासाचा वेळ लागत आहे. रस्त्याचे काम होईल तेंव्हा होईल, पण महामार्ग विभागाने किमान खड्डे बुजवून वाहन चालक आणि प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी या भागातील नागरीकांतून होत आहे.

चौकट.......

...तर उद्योगधंद्यांना मिळेल चालना

मुरुम फाटा ते अक्कलकोट हा रस्ता कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग विभागाला जोडला जाणार आहे. या मार्गावरील वागदरी ते अक्कलकोट दरम्यान रस्त्याचे काम झाले असून, उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरुम फाटा ते बोळेगावच्या सीमेपर्यंत रस्त्याचे काम होणे आवश्यक आहे. हा रस्ता झाल्यानंतर अक्कलकोट येथील स्वामी समर्थ आणि गाणगापूर येथील दत्त मंदिर, कर्नाटकातील विजापूर येथील गोलघुमट, अलमट्टी डॅम, तसेच मराठवाड्यातील लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याला जोडला जाणार आहे. शिवाय कर्नाटकातील बीदर, कलबुर्गी आणि आंध्रप्रदेशातील जहिराबाद, संग्गारेड्डी, महीबूब नगर आदी जिल्ह्यांना जोडण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा ठरणार आहे. महामार्ग विभाकडून रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दळणवळण आणि औद्योगीकरण वाढणार असून, नवीन उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे.

कोट........

मुरुम फाटा ते अक्कलकोट या मार्गावरील बहुतांश खड्डे बुजवण्यात आले आहेत. केवळ मुरुम ते बेळंब या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम डांबरच्या टंचाईमुळे अर्धवट झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या रस्त्त्याच्या दुरुस्तीसाठी निविदा काढण्यात आली असून, लवकरच प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. जवळपास ७० कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली असून, यात रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम होणार आहे. मुरुमफाटा ते मुरुमपर्यंत १० मीटरने रस्ता वाढणार आहे. तसेच मुरुम ते बोळेगाव या उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेपर्यंत ७ मीटरनी रस्ता वाढणार आहे.

- विजय स्वामी, कनिष्ठ अभियंता, महामार्ग विभाग, सोलापूर