शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

पालिका निवडणुकांचा निनादला शंखनाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:37 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातील मुदत संपुष्टात येत असलेल्या नगरपालिकांच्या निवडणुका वेळेत घेण्याच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने शुक्रवारी कच्चा आराखडा तयार करण्याचे ...

उस्मानाबाद : जिल्ह्यातील मुदत संपुष्टात येत असलेल्या नगरपालिकांच्या निवडणुका वेळेत घेण्याच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने शुक्रवारी कच्चा आराखडा तयार करण्याचे निर्देश जारी केले आहेत. त्यामुळे पाण्यात देव ठेवून बसलेल्या इच्छुकांची आता लगीनघाई जोरात सुरु होणार आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वच नगरपालिकांची मुदत येत्या डिसेंबरमध्ये संपुष्टात येणार आहे. याअनुषंगाने या सर्वच ठिकाणी राजकीय लगीनघाई सुरु झालेली आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या पालिकांच्या निवडणुका वेळेत होतील का, याबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या. दरम्यान, दुसऱ्या लाटेनंतर आता कोरोनाचा प्रकोप बऱ्यापैकी कमी झाला आहे. नागरिकांचे दैनंदिन जीवनमान, बाजारपेठा सुरळीत सुरु झाल्या आहेत. परिणामी, निवडणुका वेळेत होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्वच राजकीय पक्षांनी बैठका, मेळाव्यांचा धडाका लावला आहे. शिवाय, स्थानिक पातळीवर इच्छुकही गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. यावेळी होणाऱ्या निवडणुका एक प्रभाग, एक नगरसेवक या पद्धतीने घेतल्या जाणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अनेकांच्या आकांक्षेला पालवी फुटली आहे. शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने दिशानिर्देश जारी केले आहेत. यामध्ये आगामी डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात मुदत संपुष्टात येणाऱ्या सर्वच नगरपालिकांचा प्रारुप आराखडा तयार करण्याबाबत सूचित केले आहे. एक प्रभाग, एक सदस्य याप्रमाणे प्रभागांची रचना करण्याची सूचनाही करण्यात आली आहे. त्यामुळे आता निवडणूक प्रक्रियेला गती येणार आहे.

ओबीसी आरक्षण, वेळ ढकलली...

निवडणूक आयोगाने आपल्या निर्देशांमध्ये ओबीसी आरक्षणासंदर्भातही भाष्य केले आहे. हा विषय आरक्षणाबाबत असल्याने त्याबाबत काय कार्यवाही अनुसरायची ती प्रारुप प्रभाग प्रसिद्धी व आरक्षण सोडतीच्या वेळी सूचना करण्यात येतील, असे आयोगाने कळविले आहे. यादरम्यानच्या काळात आरक्षणाबाबत काही वेगळा निर्णय झाल्यास तो सोडतीच्या वेळी अनुसरता येईल, असेच अप्रत्यक्षरित्या यातून सूचित करण्यात आले आहे.

८ नगरपालिकांत पडघम...

जिल्ह्यातील उस्मानाबादसह कळंब, भूम, परंडा, तुळजापूर, नळदुर्ग, उमरगा व मुरुम या आठही नगरपालिकांची मुदत संपुष्टात येत आहे. त्यामुळे येथील कच्चा आराखडा तयार करण्याचे काम सोमवारपासून सुरु होणार आहे. दरम्यान, वाशी व लोहारा नगरपंचायतींची मुदत यापूर्वीच संपुष्टात आल्याने तेथे प्रशासक नेमण्यात आले आहेत. त्यांचे प्रारुप आराखडे मंजूरही झाले आहेत. आता या नगरपंचायतींच्या निवडणुका नगरपालिकांसोबतच होणार की त्यापूर्वीच होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.