शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

तेरणाच्या पुनरुज्जीवनासाठी कारखान्यावर धडकला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:49 IST

मराठवाड्याच्या साखर कारखानदारीत आपले वैभव सिद्ध केलेला तेरणा कारखाना मागील तेरा वर्षांपासून बंद आहे. यामुळेच तेरणा पट्ट्यातील शेतकऱ्यांना ऊस ...

मराठवाड्याच्या साखर कारखानदारीत आपले वैभव सिद्ध केलेला तेरणा कारखाना मागील तेरा वर्षांपासून बंद आहे. यामुळेच तेरणा पट्ट्यातील शेतकऱ्यांना ऊस गाळपासाठी विविध अडचणी येत आहेत. खासगी कारखाने सहकारी कारखान्याच्या तुलनेत भाव कमी देत आहेत. आपल्या हक्काचा आणि आपल्या मालकीचा कारखाना बंद असल्याने या भागातील शेतकरी अडचणीत आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी ऊस गाळप होतो की नाही या भीतीपोटी उसाची लागवडच केली नाही, तर अनेक कामगारांचे कुटुंब उदरनिर्वाहासाठी स्थलांतरित झाले. शिवाय, कारखाना बंद असल्याने ढोकीची आर्थिक प्रगतीच खुंटली आहे. ही बाब लक्षात घेता राज्य सरकारने कर्जाच्या थकहमीतून ३० कोटी रुपये उपलब्ध करून जिल्हा मध्यवर्ती बँकेत वर्ग करावे, बँकेच्या अवसायकाच्या निगराणीखाली निविदा काढून कारखाना दीर्घकालीन भाडेतत्त्वावर देऊन येणाऱ्या हंगामात सुरू करावा, ही मागणी शेतकरी व सभासदांकडून केली जात आहे. याच मागणीच्या समर्थनार्थ तेरणा बचाव संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी आंदोलन करण्यात आले. ढोकी येथील हनुमान चौकातून निघालेला हा मोर्चा बसस्थानकमार्गे बालाजीनगर 'पेट्रोल पंप चौकमार्गे कारखाना स्थळावर धडकला. कारखाना गेटवर या मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी दत्तात्रय देशमुख म्हणाले, मागील तेरा वर्षांपासून या भागातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व आर्थिक विकास थांबला आहे. सरकारने मोठमोठ्या उद्योग-व्यवसायांना मदत केली. त्यांचे वीजबिल माफ केले, व्याज माफ केले. मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी मदत केली नाही. सरकारने तेरणा कारखाना सुरू करण्यासाठी मदत करावी कोरोनात जितकी माणसे मेली नाहीत, तेवढी माणसे हा कारखाना बंद असल्याने मेल्याचा दावा देशमुख यांनी केला. यावेळी अजित खोत, निहाल काझी, सतीश देशमुख, संग्राम देशमुख, लक्ष्मण सरडे, शिवाजीराव देशमुख, सतीश वाकुरे, अमोल समुद्रे, सुशील गडकर, गफार काझी यांचीही भाषणे झाली.

बाजारपेठ बंद ठेवून समर्थन...

या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ढोकी येथील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून व्यापारीवर्ग आंदोलनात सहभागी झाला होता. तसेच आंदोलनात महिला बचत गटातील २००हून अधिक महिलाही सहभागी झाल्या होत्या. कारखान्याच्या गेटवर आंदोलनस्थळी या महिलासह शेतकरी, शेतमजूर, कामगार, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलनाचे स्वरूप बदलले...

जोपर्यंत कारखाना सुरू होत नाही, तोपर्यंत गटनिहाय कारखाना गेटवर आंदोलन करण्यात येणार होते. परंतु, कोरोनामुळे या आंदोलनाचे स्वरूप बदलण्यात येणार आहे. मात्र, जोपर्यंत तेरणा चालू होत नाही तोपर्यंत या भागातील शेतकरी स्वस्थ बसणार नाही. लोकशाही मार्गाने कोरोनाच्या नियम व अटीचा पालन करीत लढा सुरूच ठेवण्यात येईल, असे संघर्ष समितीच्या वतीने कळविण्यात आले.