शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाच्या कामावरून आमदारांनी केली अधिकाऱ्यांची कानउघाडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:33 IST

तुळजापूर : नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर तुळजापूरनजीक झालेल्या लातूर रोड बायपास चौकात अपघाताच्या प्रमाणात वाढ झाल्याने व शुक्रवारी झालेल्या अपघाताची ...

तुळजापूर : नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर तुळजापूरनजीक झालेल्या लातूर रोड बायपास चौकात अपघाताच्या प्रमाणात वाढ झाल्याने व शुक्रवारी झालेल्या अपघाताची दखल घेत आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी बायपास चौकाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपस्थित राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना धारेवर धरून तुमची जबाबदारी पार पाडा, तुम्हाला पगार कशासाठी आहे, अशा शब्दांत कानउघाडणी करीत कामामध्ये कुठल्याही प्रकारची हयगय नको, असे स्पष्ट केले.

यावेळी आ. पाटील यांनी उपस्थित नागरिकांकडून या बायपास चौकात आतापर्यंत अपघाताच्या किती घटना घडल्या आहेत, तसेच अर्धवट रस्ता कामाची माहिती घेतली. उपस्थित नागरिकांनी दिलीप बिल्डकॉनवाल्यांनी अर्धवट रस्ता सोडल्याचे सांगितल्यानंतर संबंधित कंपनीवर कार्यवाही करण्याची जबाबदारीही या अधिकाऱ्यांचीच आहे. रस्ता पूर्ण नाही झाला तरी रमलर टाकण्यासाठी काय अडचण आहे, अशी विचारणा आ. पाटील यांनी महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केल्यानंतर त्यांनी संबंधित कंपनीला लेखी पत्र दिल्याचा खुलासा केला. यावर संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी २७ मार्च रोजी महामार्ग प्रशासनाकडून पत्र आले असल्याचे सांगितले. यावर आ. पाटील चांगलेच संतापले. सोमवारी प्रोजेक्ट डायरेक्टर यांना बोलावून घ्या, अशा त्यांनी सूचना कनिष्ठ अभियंत्यांना दिल्या. दरम्यान, दिलीप बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांनी या बायपास चौकात तुळजापूर-लातूर रोडवर उड्डाणपुलाचे प्रोपोजल करण्यात येत आहे, सध्या तातडीने सोलापूर-उस्मानाबाद रोडवर स्पीड ब्रेकरचे, तर तुळजापूर-लातूर रोडवर रमलिंगचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी पोलीस निरीक्षक मनोजकुमार राठोड, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर पात्रे, पोहेकॉ अण्णासाहेब कदम, देवबोने, राष्ट्रीय महामार्गाचे कनिष्ठ अभियंता अनंत पुयड, लॉइन कन्सल्टंट इंजिनिअर व्ही. व्ही. कुलकर्णी, भाजपचे आनंद कंदले, आकाश मस्के, मनोज मस्के, आकाश चंदनशिवे, दिलीप बिल्ड कॉनच्या अधिकाऱ्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

...तर कंपनीवर गुन्हा दाखल करा

यावेळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना अपघातासारख्या घटना घडू नयेत यासाठी रस्त्याची जबाबदारी ही कोणाची आहे, अशी विचारणा केली. यावर पोलीस अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाची असल्याची सांगून आपण त्यांना उपयोजना राबवावे, असा पत्रव्यवहार केला असल्याचे सांगितले. यानंतर आ. पाटील यांनी अपघात घडू नये म्हणून रस्त्याची जबाबदारी ही राष्ट्रीय महामार्गवाल्यांची असेल आणि पोलिसांनी पत्रव्यवहार करूनसुद्धा यांना समजत नसेल तर तुम्ही शासनामार्फत महामार्गवाल्यांचा निष्काळजीपणा असा गुन्हा दाखल करावा, असे निर्देश दिले.