शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

गायब अभिलेख्यांमुळे चौकशीला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:00 IST

कळंब : शेततळ्यातील बोगसगिरी उघड झाल्यानंतर कळंब तालुका कृषी कार्यालयाचा कारभार पुन्हा चर्चेत आला आहे. उपविभागीय कृषी अधिकारी यांनी ...

कळंब : शेततळ्यातील बोगसगिरी उघड झाल्यानंतर कळंब तालुका कृषी कार्यालयाचा कारभार पुन्हा चर्चेत आला आहे. उपविभागीय कृषी अधिकारी यांनी नेमलेल्या समितीला शेततळ्याची अभिलेखेच मिळत नसल्याने ही अभिलेखे नेमकी गेली कुठे? असा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे.

कळंब तालुका कृषी कार्यालयामार्फत २०१५ ते २०१८ मध्ये झालेल्या शेततळ्याच्या कामांच्या चौकशीची मागणी तालुक्यातील एकुरका येथील सामाजिक कार्यकर्ते संदीपान कांबळे यांनी प्रशासनाकडे केली होती. या प्रकरणाबाबत ‘लोकमत’ नेही वारंवार पाठपुरावा केला. याची दखल घेऊन उपविभागीय कृषी अधिकारी यांनी एस. बी. गोसावी यांना पथक प्रमुख नेमून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी पर्यवेक्षक आर. डी. कोंढारे, कृषी सहाय्यक ए. एन. तपसे, रोपमळा सहाय्यक व्ही. एन. शिंदे यांचे पथक चौकशीसाठी नेमले होते.

या कामाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने दि २१ मे २०१९ रोजी तालुका कृषी कार्यालयाला भेट देऊन तक्रारीच्या अनुषंगाने अभिलेखे उपलब्ध करून देण्याची मागणी केली. परंतु, ती देण्यात आली नाहीत. त्यामुळे तालुका कृषी कार्यालयाने नेमकी कुठे कामे केली, याची माहितीच चौकशी समितीला मिळू शकली नाही.

तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी गट नंबरसहीत तक्रार देऊन शेततळे झालेच नाहीत, असे निवेदन दिल्याने त्या आधारावर समितीने चौकशी केली व दोन शेततळ्याबाबत अहवाल दिला. परंतू, इतर शेततळ्याबाबतची कागदपत्रे तालुका कृषी कार्यालयाने उपलब्ध करून दिली नाहीत. याबाबतचा स्पष्ट उल्लेख समितीने अहवालात केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभिर्य ओळखून सर्व शेततळ्यांची अभिलेखे उपलब्ध करून देण्याच्या सूचना तालुका कृषी अधिकाऱ्यांना आपल्या स्तरावर द्याव्यात, असे उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना अहवाल सादर करताना म्हटले आहे. पावसाच्या पाण्याची साठवणूक व्हावी, त्याद्वारे शेत शिवारात सिंचनाची सोय व्हावी व बारमाही पीके घेता यावीत अशा उदात्त हेतूने शासनाने शेततळ्यांना दिलेला निधी कामे न करताच उचलला गेल्याने शेतकरी वर्गातही संताप व्यक्त केला जात आहे. या सर्व कामाची चौकशी करण्याची मागणीही पुढे येत आहे.

चौकट -

घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता!

शासनाने शेततळ्यांसाठी विविध योजना जाहीर केल्या होत्या. त्यांच्या आकारानुसार त्याची रक्कम ठरवण्यात आली होती. कृषी मधील काहींनी भागीदारीमध्ये जेसीबी, पोकलेन यासारखी यंत्रे घेऊन ही कामे केल्याची चर्चाही त्यावेळी होती. त्यांच्या ऑफ रेकॉर्ड गुत्तेदारीचे अनेक किस्सेही त्यावेळी सांगितले जात असत. तालुक्यात काही ठिकाणी शेततळी केली, बिले उचलली व पुन्हा बुजवून त्यावर पिकेही घेतल्याची उदाहरणे सांगितली जात आहेत. त्यामुळे हा घोटाळा मोठा व व्यापक असण्याची शक्यता आहे.