शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

गायब अभिलेख्यांमुळे चौकशीला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:00 IST

कळंब : शेततळ्यातील बोगसगिरी उघड झाल्यानंतर कळंब तालुका कृषी कार्यालयाचा कारभार पुन्हा चर्चेत आला आहे. उपविभागीय कृषी अधिकारी यांनी ...

कळंब : शेततळ्यातील बोगसगिरी उघड झाल्यानंतर कळंब तालुका कृषी कार्यालयाचा कारभार पुन्हा चर्चेत आला आहे. उपविभागीय कृषी अधिकारी यांनी नेमलेल्या समितीला शेततळ्याची अभिलेखेच मिळत नसल्याने ही अभिलेखे नेमकी गेली कुठे? असा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे.

कळंब तालुका कृषी कार्यालयामार्फत २०१५ ते २०१८ मध्ये झालेल्या शेततळ्याच्या कामांच्या चौकशीची मागणी तालुक्यातील एकुरका येथील सामाजिक कार्यकर्ते संदीपान कांबळे यांनी प्रशासनाकडे केली होती. या प्रकरणाबाबत ‘लोकमत’ नेही वारंवार पाठपुरावा केला. याची दखल घेऊन उपविभागीय कृषी अधिकारी यांनी एस. बी. गोसावी यांना पथक प्रमुख नेमून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी पर्यवेक्षक आर. डी. कोंढारे, कृषी सहाय्यक ए. एन. तपसे, रोपमळा सहाय्यक व्ही. एन. शिंदे यांचे पथक चौकशीसाठी नेमले होते.

या कामाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने दि २१ मे २०१९ रोजी तालुका कृषी कार्यालयाला भेट देऊन तक्रारीच्या अनुषंगाने अभिलेखे उपलब्ध करून देण्याची मागणी केली. परंतु, ती देण्यात आली नाहीत. त्यामुळे तालुका कृषी कार्यालयाने नेमकी कुठे कामे केली, याची माहितीच चौकशी समितीला मिळू शकली नाही.

तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी गट नंबरसहीत तक्रार देऊन शेततळे झालेच नाहीत, असे निवेदन दिल्याने त्या आधारावर समितीने चौकशी केली व दोन शेततळ्याबाबत अहवाल दिला. परंतू, इतर शेततळ्याबाबतची कागदपत्रे तालुका कृषी कार्यालयाने उपलब्ध करून दिली नाहीत. याबाबतचा स्पष्ट उल्लेख समितीने अहवालात केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभिर्य ओळखून सर्व शेततळ्यांची अभिलेखे उपलब्ध करून देण्याच्या सूचना तालुका कृषी अधिकाऱ्यांना आपल्या स्तरावर द्याव्यात, असे उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना अहवाल सादर करताना म्हटले आहे. पावसाच्या पाण्याची साठवणूक व्हावी, त्याद्वारे शेत शिवारात सिंचनाची सोय व्हावी व बारमाही पीके घेता यावीत अशा उदात्त हेतूने शासनाने शेततळ्यांना दिलेला निधी कामे न करताच उचलला गेल्याने शेतकरी वर्गातही संताप व्यक्त केला जात आहे. या सर्व कामाची चौकशी करण्याची मागणीही पुढे येत आहे.

चौकट -

घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता!

शासनाने शेततळ्यांसाठी विविध योजना जाहीर केल्या होत्या. त्यांच्या आकारानुसार त्याची रक्कम ठरवण्यात आली होती. कृषी मधील काहींनी भागीदारीमध्ये जेसीबी, पोकलेन यासारखी यंत्रे घेऊन ही कामे केल्याची चर्चाही त्यावेळी होती. त्यांच्या ऑफ रेकॉर्ड गुत्तेदारीचे अनेक किस्सेही त्यावेळी सांगितले जात असत. तालुक्यात काही ठिकाणी शेततळी केली, बिले उचलली व पुन्हा बुजवून त्यावर पिकेही घेतल्याची उदाहरणे सांगितली जात आहेत. त्यामुळे हा घोटाळा मोठा व व्यापक असण्याची शक्यता आहे.