शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

उस्मानाबाद शहराचा पारा पोहोचला ४० अंशापार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:31 IST

यंदा मार्च महिना सुरु झाला की, तापमान ३५ अंशाच्या पुढे सरकले. त्यामुळे मार्च महिन्यापासून उन्हाच्या झळा बसू लागल्या होत्या. ...

यंदा मार्च महिना सुरु झाला की, तापमान ३५ अंशाच्या पुढे सरकले. त्यामुळे मार्च महिन्यापासून उन्हाच्या झळा बसू लागल्या होत्या. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पारा ३८ अंशांच्या पुढे सरकला. एप्रिल महिना उजाडताच पारा ४० अंशाच्या पार पोहोचला आहे. सकाळी ११ वाजल्यापासून उन्ह्याचे चटके बसू लागल्याने नागरिक कामानिमित्त घराबाहेर पडताना डोक्यावर रूमाल, टोपी तसेच डोळ्याला गॉगल लावून उन्हापासून बचाव करीत आहेत. तर काहीजण उन्हामुळे घराबाहेर पडणे टाळत आहेत. उकाड्यामुळे अनेकांनी अडगळीला पडलेले पंखे, कुलर पुन्हा वापरासाठी बाहेर काढले आहेत. तर काही जण नवीन पंखे, कुलर खरेदी करीत असल्याचे चित्र आहे.

मागील पाच दिवसातील तापमान

दिनांक कमाल किमान

१ एप्रिल ४०.५ २३.२

२ एप्रिल ४०.६ २३.१

३ एप्रिल ४०.३ २३.१

४ एप्रिल ४०.७ २४.१

५ एप्रिल ४०.७ २४.१

चौकट...

पाणीदार फळांना मागणी वाढली

वाढत्या उष्म्यामुळे शरीराचे तापमान वाढत आहे. त्यामुळे अंगाचे पाणी पाणी होत असल्याने शरीराची झिज भरुन काढण्यासाठी नागरिक द्राक्षे, चिकू, टरबूज, खरबूज, संत्रा, मोसंबी अशा फळांचा आस्वाद घेत आहेत.

झाडांची सावली हवीहवीशी

उष्मा एवढा वाढला आहे की, झाडाची सावली आली आणि वाऱ्याची मंद जरी झुळूक आली तरी जिवाची घालमेल काहीशी कमी होत आहे. घशाला कोरड पडल्याने गारवा शोधण्यासाठी आईस्क्रीमसह थंड पेय पिण्यासाठी गर्दी वाढली आहे. डोक्यावर टोपी, हॅट, रुमाल याशिवाय उन्हात फिरणे अवघड झाले असून अंग भाजून काढणाऱ्या झळांमुळे घामाच्या धारा वाहत आहेत.