शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
ना पाकिस्तान, ना अफगानिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकानंच केला खुलासा
3
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
4
इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
6
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
7
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
8
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
9
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
10
लेकाला मांडीवरुन घेऊन कार्तिकीचा केला गाण्याचा सराव, शेअर केला क्युट व्हिडिओ
11
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
12
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
13
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
14
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
15
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
16
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
17
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
18
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
19
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
20
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?

संवादाची दरी बिघडवू शकते मानसिक स्वास्थ्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:37 IST

उस्मानाबाद : कोरोनामुळे अनेकजण घरात बसून आहेत. त्यामुळे संवादाचे प्रमाण कमी झाले आहे. संवादाची दरी वाढल्याने त्याचा परिणाम माणसाच्या ...

उस्मानाबाद : कोरोनामुळे अनेकजण घरात बसून आहेत. त्यामुळे संवादाचे प्रमाण कमी झाले आहे. संवादाची दरी वाढल्याने त्याचा परिणाम माणसाच्या मानसिक स्वास्थ्यावर होत आहे. यातून नैराश्य, चिडचिडेपणा, व्यसनाधीनता अशा समस्या वाढल्याचे समोर येत आहे. मानसिक स्वास्थ्यासाठी संवाद महत्त्वाचा असल्याचे मत मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केले.

एकमेकांशी संवाद साधून मन हलके होते. तसेच त्यातून आनंदही मिळत असतो. त्यामुळे जीवनात उत्साह राहत असतो. मात्र, मागील दीड वर्षापासून कोरोना संसर्गामुळे नागरिक घरातच बसून आहेत. घरातच बसून राहिल्याने संवाद कमी झाला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. त्यातच संवाद नसल्याने एकटेपणामुळे नैराश्य, स्मृतिभ्रंश, चिंता वाढली आहे. तरुण वर्गामध्ये संवादाअभावी डिप्रेशन वाढले आहे. शिवाय, एकटेपणा दूर करण्यासाठी व्यसनांच्या आहारी जात आहेत. सर्व व्यक्ती घरातच राहत असल्याने महिलांना घरातील काम वाढले आहे. त्यामुळे त्यांच्यामध्येही चिडचिडेपणा वाढत आहे. लहान मुलांचे वजन वाढले आहे. मोबाईलचा वापर वाढला आहे. त्यामुळे डोळ्यांच्या समस्या जाणवत आहेत.

मन हलके करणे हाच उपाय

कोरोना काळात अनेक जण घरात राहिले. त्यामुळे मैत्र-मैत्रिणी, नातेवाईक, समाजाशी संवाद कमी झाला. त्यामुळे नैराश्य वाढले.

संवाद साधण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. मोबाईलवरून संपर्क साधून संवाद साधला जात आहे. मात्र, समोरासमोर बोलल्याने जे मन हलक होते त्या प्रकारे मन हलके होत नाही.

मानसिक स्वास्थ्यासाठी एकमेकांशी संवाद साधणे महत्त्वाचे आहे. त्यातून मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यास मदत होते.

मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात...

संवाद हरवत चालल्याने ज्येष्ठांमध्ये स्मृतिभ्रंश आजार जडत आहे. त्यातून आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे एकटेपणात न राहता एकमेकांशी संवाद साधणे महत्त्वाचे आहे. संवादातून आनंद मिळतो. त्यातून मन हलके होते.

डॉ. महेश कानडे, मानसोपचारतज्ज्ञ

एकटेपणात असलेल्या व्यक्ती जास्त विचार करतो. खूप दिवस संवादापासून दूर राहिल्यास व्यक्ती नैराश्यात जातो. नागरिकांनी सतत सक्रिय राहून नातेवाईक, मित्रांशी मन हलके करावे.

डॉ. राजेश नरवडे, मानसोपचारतज्ज्ञ