शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वाहता झाला ‘नर-मादी’, पर्यटकांना भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:37 IST

सन १३५१ ते १४८० दरम्यान बहमनी राजाच्या काळात हा किल्ला बांधला गेला. अनेक आक्रमणे, रक्तरंजित क्रांती, तलवारीचा खणखणाट, तोफांचा ...

सन १३५१ ते १४८० दरम्यान बहमनी राजाच्या काळात हा किल्ला बांधला गेला. अनेक आक्रमणे, रक्तरंजित क्रांती, तलवारीचा खणखणाट, तोफांचा कर्णभेदी आवाज व विरांचे साहस या किल्ल्याने अनुभवल्या आहेत. हा किल्ला भौगोलिकदृष्ट्या निसर्गाच्या सान्निध्यात व डोंगरमाथ्यावर असला तरी शत्रूला तो सहजासहजी सर करता येत नाही. मात्र, किल्ल्यातून परिसरातील दोन किलोमीटर अंतरावरील शत्रू सहज टिपता येतो. याकरिता किल्ल्यात टेहळणी करण्यासाठी १५० फूट उंचीचे उपली बुरूज बांधलेले असून, या बुरुजावरून ३६० अंशामध्ये शत्रूवर तोफांचा मारा करता येईल अशी रचना केलेली आहे. या किल्ल्याच्या तटभिंती दुहेरी असून, रुंद व उंच आहेत. तटभिंतीची एकंदरीत लांबी जवळपास तीन किलोमीटर असून त्यावर ११४ बुरूज बांधलेले आहेत. शिवाय पसरट व खोल असे जलयुक्त खंदक तयार केलेले आहेत. बहमनीच्या अस्तानंतर १४८१ मध्ये हा किल्ला आदिलशाहीच्या अधिपत्याखाली आला. किल्ल्याच्या बाजूच्या पठारावर रणमंडळ असून या ठिकाणी सैनिकांना युद्ध प्रशिक्षण दिले जात होते. किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे रणमंडळ आणि पाणीमहल होय. १५५८ मध्ये द्वितीय अली आदिलशहाच्या काळात मीर इमादीन या वास्तूतज्ज्ञाने पाणी महाल बांधून प्राचीन स्थापत्य अभियांत्रिकी कलेचे उत्तम दर्शन घडविले आहे. येथील धबधबाही आता पावसामुळे प्रवाही झाला असून, पर्यटकांचा ओघ चांगलाच वाढू लागला आहे.

अशी आहे धबधब्याची रचना...

रणमंडळ व किल्ला यामध्ये असलेल्या खंदकाची खोली वाढवून त्यात बोरी नदीचा प्रवाह सोडला आहे. खंदकात बारामाही पाणी साठून राहावे याकरिता एक बंधारा बांधलेला आहे. यालाच पाणीमहल बंधारा म्हणतात. या बंधाऱ्याची उंची व रुंदी जवळपास २० मीटरपेक्षा जास्त आहे. बंधाऱ्याच्या पोटात थंड हवेचे पाणीमहाल बांधले असून, येण्या-जाण्यासाठी पायऱ्याचा मार्ग बनवलेला आहे. या बंधाऱ्यावर खंदकात साठलेले जास्तीचे पाणी बाहेर सोडण्यासाठी दोन सांडवे सोडण्यात आले आहेत. या सांडव्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या विसर्गालाच नर-मादी धबधबा असे संबोधले जाते. जेव्हा खंदकातील पाणी वाढते, बोरी नदीला पूर येतो, तेव्हा नर-मादी धबधब्यातून जवळपास ८० फूट उंचीवरून पाणी खाली दरीत कोसळते. हे विलोभनीय दृश्य नयनी साठविण्यासाठी पर्यटक दूरदूरवरून येऊ लागले आहेत.