शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
3
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
4
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
5
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
7
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
8
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
9
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
10
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
11
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
12
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
13
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
15
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
17
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
18
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
19
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
20
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?

वाहता झाला ‘नर-मादी’, पर्यटकांना भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:37 IST

सन १३५१ ते १४८० दरम्यान बहमनी राजाच्या काळात हा किल्ला बांधला गेला. अनेक आक्रमणे, रक्तरंजित क्रांती, तलवारीचा खणखणाट, तोफांचा ...

सन १३५१ ते १४८० दरम्यान बहमनी राजाच्या काळात हा किल्ला बांधला गेला. अनेक आक्रमणे, रक्तरंजित क्रांती, तलवारीचा खणखणाट, तोफांचा कर्णभेदी आवाज व विरांचे साहस या किल्ल्याने अनुभवल्या आहेत. हा किल्ला भौगोलिकदृष्ट्या निसर्गाच्या सान्निध्यात व डोंगरमाथ्यावर असला तरी शत्रूला तो सहजासहजी सर करता येत नाही. मात्र, किल्ल्यातून परिसरातील दोन किलोमीटर अंतरावरील शत्रू सहज टिपता येतो. याकरिता किल्ल्यात टेहळणी करण्यासाठी १५० फूट उंचीचे उपली बुरूज बांधलेले असून, या बुरुजावरून ३६० अंशामध्ये शत्रूवर तोफांचा मारा करता येईल अशी रचना केलेली आहे. या किल्ल्याच्या तटभिंती दुहेरी असून, रुंद व उंच आहेत. तटभिंतीची एकंदरीत लांबी जवळपास तीन किलोमीटर असून त्यावर ११४ बुरूज बांधलेले आहेत. शिवाय पसरट व खोल असे जलयुक्त खंदक तयार केलेले आहेत. बहमनीच्या अस्तानंतर १४८१ मध्ये हा किल्ला आदिलशाहीच्या अधिपत्याखाली आला. किल्ल्याच्या बाजूच्या पठारावर रणमंडळ असून या ठिकाणी सैनिकांना युद्ध प्रशिक्षण दिले जात होते. किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे रणमंडळ आणि पाणीमहल होय. १५५८ मध्ये द्वितीय अली आदिलशहाच्या काळात मीर इमादीन या वास्तूतज्ज्ञाने पाणी महाल बांधून प्राचीन स्थापत्य अभियांत्रिकी कलेचे उत्तम दर्शन घडविले आहे. येथील धबधबाही आता पावसामुळे प्रवाही झाला असून, पर्यटकांचा ओघ चांगलाच वाढू लागला आहे.

अशी आहे धबधब्याची रचना...

रणमंडळ व किल्ला यामध्ये असलेल्या खंदकाची खोली वाढवून त्यात बोरी नदीचा प्रवाह सोडला आहे. खंदकात बारामाही पाणी साठून राहावे याकरिता एक बंधारा बांधलेला आहे. यालाच पाणीमहल बंधारा म्हणतात. या बंधाऱ्याची उंची व रुंदी जवळपास २० मीटरपेक्षा जास्त आहे. बंधाऱ्याच्या पोटात थंड हवेचे पाणीमहाल बांधले असून, येण्या-जाण्यासाठी पायऱ्याचा मार्ग बनवलेला आहे. या बंधाऱ्यावर खंदकात साठलेले जास्तीचे पाणी बाहेर सोडण्यासाठी दोन सांडवे सोडण्यात आले आहेत. या सांडव्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या विसर्गालाच नर-मादी धबधबा असे संबोधले जाते. जेव्हा खंदकातील पाणी वाढते, बोरी नदीला पूर येतो, तेव्हा नर-मादी धबधब्यातून जवळपास ८० फूट उंचीवरून पाणी खाली दरीत कोसळते. हे विलोभनीय दृश्य नयनी साठविण्यासाठी पर्यटक दूरदूरवरून येऊ लागले आहेत.