शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात महाबीज सोयाबीन बियाणाचा तुटवडा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:24 IST

उस्मानाबाद : मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढत आहे. यंदाही सुमारे पावणेचार लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होईल ...

उस्मानाबाद : मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढत आहे. यंदाही सुमारे पावणेचार लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होईल असे, गृहीत धरून कृषी विभागाने बियाणांची मागणी केली होती. त्यानुसार जिल्ह्यासाठी सुमारे १८ हजार क्विंटल महाबीज सोयाबीन बियाणे मंजूर झाले होते. यापैकी आजवर उपलब्ध झालेले साडेबारा हजार क्विंटल बियाणे शेतकऱ्यांनी खरेदी केले आहे. परिणामी, सध्या बाजरपेठेत हे बियाणे मिळणे कठीण झाले आहे.

नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या सोयाबीन पिकाकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळेच मागील एक वर्षापासून सोयाबीन पिकाखालील क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. मागील वर्षी सुमारे पावणेचार लाख हेक्टर क्षेत्र सोयाबीन पिकाखाली आले होते. सोयाबीनला मिळालेल्या चांगल्या दरामुळे यंदा शेतकऱ्यांचा सोयाबीन पिकाकडे कल अधिक वाढला आहे. त्यानुसार कृषी विभागाने बियाणांचे नियोजन करू मागणी नोंदविली होती. असे असतानाच गत वर्षीच्या तुलनेत सोयाबीन बियाणे उत्पादक खाजगी कंपन्यांनी दरामध्ये मोठी वाढ केली आहे. मात्र, महबीजचे दर जवळपास कायम ठेवले आहेत. त्यामुळे खाजगी कंपन्या आणि महाबीजच्या दरात ८०० ते १,००० रुपयांची तफावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा महाबीज सोयाबीन बियाणाकडे कल वाढला आहे. आजवर महाबीजकडून जिल्ह्याला १८ हजार क्विंटलपैकी १२ हजार ५०० क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. हे बियाणे अवघ्या काही दिवसांतच शेतकऱ्यांनी खरेदी केले. त्यामुळे सध्या बाजारपेठेत या बियाणाचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, शेतकऱ्यांना खाजगी कंपन्यांचे तुलनेने महागडे बियाणे खरेदी करावे लागत आहे.

चौकट...

६,५०० क्विंटल बियाणाची प्रतीक्षा...

महाबीजकडे सुमारे १८ हजार क्विंटल बियांची मागणी केली होती. आजवर यापैकी साडेबारा हजार क्विंटल बियाणे दाखल झाले आहे. आणखी साडेसहा हजार क्विंटल बियाणे येणे बाकी आहे. हे बियाणे येणार कधी? असा प्रश्न शेतकरी विचारू लागले आहेत.

म्हणे, अडीच लाख क्विंटल घरगुती बियाणे...

यंदा वेळेवर आणि मुबलक पाऊस पडेल, असे भाकीत हवामान खात्याने केले आहे. त्यामुळे शेतकरी खरीप पेरणीसाठी लागणारे बियाणे, खताची जमवाजमव करू लागले आहेत. मात्र, बियाणांच्या काही वाणाचा सध्या तुटवडा आहे. असे असे तरी अनेक शेतकरी घरगुती बियाणे पेरणार आहेत, असे ‘कृषी’कडून सांगण्यात आले. असे सुमारे अडीच लाख क्विंटल बियाणे शेतकऱ्यांकडे असल्याचा दावाही अधिकारी करीत आहेत.

तर उडीद, मूग वाढेल!

जून महिना उजाडताच जिल्ह्याच्या काही भागांत चांगला पाऊस झाला आहे. काहींनी चाड्यावर मूठ धरली आहे. मात्र, अद्याप सर्वदूर पाऊस झालेला नाही. हा पाऊस वेळेवर पडल्यास उडीद, मूग या पिकांचा पेराही वाढू शकतो.