शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात महाबीज सोयाबीन बियाणाचा तुटवडा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:24 IST

उस्मानाबाद : मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढत आहे. यंदाही सुमारे पावणेचार लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होईल ...

उस्मानाबाद : मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढत आहे. यंदाही सुमारे पावणेचार लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होईल असे, गृहीत धरून कृषी विभागाने बियाणांची मागणी केली होती. त्यानुसार जिल्ह्यासाठी सुमारे १८ हजार क्विंटल महाबीज सोयाबीन बियाणे मंजूर झाले होते. यापैकी आजवर उपलब्ध झालेले साडेबारा हजार क्विंटल बियाणे शेतकऱ्यांनी खरेदी केले आहे. परिणामी, सध्या बाजरपेठेत हे बियाणे मिळणे कठीण झाले आहे.

नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या सोयाबीन पिकाकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळेच मागील एक वर्षापासून सोयाबीन पिकाखालील क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. मागील वर्षी सुमारे पावणेचार लाख हेक्टर क्षेत्र सोयाबीन पिकाखाली आले होते. सोयाबीनला मिळालेल्या चांगल्या दरामुळे यंदा शेतकऱ्यांचा सोयाबीन पिकाकडे कल अधिक वाढला आहे. त्यानुसार कृषी विभागाने बियाणांचे नियोजन करू मागणी नोंदविली होती. असे असतानाच गत वर्षीच्या तुलनेत सोयाबीन बियाणे उत्पादक खाजगी कंपन्यांनी दरामध्ये मोठी वाढ केली आहे. मात्र, महबीजचे दर जवळपास कायम ठेवले आहेत. त्यामुळे खाजगी कंपन्या आणि महाबीजच्या दरात ८०० ते १,००० रुपयांची तफावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा महाबीज सोयाबीन बियाणाकडे कल वाढला आहे. आजवर महाबीजकडून जिल्ह्याला १८ हजार क्विंटलपैकी १२ हजार ५०० क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. हे बियाणे अवघ्या काही दिवसांतच शेतकऱ्यांनी खरेदी केले. त्यामुळे सध्या बाजारपेठेत या बियाणाचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, शेतकऱ्यांना खाजगी कंपन्यांचे तुलनेने महागडे बियाणे खरेदी करावे लागत आहे.

चौकट...

६,५०० क्विंटल बियाणाची प्रतीक्षा...

महाबीजकडे सुमारे १८ हजार क्विंटल बियांची मागणी केली होती. आजवर यापैकी साडेबारा हजार क्विंटल बियाणे दाखल झाले आहे. आणखी साडेसहा हजार क्विंटल बियाणे येणे बाकी आहे. हे बियाणे येणार कधी? असा प्रश्न शेतकरी विचारू लागले आहेत.

म्हणे, अडीच लाख क्विंटल घरगुती बियाणे...

यंदा वेळेवर आणि मुबलक पाऊस पडेल, असे भाकीत हवामान खात्याने केले आहे. त्यामुळे शेतकरी खरीप पेरणीसाठी लागणारे बियाणे, खताची जमवाजमव करू लागले आहेत. मात्र, बियाणांच्या काही वाणाचा सध्या तुटवडा आहे. असे असे तरी अनेक शेतकरी घरगुती बियाणे पेरणार आहेत, असे ‘कृषी’कडून सांगण्यात आले. असे सुमारे अडीच लाख क्विंटल बियाणे शेतकऱ्यांकडे असल्याचा दावाही अधिकारी करीत आहेत.

तर उडीद, मूग वाढेल!

जून महिना उजाडताच जिल्ह्याच्या काही भागांत चांगला पाऊस झाला आहे. काहींनी चाड्यावर मूठ धरली आहे. मात्र, अद्याप सर्वदूर पाऊस झालेला नाही. हा पाऊस वेळेवर पडल्यास उडीद, मूग या पिकांचा पेराही वाढू शकतो.