शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

साडेपाच हजार शेतकऱ्यांच्या ५० हजारांच्या अनुदानाकडे नजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:20 IST

परंडा : नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनात्मक अनुदान जाहीर केले आहे. या याेजनेमध्ये एकट्या परंडा ...

परंडा : नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनात्मक अनुदान जाहीर केले आहे. या याेजनेमध्ये एकट्या परंडा तालुक्यातील सुमारे साडेपाच हजार शेतकरी पात्र ठरले. स्थानिक प्रशासनाकडून हा अहवाल शासनाला दिला. परंतु, अनेक महिन्यांचा कालावधी लाेटूनही अनुदानातील छदामही मिळालेला नाही. सरकारच्या या धाेरणाविरुद्ध आता पात्र शेतकऱ्यांतून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

महाविकास आघाडीच्या सरकारने सत्तेवर येताच महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. त्यानुसार सप्टेंबर २०१९ पर्यत थकीत असलेले दोन लाख रुपयांपर्यतचे कर्ज रक्कम माफ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र प्रामाणिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे नियमित कर्ज भरणे हा गुन्हा झाला का? अशी भावना या शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाखापर्यंत मदत सरकारने जाहीर करावी, या मागणीसाठी शेतकरी संघटना पुढे आल्या होत्या. मागणीने जाेर धरल्यानंतर सरकारने अशा शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान प्राेत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला हाेता. त्यानुसार तालुक्यातील सुमारे साडेपाच हजार शेतकरी अनुदानाच्या लाभासाठी पात्र ठरले हाेते. मात्र, थकबाकीदार शेतकऱ्यांचे सातबारे काेरे झाले तरी नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर मात्र पन्नास हजार रुपयांपर्यंतच्या अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांतून आता तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

चौकट.....

सहकारी संस्थेने घेतला ठराव...

परंडा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने आपल्या संस्थेच्या नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी सभासदांनी कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरले आहेत. हे पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी संस्थेचे चेअरमन अनिल शिंदे, संचालक मुजीब काझी यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. या अनुषंगाने ठराव घेऊन ताे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठविला आहे.

प्रतिक्रिया...

५० हजार अनुदान त्वरित मिळावे...

कोरोना पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करावे. त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी जादा रकमेची तरतूद करावी. मात्र सदरील पॅकेजमध्ये नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनुदानाची बाब समाविष्ट करून रक्कम थेट खात्यावर जमा करावी, अशी मागणी कपिलापुरी येथील शेतकरी बाळासाहेब पाटील यांनी केली आहे.

सर्वच बँकांना तो आदेश बंधनकारक…

जे शेतकरी तांत्रिक कारणाने कर्जमाफीपासून वंचित आहेत, त्यांचे कर्ज शासनाकडून येणे दाखवून त्या शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीककर्ज देणेबाबत शासनाने अध्यादेश काढला आहे. नॅशनलाईज व खासगी आशा सर्वच बँकांना तो आदेश बंधनकारक करावा, अशी मागणी भाजपाचे परंडा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील यांनी केली आहे.

काेट...

परंडा तालुक्यात नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या साडेपाच हजारांच्या घरात आहे. त्यांना प्राेत्साहनपर अनुदानाची रक्कम वेळेत मिळावी, यासाठी आमच्या कार्यालयाकडून शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे.

-एस. पी. जाधव, सहाय्यक निबंधक, परंडा