शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

जनजीवन विस्कळीत

By admin | Updated: May 30, 2014 00:26 IST

तामलवाडी : अवकाळी पाऊस वादळी वार्‍याच्या तडाख्याने हतबल झालेल्या तुळजापूर तालुक्यातील केमवाडी गावचे जनजीवन गुरुवारी विस्कळीत झालेले होते.

 तामलवाडी : अवकाळी पाऊस वादळी वार्‍याच्या तडाख्याने हतबल झालेल्या तुळजापूर तालुक्यातील केमवाडी गावचे जनजीवन गुरुवारी विस्कळीत झालेले होते. घरावरील पत्रे उडून घरात साचलेल्या पाण्यातच महिलांना स्वयंपाक करावा लागला. नैसर्गिक आपत्तीच्या सावटाखाली गावकरी वावरत होते. महसूल प्रशासनाने पंचनामे करण्यासाठी चार तलाठी कर्मचार्‍यांना केमवाडीत दाखल केले. दिवसभर पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु होते. बुधवारी दुपारी ३ वाजता वादळी वार्‍याने केमवाडी येथे थैमान घातले. गारांच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ५० घरावरील पत्रे उडाल्याने घरात आडोसा नव्हता. चिखलात चूल पेटवून स्वयंपाक करावा लागला. तर घरासमोरील उन्मळून पडलेली झाडे हटविण्याचे काम चालू होते. विजेचे खांब पडल्याने गेल्या ३० तासांपासून गावचा वीज पुरवठा खंडित झाला असून, पाणीपुरवठाही बंद पडला आहे. वादळात उडालेले पत्रे सापडत नसल्याने घर कसे झाकावे या विचारात संतोष शिंदे कुटुंबिय होते. वादळी पावसात विश्वनाथ शिंदे (वय ६५) हे गंभीर जखमी झाले होते. उभ्या आयुष्यात असले वादळी वारे पाहिले नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हा परिषद शाळेवरील पत्रेही वार्‍याने उडून गेले आहेत. गुरुवारी सकाळी नायब तहसीलदार बी.यु. वाघे, महावितरणचे अधीक्षक अभियंता यांनी केमवाडीस भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. तर तलाठी चंद्रकांत कसाब, टी. के. रुपनवार, ए. जी. भातभागे, बी.ए. माचने यांनी केमवाडीतील पंचनामे करण्यासाठी पाचाराण करण्यात आले होते. हे काम युद्ध पातळीवर सुरु होते. मात्र गावकर्‍यांची भिती स्पष्टपणे जाणवत होती. निवार्‍याअभावी बेघर झालेल्या कुटुंबांना आसरा द्यावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर) वादळी तडाख्याने पाच गावांना फटका फेब्रुवारी महिन्यापासून अवकाळी पावसाचा फटका आजवर पिंपळा (खुर्द), वडगाव (काटी), आरळी (बु), भातंब्री, जळकोटवाडी, केमवाडी, गवळेवाडी गावाला बसला आहे. या पिकांचे तसेच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विजेचे खांब, ट्रान्सफार्मर कोसळले आहेत. फळबागाही भुईसपाट झाल्या आहेत. या नैसर्गिक संकटातून सावरताना शेतकरी, बेघर कुटुंबांना कसरत करावी लागत आहे.