शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

पाठ्यपुस्तकांविना गिरवावे लागताहेत विद्यार्थ्यांना धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:22 IST

उमरगा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली आहे. पहिली ते नववीचे वर्ग ऑनलाइन घेण्याचे निर्देश शासनाने दिले ...

उमरगा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली आहे. पहिली ते नववीचे वर्ग ऑनलाइन घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सध्या पुस्तकांशिवाय अभ्यास करावा लागत आहे. गतवर्षी संपूर्ण शैक्षणिक वर्ष व्यवस्थित झालेले नाही. त्यामुळे राज्याच्या सेतू अभ्यासक्रम निर्मितीतून गेल्या वर्षीचा अभ्यासक्रम ४५ दिवसांत पूर्ण करण्यासाठी अभ्यासक्रम देण्यात आला आहे. तालुक्यातील तीन शिक्षकांनी सेतू अभ्यासक्रम तयार करण्याच्या कामात सहभाग घेतला आहे. तालुक्यातील सर्व शाळेतून सध्या सेतू कृती पत्रिका विद्यार्थ्यांकडून सोडवून घेण्याचे काम ऑनलाईन सुरू आहे.

बालभारतीद्वारे दरवर्षी पाहिली ते आठवी वर्गातील मुलांना मोफत पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. यावर्षी नवीन पुस्तकांची छपाई कोरोना संसर्गामुळे अजून झाली नाही. पुस्तके उशिराने मिळणार आहेत. लहान मुलांना नवीन पुस्तकांचे कौतुक असते. यावर्षी ती मिळाली नाहीत. शिक्षकांनी ऑनलाइन शिकविण्यास सुरुवात केली तरी जवळ पुस्तक नसल्याने ते काय शिकतील, हा प्रश्न आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे मोबाईलची सोय नाही. शिवाय ज्यांच्याकडे सोय आहे, त्यांच्याकडे वारंवार डेटा रिचार्ज करण्यासाठी पैसे नाहीत. तसेच नेटवर्कचीही समस्या आहे. गेल्या वर्षीपासून हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. कोरोना पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना अध्यापन करताना मागील वर्षभरातील इयत्तेच्या अभ्यासक्रमाची उजळणी होण्यासाठी राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने सेतू अभ्यासक्रमाची निर्मिती केली आहे. अभ्यासक्रम इयत्ता दुसरी ते दहावी या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी असून, ४५ दिवसात उजळणी अभ्यासक्रम पूर्ण करावयाचा आहे. १ जुलै पासून या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. या दरम्यान तीन चाचण्याही होणार आहेत. ब्रिज कोर्स अर्थात सेतू अभ्यासक्रम म्हणजेच गेल्या वर्षात विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेले ज्ञान, कौशल्य आणि या शैक्षणिक वर्षात साध्य करावयाचे ज्ञान, कौशल्य यातील मध्य म्हणजे सेतू आहे. या सेतू अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यासाठी राज्यातील शिक्षणतज्ज्ञ, प्रशासकीय अधिकारी आणि शिक्षकांचा सहभाग आहे. संपूर्ण राज्यातील या ब्रिज कोर्स विद्यार्थ्यांसाठी निर्माण करण्यात आलेल्या अभ्यासक्रमात आठवीच्या इंग्रजी या विषयाच्या सेतू अभ्यासक्रमाच्या निर्मितीत उमरगा तालुक्यातील शिक्षक डॉ. गजेंद्र मुगळे, सरिता उपासे, मनोज बदिमे या शिक्षकांचा सहभाग आहे. तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील यशात या सेतू अभ्यासक्रमाच्या निर्मितीत असलेल्या या शिक्षकांचा सहभाग शैक्षणिक क्षेत्राची उंची वाढविणारा आहे.

काेट...

शिक्षण विभागाच्या वतीने कोविड काळातील शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ब्रिज कोर्स अर्थात सेतू उपक्रम निर्माण केला आहे. सदर कार्यक्रम १ जुलैपासून सुरू झाला असून कालमर्यादेत पूर्ण करायचा आहे. एकूण ४५ दिवसाच्या या उपक्रमात दर १५ दिवसाने एक अशा ३ चाचण्या घेणे आवश्यक आहे. शासनाने हा उपक्रम इयत्ता व विषय निहाय पीडीएफ रुपात उपलब्ध केला आहे. छापील रुपात दिला नसल्याने सध्या शिक्षक व मुख्याध्यापक त्याचा आर्थिक भार उचलत आहेत.मात्र हा उपक्रम यशस्वीपणे सर्व शाळांवर राबवला जात आहे.या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना खूप चांगला फायदा होत असल्याचे चित्र आहे.

- शिवकुमार बिराजदार, गटशिक्षणाधिकारी, उमरगा