शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

असमताेल पावसामुळे लाखाे हेक्टरवरील खरीप पिके धाेक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:39 IST

उस्मानाबाद - जिल्ह्यात आजवर २ लाख १० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे. परंतु, पिके वाढीच्या अवस्थेत असतानाच ...

उस्मानाबाद - जिल्ह्यात आजवर २ लाख १० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे. परंतु, पिके वाढीच्या अवस्थेत असतानाच पावसाने डाेळे वटारले. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. एवढेच नाही, तर माळरानावरील काेवळ्या पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. मागील आठ-दहा दिवसानंतर साेमवारी जिल्ह्याच्या काही भागात पावसाच्या सरी काेसळल्या. या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले आहे; मात्र पिकांच्या जाेमदार वाढीसाठी सर्वदूर दमदार पावसाची गरज शेतकऱ्यांतून व्यक्त केली जाऊ लागली आहे.

जून महिना उजाडताच जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. काही भागात पेरणीयाेग्य पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी चाड्यावर मूठ धरली. यानंतर अधून-मधून झालेल्या पावसामुळे खरीप पिकांची बऱ्याकी वाढ झाली. असे असतानाच मागील आठ-दहा दिवसांपासून वरूणराजाने डाेळे वटारले. परिणामी सुमारे २ लाख १० हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिके अडचणीत आली आहेत. माळरानावरील उडीद, मूग यासारखी पिके माना टाकू लागली आहेत. दरम्यान, साेमवारी दुपारी व सायंकाळच्यासुमारास जिल्ह्याच्या काही भागात पावसाच्या सरी काेसळल्या. मात्र, हा पाऊस सर्वदूर झालेला नाही. त्यामुळे खरीप पिके जाेमदार येण्यासाठी माेठ्या व सर्वदूर पावसाची गरज शेतकरी व्यक्त करू लागले आहेत. येत्या दाेन-तीन दिवसांत पाऊस न झाल्यास पिकांना माेठा फटका बसेल, वेळप्रसंगी दुबार पेरणी करावी लागेल, असे शेतकरी सांगताहेत.

चाैकट...

साेयाबीनचा पेरा अधिक...

जिल्ह्यात साेयाबीनचे २ लाख ४६ हजार हेक्टर एवढे सर्वसाधारण क्षेत्र आहे. गतवर्षी साेयाबीनला मिळालेल्या उच्चांकी भावामुळे यंदाही बहुतांश शेतकऱ्यांनी साेयाबीनवरच भर दिला आहे. कृषी विभागाच्या अंतिम पेरणी अहवालानुसार २ लाख ९ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर साेयाबीन पेरणी झाली आहे. इतर पिकांच्या तुलनेत साेयाबीन पिकाखालील क्षेत्र काही पटीने अधिक आहे.

...तर दुबार पेरणीचे संकट

यंदा वेळेवर पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे साेयाबीन उत्पादक अनेक शेतकरी उडीद, मूग यासारख्या नगदी पिकांकडे वळले. ही पिके वाढीच्या अवस्थेत असतानाच पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे खासकरून हलक्या प्रतीच्या जमिनीवरील पिके काेमेजून चालली आहेत. आणखी तीन-चार दिवस पावसाची कृपा न झाल्यास माळरानावरील पिके पूर्णपणे वाया जातील, अशी भीती शेतकऱ्यांना आहे. दुर्दैवाने असे झाल्यास दुबार पेरणीची नामुष्की अगाेदरच अडचणीत असलेल्या बळीराजावर येऊ शकते.

देव अशी परीक्षा दरवर्षी घेताे

१. यंदा वेळेवर पाऊस झाल्यामुळे साेयाबीनला बगल देऊन जवळपास पाच एकरावर उडीद पीक घेतले. अधुनमधून पडलेल्या पावसामुळे हे पीकही जाेमदार आले. परंतु, मागील आठ-दहा दिवसांत पावसाने दडी मारल्याने सध्या ही पिके काेमेजून चालली आहेत. त्यामुळे सध्या या पिकांसाठी माेठ्या पावसाची गरज आहे. अन्यथा पिके वाया गेली असती.

- बळीराम साेन्ने, शेतकरी.

२. खरीप पेरणीसाठीसाठी सुमारे २५ ते ३० हजार रुपये खर्च करून बी-बियाणे, खत खरेदी केले. ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी केली. साेयाबीन, मुगाचे पीकही जाेमदार आले. परंतु, मागील काही दिवसांपासून पाऊस झालेला नाही. त्यामुळे मुगाचे पीक काेमेजले आहे. येत्या चार-पाच दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास पिकांचे माेठे नुकसान हाेईल.

- संताेष कदम, शेतकरी.

काेट...

जिल्ह्यात आजवर एकूण १३५ मिमी पाऊस झाला आहे. या पावसावर शेतकऱ्यांनी खरीप पेरणी उरकली. पिकेही जाेमदार आली. परंतु, मागील काही दिवसांत पाऊस झालेला नाही. त्यामुळे माळरानावरील पिके माना टाकू लागली आहेत. अशा पिकांसाठी सध्या माेठ्या पावसाची गरज आहे.

-डाॅ. टी. जी. चिमनशेट्टे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद.