शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
3
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
6
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
7
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
8
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
9
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
10
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
11
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
12
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
13
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
14
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
15
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
16
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
17
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
18
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
19
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
20
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा

दर वाढवूनही मजूर टंचाई कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:24 IST

पाथरुड : यंदा झालेल्या समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामापाठोपाठ रब्बीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. परंतु, सततच्या हवामान बदलामुळे ...

पाथरुड : यंदा झालेल्या समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामापाठोपाठ रब्बीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. परंतु, सततच्या हवामान बदलामुळे या हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा या पिकांवर मोठ्या प्रमाणावर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. मात्र, पिकांवर फवारणी करण्यासह इतर कामांसाठी भूम तालुक्यातील पाथरुड परिसरात मजुरांची टंचाई जाणवत आहे.

सध्या एकीकडे तुरीची काढणी सुरु असून, दुसरीकडे रोगराईला अटकाव करण्यासाठी गहू, ज्वारी, हरभरा या पिकांना पाणी देण्यासह फवारणी करण्याचे काम वाढले आहे. यासाठी मजुरांची गरज आहे. अनेक मजूर ऊस तोडणीच्या कामासाठी बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आता नाईलाजाने अनेक कामे यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून केली जात आहेत.

चौकट.....

कृषी यंत्रानी घेतली मजुरांची जागा

शेतीच्या कामासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱी शेती कामांसाठी नवनवीन यंत्रे घेत आहेत. याद्वारे नांगरणी करणे, पाळी घालणे, तूर काढणी, पेरणी करणे, फवारणी करणे ही कामे होत आहेत. यातून वेळ वाचत असला, तरी यासाठी शेतकऱ्यांना अधिकचा खर्च करावा लागत आहे.

तीन वर्षांत दुप्पट वाढ

तीन वर्षांपूर्वी शेतीकामासाठी पुरुषांची मजुरी अडीचशे रुपये तर महिलांची मजुरी १५० रुपये प्रतिदिवस अशी होती. परंतु, यंदा पुरूषांना चारशे रुपये तर महिलांना अडीचशे रुपये मजुरी द्यावी लागत आहे.

प्रतिक्रिया........

मजुरीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होऊनही वेळेवर मजूर मिळत नाहीत. त्यामुळे फवारणी, खत घालणे, खुरपणी अशी मशागतीची कामे वेळेवर होत नाहीत.

- विलास गावडे, शेतकरी, पाथरुड.