शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
3
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
4
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
5
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
6
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
7
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
8
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
9
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
10
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
11
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
12
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
13
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
14
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
15
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
16
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
17
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
18
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
19
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
20
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा

काटी, जेवळी जिल्ह्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:00 IST

उस्मानाबाद : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत देण्यात येणाऱ्या आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कारांचे वितरण येथे जिल्हाधिकारी कौस्तुभ ...

उस्मानाबाद : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत देण्यात येणाऱ्या आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कारांचे वितरण येथे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका स्तरावर सर्वाधिक व समान गुण प्राप्त केलेल्या काटी व उत्तर जेवळी या गावांना जिल्हा स्तरावरील आदर्श सुंदर गाव पुरस्कार विभागून देण्यात आला. तसेच तालुक्यातील प्रत्येकी एका गावास या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्तात्रय साळुंके, महिला व बालकल्याण सभापती रत्नमाला टेकाळे यांची उपस्थिती होती. यावेळी तालुका स्तरावर गोपाळवाडी (उस्मानाबाद, काटी (तुळजापूर), उत्तर जेवळी (लोहारा), तुरोरी (उमरगा), हासेगाव (शि) (कळंब), बागलवाडी (भूम), पारा (वाशी) आणि जवळा (नि) (परंडा) या ग्रामपंचायतींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अनंत कुंभार, सूत्रसंचालन हणमंत गादगे यांनी केले. ऋषिकेश कुलकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य शोभा तोरकडे, राजकुमार पाटील, पंचायत समिती सदस्य रामहरी थोरबोले, जिल्हा परिषद विभाग प्रमुख, गटविकास अधिकारी, विस्ताराधिकारी, पुरस्कारप्राप्त गावांचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.

चौकट.......

निधीचा योग्य विनियोग करा

यावेळी बोलताना अध्यक्षा अस्मिता कांबळे म्हणाल्या, या सर्व गावांत ग्रामस्थांचा सहभाग असल्यानेच हे यश मिळाले आहे. या गावांनी पुरस्कारातून मिळणाऱ्या निधीचा विनियोग योग्य पध्दतीने करावा.

विकासासाठी प्रयत्न करा

यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, प्रत्येक गोष्ट योजनेत पहायची नसते. आपण ज्या गावात राहतो, ते गाव स्वच्छ, सुंदर व समृध्द झाले पाहिजे. गावच्या समस्या सोडविण्यासाठी व विकास साधण्यासाठी हेवेदावे सोडून काम करावे.

सर्व गावांनी सहभागी व्हावे

लोकसहभागातून उपलब्ध नैसर्गिक साधनांचा विकास करून पर्यावरणाचा समतोल राखावा व त्यातून आपले गाव सुंदर व समृद्ध निर्माण करावे. या पुरस्कारप्राप्त गावांनी चांगले काम केले असून, जिल्ह्यातील सर्व गावांनी या योजनेत सहभागी होऊन गाव सुंदर करावे, असे आवाहन डॉ. विजयकुमार फड यांनी यावेळी केले.