शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

काटी, जेवळी जिल्ह्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:00 IST

उस्मानाबाद : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत देण्यात येणाऱ्या आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कारांचे वितरण येथे जिल्हाधिकारी कौस्तुभ ...

उस्मानाबाद : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत देण्यात येणाऱ्या आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कारांचे वितरण येथे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका स्तरावर सर्वाधिक व समान गुण प्राप्त केलेल्या काटी व उत्तर जेवळी या गावांना जिल्हा स्तरावरील आदर्श सुंदर गाव पुरस्कार विभागून देण्यात आला. तसेच तालुक्यातील प्रत्येकी एका गावास या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्तात्रय साळुंके, महिला व बालकल्याण सभापती रत्नमाला टेकाळे यांची उपस्थिती होती. यावेळी तालुका स्तरावर गोपाळवाडी (उस्मानाबाद, काटी (तुळजापूर), उत्तर जेवळी (लोहारा), तुरोरी (उमरगा), हासेगाव (शि) (कळंब), बागलवाडी (भूम), पारा (वाशी) आणि जवळा (नि) (परंडा) या ग्रामपंचायतींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अनंत कुंभार, सूत्रसंचालन हणमंत गादगे यांनी केले. ऋषिकेश कुलकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य शोभा तोरकडे, राजकुमार पाटील, पंचायत समिती सदस्य रामहरी थोरबोले, जिल्हा परिषद विभाग प्रमुख, गटविकास अधिकारी, विस्ताराधिकारी, पुरस्कारप्राप्त गावांचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.

चौकट.......

निधीचा योग्य विनियोग करा

यावेळी बोलताना अध्यक्षा अस्मिता कांबळे म्हणाल्या, या सर्व गावांत ग्रामस्थांचा सहभाग असल्यानेच हे यश मिळाले आहे. या गावांनी पुरस्कारातून मिळणाऱ्या निधीचा विनियोग योग्य पध्दतीने करावा.

विकासासाठी प्रयत्न करा

यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, प्रत्येक गोष्ट योजनेत पहायची नसते. आपण ज्या गावात राहतो, ते गाव स्वच्छ, सुंदर व समृध्द झाले पाहिजे. गावच्या समस्या सोडविण्यासाठी व विकास साधण्यासाठी हेवेदावे सोडून काम करावे.

सर्व गावांनी सहभागी व्हावे

लोकसहभागातून उपलब्ध नैसर्गिक साधनांचा विकास करून पर्यावरणाचा समतोल राखावा व त्यातून आपले गाव सुंदर व समृद्ध निर्माण करावे. या पुरस्कारप्राप्त गावांनी चांगले काम केले असून, जिल्ह्यातील सर्व गावांनी या योजनेत सहभागी होऊन गाव सुंदर करावे, असे आवाहन डॉ. विजयकुमार फड यांनी यावेळी केले.