शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

काटी, जेवळी जिल्ह्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:00 IST

उस्मानाबाद : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत देण्यात येणाऱ्या आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कारांचे वितरण येथे जिल्हाधिकारी कौस्तुभ ...

उस्मानाबाद : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत देण्यात येणाऱ्या आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कारांचे वितरण येथे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका स्तरावर सर्वाधिक व समान गुण प्राप्त केलेल्या काटी व उत्तर जेवळी या गावांना जिल्हा स्तरावरील आदर्श सुंदर गाव पुरस्कार विभागून देण्यात आला. तसेच तालुक्यातील प्रत्येकी एका गावास या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्तात्रय साळुंके, महिला व बालकल्याण सभापती रत्नमाला टेकाळे यांची उपस्थिती होती. यावेळी तालुका स्तरावर गोपाळवाडी (उस्मानाबाद, काटी (तुळजापूर), उत्तर जेवळी (लोहारा), तुरोरी (उमरगा), हासेगाव (शि) (कळंब), बागलवाडी (भूम), पारा (वाशी) आणि जवळा (नि) (परंडा) या ग्रामपंचायतींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अनंत कुंभार, सूत्रसंचालन हणमंत गादगे यांनी केले. ऋषिकेश कुलकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य शोभा तोरकडे, राजकुमार पाटील, पंचायत समिती सदस्य रामहरी थोरबोले, जिल्हा परिषद विभाग प्रमुख, गटविकास अधिकारी, विस्ताराधिकारी, पुरस्कारप्राप्त गावांचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.

चौकट.......

निधीचा योग्य विनियोग करा

यावेळी बोलताना अध्यक्षा अस्मिता कांबळे म्हणाल्या, या सर्व गावांत ग्रामस्थांचा सहभाग असल्यानेच हे यश मिळाले आहे. या गावांनी पुरस्कारातून मिळणाऱ्या निधीचा विनियोग योग्य पध्दतीने करावा.

विकासासाठी प्रयत्न करा

यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, प्रत्येक गोष्ट योजनेत पहायची नसते. आपण ज्या गावात राहतो, ते गाव स्वच्छ, सुंदर व समृध्द झाले पाहिजे. गावच्या समस्या सोडविण्यासाठी व विकास साधण्यासाठी हेवेदावे सोडून काम करावे.

सर्व गावांनी सहभागी व्हावे

लोकसहभागातून उपलब्ध नैसर्गिक साधनांचा विकास करून पर्यावरणाचा समतोल राखावा व त्यातून आपले गाव सुंदर व समृद्ध निर्माण करावे. या पुरस्कारप्राप्त गावांनी चांगले काम केले असून, जिल्ह्यातील सर्व गावांनी या योजनेत सहभागी होऊन गाव सुंदर करावे, असे आवाहन डॉ. विजयकुमार फड यांनी यावेळी केले.