शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

तो पुन्हा बरसला धो-धो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:39 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची दमदार बॅटिंग सुरु आहे. पावसाळ्यातील एकूण सरासरीच्या सुमारे १४ टक्के पाऊस हा ...

उस्मानाबाद : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची दमदार बॅटिंग सुरु आहे. पावसाळ्यातील एकूण सरासरीच्या सुमारे १४ टक्के पाऊस हा या दोन दिवसांतच कोसळला आहे. यामुळे प्रकल्पातील पाणीपातळी वाढण्यास मदत झाली असली तरी खरीप पिकांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ३७.७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. शनिवारी रात्री भूम-परंडा तालुक्यात अतिवृष्टी झाल्यानंतर रविवारी रात्री उमरगा तालुक्यात वरुणराजा धो-धो बरसला. सोबतच पुन्हा भूम, परंडा व वाशी तालुक्यात दुसऱ्या दिवशीही दमदार हजेरी लावली. या तिन्ही तालुक्यात ४० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तर उमरगा तालुक्यातील चार मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. उस्मानाबाद व कळंब तालुक्यात तुलनेने सर्वात कमी पाऊस झाला आहे. उस्मानाबादला २३ मिलीमीटर तर कळंब तालुक्यात १७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तुळजापूर तालुक्यात ३६, लोहारा ३० मिमी पाऊस झाला आहे. उमरगा तालुक्यात सर्वाधिक ७२ मिमी पावसाची नोंद आहे. भूमला ४५, परंडा ४१ तर वाशी तालुक्यात ५४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात सोमवारी ३७ मिमी पावसाची नोंद झाली. तर जूनपासून आजपर्यंत ५८८.७० मिमी पाऊस झाला आहे.

९७ टक्के झाला पाऊस...

जिल्ह्यात पावसाळ्यात पडणारा सरासरी पाऊस ६०३ मिमी इतका आहे. त्या तुलनेत आतापर्यंत ५८८ मिमी पाऊस झाला आहे. याची टक्केवारी ९७.६१ इतकी भरते. दरम्यान, यातील १४ टक्के पाऊस हा मागील दोन दिवसांतच झाला आहे. शनिवारी रात्रीतून ८ टक्के पाऊस झाला. तर सोमवारी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची नोंद ही ६ टक्के इतकी आहे.

थोडी खुशी, थोडा गम...

गेल्या दोन दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे भूम, परंडा, वाशी, तुळजापूर व उमरगा तालुक्यातील बहुतांश प्रकल्पात चांगला जलसाठा झाला आहे. अनेक प्रकल्प ओव्हरफ्लोही झाले आहेत. आणखीही पाण्याची आवक या प्रकल्पात सुरुच आहे. उर्वरित तालुक्यातील प्रकल्पांना अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, एकीकडे प्रकल्प भरत असल्याने खुशी असली तरी खरीप हंगामाचे आधी पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे अन् आता अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे.

इथे झाली अतिवृष्टी...

जिल्ह्यातील ४ मंडळांमध्ये सोमवारी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यातील तीन उमरगा तालुक्यातील आहेत. वाशी तालुक्यातील पारगाव येथेही अतिवृष्टी झाली असून, ६७.७५ मिमी पावसाची नोंद झाली. उमरगा तालुक्यातील मुळज ८४, नारंगवाडी ७६ तर उमरगा मंडळात ९० मिमी पावसासह अतिवृष्टी नोंदली गेली.