शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
4
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
5
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
6
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
7
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
8
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
9
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
10
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
11
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
12
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
13
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
14
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
15
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
16
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
17
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
18
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
19
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
20
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...

आराेपींच्या मागणीला भाजपाने पाठिंबा द्यावा, हे अनाकलनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:22 IST

उस्मानाबाद - सध्या देशातील प्रमुख एजन्सीजचा भाजपाकडून गैरवापर केला जात आहे. हे सर्व सुरू असतानाच आता तर एखाद्या आराेपीने ...

उस्मानाबाद - सध्या देशातील प्रमुख एजन्सीजचा भाजपाकडून गैरवापर केला जात आहे. हे सर्व सुरू असतानाच आता तर एखाद्या आराेपीने केलेल्या मागणीला पाठिंबा दिला जात आहे. पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीत तसा ठराव घेतला जात आहे. आपण काेणाची बाजू घ्यावी, हेही भापजपाला समजत नसेल तर हे सगळं अनाकलनीय आहे, अशा शब्दात घणाघात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केला. उस्मानाबाद येथील विश्रामगृहात शुक्रवारी सकाळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते.

मंत्री पाटील म्हणाले, अनिल देशमुख यांच्यावर १०० काेटी रुपये वसुलीचा आराेप लावण्यात आला. मात्र, जाे व्यक्ती तुरुंगात आहे. तुरुंगातून जाऊन आला आहे. आणि जाण्याची शक्यता आहे. ज्याने गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत, असा ज्यांच्यावर थेट आराेप आहे. असे लाेक जे स्वत संकटात सापडल्यावर, एनआयएने ताब्यात घेतल्यावर किंवा चाैकशी सुरू झाल्यानंतर असे आराेप करीत सुटले आहेत. कुठल्यातरी दबावाला बळी पडून हे आराेप करण्यात आले. त्यांना असे आराेप करा म्हणून सांगण्यात आले आहे. या आराेपानंतर देशमुख यांची सीबीआय चाैकशी लावली. त्यातून काहीही हाती लागले नाही. त्यामुळे आता ईडीचा ससेमिरा मागे लावण्यात आला. आता छापे टाकण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. अशा स्वरूपाच्या कारवाईत आजवरच्या आर्थिक व्यवहारांची माहिती काढून जुन्या कुठल्या तरी प्रकरणात अडकवून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची भाजपाची ही जुनीच सवय आहे. जनतेलाही हे चांगले ठाऊक असल्याचा टाेलाही मंत्री पाटील यांनी लगावला.

राज्य सरकारमधील प्रत्येक विभागात वाझेसारखा एक अधिकारी असल्याचा आराेप विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. याबाबत त्यांना विचारले असता, कुठल्याही खात्यामध्ये भ्रष्टाचार हाेत असेल तर ताे बाहेर काढण्याचा त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. अशाप्रकारे त्यांनी बाेलून दाखविण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करावी, असे आव्हान मंत्री पाटील यांनी दिले. राज्य सरकार ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने आहे. हे आरक्षण उडाल्यामुळे राज्यभरातील ५५ हजार जागा गमावल्या आहेत. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी आमची भूमिका आहे. तसे पत्रही सरकारने दिले आहे. २०११-१२ मध्ये मी ग्रामविकासमंत्री असताना सामाजिक सर्वेक्षण करण्यात आले हाेते. हा अहवाल केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला हाेता. ताे अहवाल अधिकृतपणे जाहीर करायला हवा हाेता. केंद्र सरकारकडे हे सर्व आकडे असतानाही ते सुप्रीम काेर्टात दिले नाहीत. परिणामी सुप्रीम काेर्टाने ओबीसीचे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला, अशा शब्दात मंत्री पाटील यांनी भाजपावर पलटवार केला.