शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आराेपींच्या मागणीला भाजपाने पाठिंबा द्यावा, हे अनाकलनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:22 IST

उस्मानाबाद - सध्या देशातील प्रमुख एजन्सीजचा भाजपाकडून गैरवापर केला जात आहे. हे सर्व सुरू असतानाच आता तर एखाद्या आराेपीने ...

उस्मानाबाद - सध्या देशातील प्रमुख एजन्सीजचा भाजपाकडून गैरवापर केला जात आहे. हे सर्व सुरू असतानाच आता तर एखाद्या आराेपीने केलेल्या मागणीला पाठिंबा दिला जात आहे. पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीत तसा ठराव घेतला जात आहे. आपण काेणाची बाजू घ्यावी, हेही भापजपाला समजत नसेल तर हे सगळं अनाकलनीय आहे, अशा शब्दात घणाघात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केला. उस्मानाबाद येथील विश्रामगृहात शुक्रवारी सकाळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते.

मंत्री पाटील म्हणाले, अनिल देशमुख यांच्यावर १०० काेटी रुपये वसुलीचा आराेप लावण्यात आला. मात्र, जाे व्यक्ती तुरुंगात आहे. तुरुंगातून जाऊन आला आहे. आणि जाण्याची शक्यता आहे. ज्याने गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत, असा ज्यांच्यावर थेट आराेप आहे. असे लाेक जे स्वत संकटात सापडल्यावर, एनआयएने ताब्यात घेतल्यावर किंवा चाैकशी सुरू झाल्यानंतर असे आराेप करीत सुटले आहेत. कुठल्यातरी दबावाला बळी पडून हे आराेप करण्यात आले. त्यांना असे आराेप करा म्हणून सांगण्यात आले आहे. या आराेपानंतर देशमुख यांची सीबीआय चाैकशी लावली. त्यातून काहीही हाती लागले नाही. त्यामुळे आता ईडीचा ससेमिरा मागे लावण्यात आला. आता छापे टाकण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. अशा स्वरूपाच्या कारवाईत आजवरच्या आर्थिक व्यवहारांची माहिती काढून जुन्या कुठल्या तरी प्रकरणात अडकवून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची भाजपाची ही जुनीच सवय आहे. जनतेलाही हे चांगले ठाऊक असल्याचा टाेलाही मंत्री पाटील यांनी लगावला.

राज्य सरकारमधील प्रत्येक विभागात वाझेसारखा एक अधिकारी असल्याचा आराेप विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. याबाबत त्यांना विचारले असता, कुठल्याही खात्यामध्ये भ्रष्टाचार हाेत असेल तर ताे बाहेर काढण्याचा त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. अशाप्रकारे त्यांनी बाेलून दाखविण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करावी, असे आव्हान मंत्री पाटील यांनी दिले. राज्य सरकार ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने आहे. हे आरक्षण उडाल्यामुळे राज्यभरातील ५५ हजार जागा गमावल्या आहेत. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी आमची भूमिका आहे. तसे पत्रही सरकारने दिले आहे. २०११-१२ मध्ये मी ग्रामविकासमंत्री असताना सामाजिक सर्वेक्षण करण्यात आले हाेते. हा अहवाल केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला हाेता. ताे अहवाल अधिकृतपणे जाहीर करायला हवा हाेता. केंद्र सरकारकडे हे सर्व आकडे असतानाही ते सुप्रीम काेर्टात दिले नाहीत. परिणामी सुप्रीम काेर्टाने ओबीसीचे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला, अशा शब्दात मंत्री पाटील यांनी भाजपावर पलटवार केला.