शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

विमा कंपनी सरकारची जावई आहे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:34 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यात पावसाचा २२ दिवसांपेक्षा अधिकचा खंड पडल्यामुळे खरीप पिकाचे नुकसान झाले आहे. हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांच्या अपेक्षित ...

उस्मानाबाद : जिल्ह्यात पावसाचा २२ दिवसांपेक्षा अधिकचा खंड पडल्यामुळे खरीप पिकाचे नुकसान झाले आहे. हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नात ५० टक्केपेक्षा अधिक घट असेल तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्केच्या मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे; मात्र यासाठी विमा कंपनी मनमानी करीत आहे. तरीही सरकार गप्पच आहे. ही कंपनी सरकार अन् शिवसेनेचे कृषी मंत्री दादा भुसे यांची जावई आहे का, असा जळजळीत सवाल आ.राणा जगजितसिंह पाटील यांनी बुधवारी उपस्थित केला.

जिल्ह्यातील पावसातील खंडामुळे झालेल्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना अनुज्ञेय आगाऊ रक्कम देण्याची मागणी आ. पाटील यांनी केली होती. कृषी खात्याचे सचिव एकनाथ डवले व जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी या अनुषंगाने आदेश निर्गमित केले होते. विमा कंपनीच्या प्रतिनिधींसह कृषी विभागाने चाचणी प्रयोग केले. त्यात ५० टक्केपेक्षा अधिकचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. त्याचा अहवाल २० ऑगस्ट रोजी देणे अपेक्षित असताना विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी अहवालावर स्वाक्षऱ्या करण्यास नकार दिला. ही गंभीर बाब कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्या निदर्शनास आणून कार्यवाहीची मागणी केल्यानंतर विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी ३० टक्केच नुकसान झाल्याचे लेखी दिल्याचे समजते. यातील ७० टक्केपेक्षा जास्त विमा कंपनीचे प्रतिनिधींचा कृषी अभ्यासक्रमाशी कुठलाही संबंध नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. कृषी विभागाच्या अनुभवी अधिकाऱ्यांपेक्षा हे प्रतिनिधींनी या क्षेत्रात तज्ज्ञ आहेत का? अग्रिम नुकसान भरपाई तातडीने मिळावी, ही बाधित शेतकऱ्यांची मागणी असताना महाविकास आघाडी सरकार व शिवसेनेचे कृषी मंत्री दादासाहेब भुसे विमा कंपनीला आपले जावई असल्यासारखे वागणूक का देत आहेत? असा प्रश्नही आ. पाटील यांनी केला. खरीप २०२० चा हक्काचा पीक विमादेखील अशा वर्तनामुळेच प्रलंबित आहे. कळंब तालुक्यातील अशोक गुंड या तरुण शेतकऱ्याने नुकतेच पीक नुकसानामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. अशी दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये, यासाठी तत्काळ विमा कंपनीस अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही आ. पाटील यांनी केली आहे.