शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनानंतरचे साइड इफेक्ट्स वाढले, औषधी काळजीपूर्वक घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:33 IST

उस्मानाबाद : कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जिल्ह्यात चांगले आहे. मात्र, बरे झाल्यानंतरही जी तीव्र लक्षणे असलेले रुग्ण होते, ...

उस्मानाबाद : कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जिल्ह्यात चांगले आहे. मात्र, बरे झाल्यानंतरही जी तीव्र लक्षणे असलेले रुग्ण होते, त्यांच्यात बरीच शारीरिक गुंतागुंत निर्माण होऊ लागली आहे. प्रामुख्याने रक्तात गुठळ्या होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे कोरोनातून बाहेर पडल्यानंतरही पुढचे काही महिने स्वत:ची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ४४ हजारांहून अधिक कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यापैकी ३६ हजारांवर रुग्ण हे या आजारावर मात करून बाहेर पडले आहेत. असे असले तरी त्यांच्यातील शारीरिक गुंतागुंत कमी झालेली नाही. विशेषत: जे रुग्ण तीव्र लक्षणांचे होते, त्यांच्यातील बहुतेकांना अन्य व्याधी सतावू लागल्या आहेत. अशक्तपणा, अंगदुखी, दम लागणे या काही सर्वसाधारण व्याधींसोबतच आता रक्तात गुठळ्या तयार होणे, फायब्रोसिस यासारखे आजारही दिसून येऊन लागले आहेत. यामुळे ज्यांना त्रास जास्त जाणवत असेल, त्यांनी वेळेत डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करावेत, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

रेमडेसिविरचे साइड इफेक्ट्स...

कोरोनाग्रस्तांसाठी रेमडेसिविर हे जणू रामबाण औषध असल्याप्रमाणे त्याचा अतिरेकी वापर अनेक ठिकाणी होत आहे. मात्र, कोरोनातून बरे झाल्यानंतर अतिरेकी वापराचे साइड इफेक्ट्स जाणवू लागतात. हृदयाची गती सर्वसाधारण ७० ते ८५ दरम्यान असावी लागते. ती काही रुग्णांमध्ये ६० पर्यंत आढळून येत आहे. अशा रुग्णांना हृदयविकाराचा धोका अधिक आहे. शिवाय, रक्त तयार करणा-या बोनमॅरोची कार्यक्षमताही कमी होत जात आहे. त्यामुळे ॲनिमियासारखे आजार तयार होत आहेत. रक्तातील पेशी कमी होण्याचे प्रमाणही अतिरेकी वापरामुळे जास्त आहे.

स्टेरॉइडचे साइड इफेक्ट्स...

कोरोनाबाधितांवर उपचार करताना स्टेरॉइडचाही वापर केला जात आहे. या स्टेरॉइडचा अतिवापरही धोकादायक आहे. मध्यम ते तीव्र लक्षणे असलेले कोरोनाबाधित बरे झाल्यानंतर स्टेरॉइडच्या अतिवापरामुळे त्यांच्यातील हायपरटेन्शन वाढीस लागते. जे रुग्ण मधुमेह सुरू होण्याच्या टप्प्यात असतात, त्यांना मधुमेह होत आहे. फंगल इन्फेक्शन वाढण्याचा धोका आहे. फुफ्फुस फायब्रोस होऊन पुढच्या काही महिन्यांपर्यंत त्याची क्रयशक्ती कमी होते.

काय होतात परिणाम...

मध्यम व तीव्र स्वरूपाची लक्षणे असलेल्या कोरोनाबाधितांमध्ये नंतर वेगवेगळ्या गुंतागुंती तयार होत आहे. साधारणत: अशक्तपणा, अंगदुखी, दम लागणे, अंधारी येणे या काही कॉमन बाबी अशा रुग्णांमध्ये आढळून येत आहेत.

काय घ्यावी काळजी...

कोरोनातून बरे झाल्यानंतर नागरिकांना जे त्रास जाणवत असतील, त्याच्याशी संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांकडून वेळीच तपासणी करून घ्यावी व लागलीच उपचार सुरू करावेत. याशिवाय, सध्या फंगल इन्फेक्शन, फायब्रोसिसमुळे फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होत आहे. त्यामुळे फुफ्फुसाची कार्यक्षमता तसेच रक्तदाब, ऑक्सिजन वेळोवेळी तपासत राहावे.

-डॉ. राज गलांडे, उस्मानाबाद

सध्या कोरोनातून बरे झालेल्या काही रुग्णांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होत असल्याचे निदर्शनास येत आहे. हे प्रमाण पहिल्या लाटेपेक्षा यावेळी जास्त आहे. हे टाळण्यासाठी शरीरातील पाणी कमी होऊ द्यायचे नाही. वारंवार पाणी पीत राहावे. जे कोमॉर्बिड रुग्ण आहेत, त्यांनी असा त्रास जाणवत असल्यास रक्त पातळ होण्याच्या औषधी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्याव्यात.

-डॉ. महेश वडगावकर, उस्मानाबाद