शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

ॲक्शन मोडमुळे वाढले डिटेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उस्मानाबाद : जिल्ह्यातील प्रत्येक शोषित, पीडित नागरिक हा माझ्या घरातील सदस्य आहे... तो माझ्या कुटुंबाचाच एक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उस्मानाबाद : जिल्ह्यातील प्रत्येक शोषित, पीडित नागरिक हा माझ्या घरातील सदस्य आहे... तो माझ्या कुटुंबाचाच एक भाग आहे... तो माझा मुलगा आहे, माझी मुलगी, भाऊ, बहीण, आई-वडील आहेत. हीच संवेदना पोलिसांच्या मनात रुजविल्याने वर्षभरात कामगिरीचा आलेख चांगलाच उंचावला आहे. एखाद्या व्यक्तीवर नव्हे तर कुटुंबावरच आघात ठरणारे अपघात एकीकडे घटल्याचे दिसत असतानाच दोष सिद्धतेचे प्रमाण वाढविण्यातही पोलीस दलाला यश आले आहे.

गेल्या वर्षभरात जिल्हा पोलीस दलाकडून चमकदार कामगिरी झाली आहे. चोऱ्या-घरफोड्यांचा छडा लावतानाच फरार असलेले आरोपी, वॉन्टेड गुन्हेगारही मोठ्या संख्येने पोलिसांच्या जाळ्यात अडकले. यात विशेष दखलपात्र बाब म्हणजे एकीकडे वाहनांची संख्या, वर्दळ वाढत असताना अपघातांची संख्या लक्षणीयरित्या घटली आहे. २०१९ साली जिल्ह्यात एकूण ७०६ अपघात झाले होते तर २०२०मध्ये ही संख्या ५६९ आहे. म्हणजेच गतवर्षी व त्याआधीच्या वर्षांच्या तुलनेत १३७ अपघात कमी झाले. हे प्रमाण २१ टक्के इतके कमी आहे. यासाठी पोलिसांनी रस्त्यावर उतरुन चालकांमध्ये जनजागृतीचा उपक्रम राबविला. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना धडाही शिकवला. बैलगाड्या, ट्रॅक्टर व अन्य वाहनांवर रिफ्लेक्टर बसवले. उत्सवांमध्ये जनजागृतीची मोहीम राबवली. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.

राज्यात उंचावला आलेख...

उस्मानाबाद जिल्ह्याने दोष सिद्धीकरणात चांगलीच आघाडी घेतली आहे. २०१९मध्ये डिटेक्शनचे प्रमाण २३.५५ टक्के इतके होते. ते २०२०मध्ये १० टक्क्यांनी वाढून ३३.६२वर पोहोचले. एकंदर राज्याचे हे प्रमाण २१ टक्के आहे. गुन्हा करणाऱ्या व्यक्तींना शिक्षा मिळायलाच हवी व पीडितांना न्याय मिळायलाच हवा, ही भावना ठेऊन पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी पैरवी अधिकाऱ्यांना अभ्यासाची सवय लावली. गुन्ह्याचा पूर्ण अभ्यास करुन न्यायालयात वेळेवर आरोपी, साक्षीदार हजर ठेवण्याची सूचना त्यांनी केल्याने युक्तीवाद चांगला झाला अन् त्याचे हे फलित मिळाले.

रौशन यांनी रुजविला मानवी दृष्टीकोन....

जिल्ह्यात मागील वर्षभरात बेपत्ता झालेले १०३ पुरुष व २१८ महिला तर अपहरण झालेले ५ पुरुष व २७ महिलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. यासाठी पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी आधी तपास अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये मानवी दृष्टीकोन रुजविला. आपलीच मुलगी, मुलगा, आई-वडील यापैकी कोणी बेपत्ता झाल्यास ज्या तडफेने आपण त्यांचा शोध घेतो, तीच भावना ठेऊन तपास करण्याच्या सूचना केल्या. यासाठी अजिबात वेळ घालवू नये, अशी सूचना त्यांनी केली होती. तसेच अपघातांच्या तपासामध्येही हीच भावना जागविली. अपघात हा एका व्यक्तीवर नव्हे तर कुटुंबावर आघात करतो. एखादी व्यक्ती कायमची अपंग होते. त्यानंतर त्याच्यावर, त्याच्या कुटुंबावर जी परिस्थिती बेतते, याची जाणीव करुन दिल्याने कामाला गती आल्याचे पोलीस सांगतात. एरवी रुक्ष भासणाऱ्या पोलीस दलाला फुटलेली ही मानवी दृष्टीकोनाची पालवी सकारात्मकता दर्शविणारी अन् नागरिक व पोलिसांमधील दरी कमी करणारी ठरत आहे.