शहरं
Join us  
Trending Stories
1
"धमकी देणं एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? त्या महिलेची..."; अंजली दमानिया अजित पवारांवर भडकल्या
2
ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत राहिले अन् भारताने सिंगापूरसोबत अब्जावधीचे ५ मोठे करार केले...
3
ADR चा धक्कादायक रिपोर्ट! मंत्र्यांकडे २३,९२९ कोटींची माया, ४७ टक्के मंत्र्यांवर ३०२ चे गुन्हे
4
अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; आणखी एका सरकारी बँकेनं 'फ्रॉड'चा ठपका ठेवला, शेअर आपटला
5
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
6
अनंत चतुर्दशी २०२५: गणपती उत्तरपूजेला गुरुजी मिळत नाही? ‘असे’ करा विसर्जन पूजन, पाहा, विधी
7
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
8
पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये महिन्याला जमा करा ₹४०००; मिळेल ₹४५,४५९ चा गॅरेंटिड रिटर्न, पाहा संपूर्ण गणित
9
भारतातील जोडप्यांना मुले जन्माला घालण्यास आवडेना; पाच दशकांत जन्मदरात मोठी घट
10
'लव्ह अँड वॉर'मध्ये दिसणार एकत्र, राहाला कसा वेळ देतात रणबीर-आलिया? अभिनेत्री म्हणाली...
11
रॉस टेलरने निवृत्ती घेतली मागे, न्यूझीलंड सोडून बाहेर पडला, आता 'या' देशाकडून खेळणार क्रिकेट
12
Share Market: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २५० अंकांनी वधारला; निफ्टीही वाढला; 'हे' स्टॉक्स चमकले
13
GST बदल! माझ्या कुटुंबाला फायदा किती?; मासिक बजेटवरचा भार हलका होणार, गणित समजून घ्या
14
अरे देवा, खूपच वाईट! आधी २ वर्षाच्या मुलाला १३व्या मजल्यावरून फेकले, नंतर आईने मारली उडी
15
जीएसटीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा; अर्थव्यवस्थेलाही मिळेल बूस्टर, PM मोदींना विश्वास
16
अभिनेत्रीच्या जुळ्या मुली अन् आईवडील हिमाचलमध्ये अडकले; म्हणाली, "चार दिवसांपासून..."
17
शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर
18
यू टर्न की मास्टरस्ट्रोक? जनतेच्या खिशातून अधिकचेच पैसे काढले; ८ वर्षांनी सरकारच्या लक्षात आले
19
मराठा, ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर - चंद्रशेखर बावनकुळे
20
कुजबुज! राज ठाकरेंचं एवढेच वाक्य वादळ ठरले; शिंदेसेनेच्या आमदाराने लगावला टोला, "आधी लोकांमधून.."

ॲक्शन मोडमुळे वाढले डिटेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उस्मानाबाद : जिल्ह्यातील प्रत्येक शोषित, पीडित नागरिक हा माझ्या घरातील सदस्य आहे... तो माझ्या कुटुंबाचाच एक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उस्मानाबाद : जिल्ह्यातील प्रत्येक शोषित, पीडित नागरिक हा माझ्या घरातील सदस्य आहे... तो माझ्या कुटुंबाचाच एक भाग आहे... तो माझा मुलगा आहे, माझी मुलगी, भाऊ, बहीण, आई-वडील आहेत. हीच संवेदना पोलिसांच्या मनात रुजविल्याने वर्षभरात कामगिरीचा आलेख चांगलाच उंचावला आहे. एखाद्या व्यक्तीवर नव्हे तर कुटुंबावरच आघात ठरणारे अपघात एकीकडे घटल्याचे दिसत असतानाच दोष सिद्धतेचे प्रमाण वाढविण्यातही पोलीस दलाला यश आले आहे.

गेल्या वर्षभरात जिल्हा पोलीस दलाकडून चमकदार कामगिरी झाली आहे. चोऱ्या-घरफोड्यांचा छडा लावतानाच फरार असलेले आरोपी, वॉन्टेड गुन्हेगारही मोठ्या संख्येने पोलिसांच्या जाळ्यात अडकले. यात विशेष दखलपात्र बाब म्हणजे एकीकडे वाहनांची संख्या, वर्दळ वाढत असताना अपघातांची संख्या लक्षणीयरित्या घटली आहे. २०१९ साली जिल्ह्यात एकूण ७०६ अपघात झाले होते तर २०२०मध्ये ही संख्या ५६९ आहे. म्हणजेच गतवर्षी व त्याआधीच्या वर्षांच्या तुलनेत १३७ अपघात कमी झाले. हे प्रमाण २१ टक्के इतके कमी आहे. यासाठी पोलिसांनी रस्त्यावर उतरुन चालकांमध्ये जनजागृतीचा उपक्रम राबविला. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना धडाही शिकवला. बैलगाड्या, ट्रॅक्टर व अन्य वाहनांवर रिफ्लेक्टर बसवले. उत्सवांमध्ये जनजागृतीची मोहीम राबवली. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.

राज्यात उंचावला आलेख...

उस्मानाबाद जिल्ह्याने दोष सिद्धीकरणात चांगलीच आघाडी घेतली आहे. २०१९मध्ये डिटेक्शनचे प्रमाण २३.५५ टक्के इतके होते. ते २०२०मध्ये १० टक्क्यांनी वाढून ३३.६२वर पोहोचले. एकंदर राज्याचे हे प्रमाण २१ टक्के आहे. गुन्हा करणाऱ्या व्यक्तींना शिक्षा मिळायलाच हवी व पीडितांना न्याय मिळायलाच हवा, ही भावना ठेऊन पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी पैरवी अधिकाऱ्यांना अभ्यासाची सवय लावली. गुन्ह्याचा पूर्ण अभ्यास करुन न्यायालयात वेळेवर आरोपी, साक्षीदार हजर ठेवण्याची सूचना त्यांनी केल्याने युक्तीवाद चांगला झाला अन् त्याचे हे फलित मिळाले.

रौशन यांनी रुजविला मानवी दृष्टीकोन....

जिल्ह्यात मागील वर्षभरात बेपत्ता झालेले १०३ पुरुष व २१८ महिला तर अपहरण झालेले ५ पुरुष व २७ महिलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. यासाठी पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी आधी तपास अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये मानवी दृष्टीकोन रुजविला. आपलीच मुलगी, मुलगा, आई-वडील यापैकी कोणी बेपत्ता झाल्यास ज्या तडफेने आपण त्यांचा शोध घेतो, तीच भावना ठेऊन तपास करण्याच्या सूचना केल्या. यासाठी अजिबात वेळ घालवू नये, अशी सूचना त्यांनी केली होती. तसेच अपघातांच्या तपासामध्येही हीच भावना जागविली. अपघात हा एका व्यक्तीवर नव्हे तर कुटुंबावर आघात करतो. एखादी व्यक्ती कायमची अपंग होते. त्यानंतर त्याच्यावर, त्याच्या कुटुंबावर जी परिस्थिती बेतते, याची जाणीव करुन दिल्याने कामाला गती आल्याचे पोलीस सांगतात. एरवी रुक्ष भासणाऱ्या पोलीस दलाला फुटलेली ही मानवी दृष्टीकोनाची पालवी सकारात्मकता दर्शविणारी अन् नागरिक व पोलिसांमधील दरी कमी करणारी ठरत आहे.