शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

कांदा बिजोत्पादनातून दोन एकरात घेतले साडेसहा लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:24 IST

बालाजी आडसूळ कळंब : प्रचलित पिकांना बगल देत शेतीमध्ये नव्या वाटा चोखाळणारे शिंगोली येथील शेतकरी सतीश माने मागील पाच ...

बालाजी आडसूळ

कळंब : प्रचलित पिकांना बगल देत शेतीमध्ये नव्या वाटा चोखाळणारे शिंगोली येथील शेतकरी सतीश माने मागील पाच वर्षापासून कांदा बिजोत्पादन घेत आहेत. स्थिर दराची हमी असलेल्या ‘कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग’ च्या माध्यमातून त्यांनी यंदाही दोन एकरामध्ये खर्च वजा जाता साडेसहा लाख रूपयाचे निव्वळ उत्पन्न घेतले आहे.

तालुक्यातील शिंगोलीे येथील सतीश पांडुरंग माने हे एक प्रयोगशील शेतकरी. शिवारात पाच-सहा फुटावरच खट्ट पाषाण असल्याने गावची सारी भिस्त हंगामी पिकावरच. यातच हे हंगाम लहरी मोसमी पावसावर निर्भर असल्याने ‘पेरलं ते उगवेल, अन् उगवलं ते जगेल’ याची शाश्वती नसते.

यामुळेच सतीश माने यांना बदलाची वाट धरावी लागली. आपल्या पंधरा एकर क्षेत्रात त्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार नवनवे प्रयोग सुरू केले. पीक पद्धती बदलली. यात कधी तोटा झाला तर कधी भरभरून मिळाले. यातूनच त्यांचे पाय कांदा बिजोत्पादनाच्या प्रयोगाकडे वळले. पाच वर्षापूर्वी कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर व आत्मा यांचे मार्गदर्शन लाभले. यात बऱ्यापैकी उत्पन्न हाती लागल्याने पुढे सातत्याने बिजोत्पादनावर त्यांनी भर दिला.

यंदाही त्यांनी नोव्हेंबरमध्ये आपल्या दोन एकर क्षेत्रात बिजोत्पादन घेण्यासाठी पूर्व मशागत करत ३२ क्विंटल कांदा लागवड केली. यातून चांगली मेहनत घेत एकूण १३ क्विंटल कांदा बिजोत्पादन झाले असून, कमी काळात अधिक उत्पन्न मिळवण्यात यश आले आहे.

चौकट....

कॉन्ट्रॅक्ट फॉर्मिंग ; शाश्वत दराची हमी

शिंगोली येथील सतीश माने यांनी कृषी विभाग व तुळजापूर येथील कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील एनएचआरडीएफ या संस्थेशी कांदा बिजोत्पादन करण्यासाठी करार केलेला आहे. यानुसार त्यांनी घेतलेल्या पिकाला प्रति क्विंटल ७० हजार रूपये किलो या शाश्वत दराची हमी मिळालेली आहे.

अडीच लाखांचा खर्च

सतीश माने यांनी आपल्या शेतात दोन एकरामध्ये ३.२ टन कांदा लागवड केली होती. यासाठी त्यांना दोन लाख ४० हजार रूपयांचा खर्च आला होता. पाच सहा महिन्यानंतर याला चांगले यश आले. यातून एकूण १३ क्विंटल बिजोत्पादन हाती लागले आहे. करार शेतीच्या शाश्वत दरामुळे एकूण ९ लाख १० हजार रूपये एकूण तर खर्च वजा जाता सहा लाख सत्तर हजारांचे निव्वळ उत्पन्न हाती पडले आहे.

सरी, वरंबा अन् मक्याचे आंतरपीक

सरी वरंबा पद्धतीने त्यांनी लागवड केली. सर्व रोपांना समान पाणी मिळावे व पाणी देणे सुलभ व्हावे याकरिता लहान-लहान वाफे केले. याशिवाय पाण्यासाठी सोडलेल्या सरीमध्ये मका लागवड केली. अवकाळी पाऊस, वारे यापासून कांद्याचे संरक्षण व्हावे याकरिता लावलेल्या या मक्याचे सात क्विंटल उत्पादन तर निघालेच . शिवाय कांदा बिजोत्पादनाचे रक्षण केले, असे कृषी सहाय्यक भुजंग लोकरे यांनी सांगितले.